AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘दिल्लीपुढे महाराष्ट्र झुकत नाही हे पुन्हा सिद्ध, शिंदे-फडणवीसांनी राजीनामा द्यावा’, कुणी केली मोठी मागणी?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवप्रेमींची जाहीर माफी मागितली आहे. मोदींनी माफी मागितल्यानंतर काँग्रेसकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.

'दिल्लीपुढे महाराष्ट्र झुकत नाही हे पुन्हा सिद्ध, शिंदे-फडणवीसांनी राजीनामा द्यावा', कुणी केली मोठी मागणी?
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Aug 30, 2024 | 6:32 PM
Share

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याने मोठा वाद निर्माण झालाय. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागितली आहे. नरेंद्र मोदी वाढवण बंदराच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमासाठी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. यावेळी मोदींनी भाषणाच्या सुरुवातीलाच जाहीर माफी मागितली. मोदी यांनी माफी मागितल्यानंतर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी एक्स (X) वर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माफी मागितली आहे.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागितलेली माफी हा काँग्रेस आणि महाराष्ट्रातील जनतेच्या सततच्या निषेधाचा अन् आक्रमक भूमिकेचा परिणाम आहे. दिल्लीपुढे महाराष्ट्र झुकत नाही हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले. खरंच महाराजांच्या अपमानाची थोडीही जाणीव होत असेल तर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी तत्काळ राजीनामा द्यावा”, अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे.

‘मोदी जी, महाराजांचा अपमान करणाऱ्यांना तुम्ही हटवले नाही तर…’

“मोदी जी, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना तुम्ही हटवले नाही तर महाराष्ट्रातील जनता तुम्हाला हटवल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्र धर्माच्या लढाईची ही फक्त सुरुवात आहे. महाराष्ट्र यांना माफ करणार नाही आणि यांनी केलेला महाराष्ट्रद्रोह विसरणारही नाही. आम्ही महाराष्ट्राला गतवैभव प्राप्त करून दिल्याशिवाय शांत बसणार नाही. जय भवानी जय शिवाजी”, असं ट्विट सचिन सावंत यांनी केलं आहे.

मोदी नेमकं काय म्हणाले?

“सिंधुदुर्गात जे झालं. ते माझ्यासाठी शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही. ते आमच्यासाठी शिवाजी महाराज हे फक्त राजा महाराज, राजपुरुष नाहीत. आमच्यासाठी शिवाजी महाराज आराध्य दैवत आहे. मी आज डोकं झुकवून माझ्या आराध्यदैवतेला चरणावर मस्तक ठेवून माफी मागतो. आमचे संस्कार वेगळे आहेत”, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जाहीर माफी मागितली.

Follow Us
24 तासांत E-20 जनता पार्टीचे 2 लाखांहून अधिक फॉलोअर्स
E 20 Janata Party | E-20 विरोधात जनआक्रोश! 24 तासांत E-20 जनता पार्टीचे 2 लाखांहून अधिक फॉलोअर्स
उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त विशेष तयारी, बेड नेते भेटीला पोहोचले
उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त विशेष तयारी, बेड नेते भेटीला पोहोचले
37 सेकंदांचा व्हिडिओ अन् सोशल मीडियावर संतापाची लाट; सोयाबीन चाप...
Viral Video | 37 सेकंदांचा व्हिडिओ अन् सोशल मीडियावर संतापाची लाट; सोयाबीन चाप बनवण्याची घाणेरडी पद्धत उघड
दिल्लीत हालचाली वाढल्या! वकीलांसोबतच्या चर्चेत मोठा निर्णय? अभिजीत
दिल्लीत हालचाली वाढल्या! वकीलांसोबतच्या चर्चेत मोठा निर्णय? अभिजीत दीपकेच्या भेटीगाठी सुरुच
AK-47 ने आंदोलनकर्त्यांवर गोळीबार, मोदींचं आश्वासन कुठं गेलं? हे सरकार
Rahul Gandhi | AK-47 ने आंदोलनकर्त्यांवर गोळीबार, मोदींचं आश्वासन कुठं गेलं? हे सरकार खोटं आहे; राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल
महत्त्वाच्या विधेयकाची प्रस्तावना अजून प्रलंबित, अधिवेशनाच्या दुसऱ्या
महत्त्वाच्या विधेयकाची प्रस्तावना अजून प्रलंबित, अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातही मोठा गोंधळ
पेपर सेट करणाऱ्याचा प्रमुख आका कोण?; रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत...
Rohit Pawar | पेपर सेट करणाऱ्याचा प्रमुख आका कोण?; रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत मांडले धक्कादायक दावे
10 वर्षांचा तुरुंगवास, 10 कोटी रुपयांपर्यंत दंड अन्... परीक्षा सुधारणा
10 वर्षांचा तुरुंगवास, 10 कोटी रुपयांपर्यंत दंड अन्... परीक्षा सुधारणा विधेयकामध्ये नेमकं काय काय?
मोठा दिलासा! आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात 5% घसरण
मोठा दिलासा! आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात 5% घसरण; पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?
मोठी बातमी! राजे ठाकरेंच्या सर्व पदाधिकाऱ्यांना तातडचीच्या सुचना,
मोठी बातमी! राजे ठाकरेंच्या सर्व पदाधिकाऱ्यांना तातडचीच्या सुचना, 1 ऑगस्टला... असं काय घडलं?