AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monsoon Session | विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन महिनाभर लांबणीवर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोनाचे संकट पाहता पावसाळी अधिवेशन 3 ऑगस्टपासून घेतलं जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी याबाबतची माहिती दिली. (CM Uddhav Thackeray On Monsoon Session) 

Monsoon Session | विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन महिनाभर लांबणीवर  : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
| Updated on: Jun 10, 2020 | 5:04 PM
Share

मुंबई :  कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन जवळपास महिनाभर पुढे ढकललं आहे. येत्या 22 जून रोजी हे अधिवेशन घेतलं जाणार होतं. मात्र कोरोनाचे संकट पाहता हे अधिवेशन 3 ऑगस्टपासून घेतलं जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी याबाबतची माहिती दिली. (CM Uddhav Thackeray On Monsoon Session)

“येत्या 22 जूनपासून विधीमंडळाचे अधिवेशन घेतलं जाणार होतं. त्या अधिवेशनाबद्दल कामकाज समितीची बैठक झाली. या बैठकीत परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर येत्या 22 जूनला अधिवेशन घेणं कठीण आहे. त्यामुळे ते पुढे 3 ऑगस्टला घेण्याचे ठरले आहे,” असे मुख्यमंत्री नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान म्हणाले.

“तसेच नागरिकांनी कृपया बाहेर पडल्यावर अंतर ठेवा. कोरोनासोबत जगायचं शिकावं लागेल. स्वच्छता पाळा, निर्जंतुकीकरण पाळा,” असे आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातील जनतेला केले.

…तर पुन्हा लॉकडाऊन करावं लागेल 

“महाराष्ट्रात टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन लागू केला आहे. तसेच हळूहळू यात शिथीलता आणली जाईल. जगभरात कोरोनासोबत जगायला शिका, असं म्हटलं जातं, तसंच आपल्याला करावं लागेल. बाहेर पडून आरोग्यासाठी व्यायाम करायला सांगितले. पण पहिल्या दिवशीची गर्दी पाहून धाकधूक वाढली. मात्र, बाहेर आरोग्यासाठी पडायचं आहे, खराब करण्यासाठी नाही.

जर अशाचप्रकारे गर्दी होत राहिली तर निर्बंध लावावे लागतील, लॉकडाऊन करावं लागेल. मात्र, तशी वेळ येणार नाही, महाराष्ट्रातील जनता नियमांचं पालन करेल,” असेही मुख्यमंत्री म्हणाले.

चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्यांच्या पाठीशी सरकार

“निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर आम्ही सगळे तिकडे जाऊन आलो आहोत. नुकसान खूप झालं आहे. विशेषत: रायगड जिल्हा, रत्नागिरीतील दापोली, मंडणगण येथे मोठं नुकसान झालं आहे. या ठिकाणी नुकसान भरपाईसाठी पंचनामे सुरु आहेत. पंचनामे आल्यावर नुकसान किती झालं आहे याची माहिती मिळेल. त्यानंतर भरपाई दिली जाईल,” असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

“वादळामुळे झालेल्या नुकसानग्रस्तांसाठी मदतीसाठी निकष बदलण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे निकष बदलण्यात आले आहेत. बदललेल्या निकषाप्रमाणे मदत घोषित करण्यात आली आहे,” असेही उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितले.

“मी जेव्हा रायगडमध्ये गेलो तेव्हा तात्काळ 100 कोटींची मदत जाहीर केली. त्यानंतर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाला 75 आणि 25 कोटींची मदत केली. मला विचारण्यात आलं होतं की, पॅकेज काय? मुळात पॅकेज हा शब्द चुकीचा आहे. कुणालाही आम्ही उघडू पडू देणार नाही. ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांना महाविकास आघाडीचं सरकार खंबीरपणाने मदत करेल,” असे आश्वासन उद्धव ठाकरेंनी नुकसानग्रस्तांना (CM Uddhav Thackeray On Monsoon Session)  दिले.

“मुंबई लोकलची मागणी आम्ही सातत्याने करत आहोत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना पोहोचण्यासाठी, त्यांची संख्या वाढण्यासाठी लोकल महत्त्वाची आहे. लॉकडाऊनच्या काळातही आपण ही मागणी केली आहे,” असे मुख्यमंत्री लोकलच्या प्रश्नावर उत्तर देताना म्हणाले.

“मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणताही संघर्ष झालेला नाही. मंत्रिमंडळ राज्याच्या हिताचे निर्णय घेतं, तेथे कुणीही मारामाऱ्या करण्यासाठी येत नाही,” असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.

संबंधित बातम्या : 

भाजपचे नेते गेल्यानंतर 3 महिने घरात बसलेल्या मुख्यमंत्र्यांना आणि शरद पवारांना बाहेर पडावंसं वाटलं : चंद्रकांत पाटील

शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नाही अशी तक्रार आली नाही पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी दरडावलं

Follow Us
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस.

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस

मोठी बातमी ! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला.

मोठी बातमी ! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला

सर्वात मोठी बातमी ! शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?.

सर्वात मोठी बातमी ! शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?

Sharad Pawar Meet PM Modi : शरद पवार दिल्लीत पंतप्रधान मोदींना का भेटले? राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया.

Sharad Pawar Meet PM Modi : शरद पवार दिल्लीत पंतप्रधान मोदींना का भेटले? राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

आमच्याकडे व्हिडीओ पाहायला वेळ नाही, सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार.

आमच्याकडे व्हिडीओ पाहायला वेळ नाही, सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा...

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा..