AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची मोठी तयारी, जागावाटपासाठी समिती केली स्थापन

आगामी विधानसभेसाठी राज्यातील सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीमधील सर्वच घटकपक्ष आपल्या पक्षाला जास्तीत जास्त जागा कशा मिळतील याची व्यूहरचना आखत आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची मोठी तयारी, जागावाटपासाठी समिती केली स्थापन
uddhav, pawar and patoleImage Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Jul 26, 2024 | 10:14 PM
Share

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे कॉंग्रेसच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत अधिक जागा मिळविण्यावर काँग्रेसने लक्ष केंदित केले आहे. आगामी विधानसभेसाठी राज्यातील सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीमधील सर्वच घटकपक्ष आपल्या पक्षाला जास्तीत जास्त जागा कशा मिळतील याची व्यूहरचना आखत आहेत. त्यात काँग्रेसने एक पाऊल पुढे टाकले आहे. आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसने मुंबई आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडी मित्रपक्ष शिवसेना (UBT) आणि NCP (SP) यांच्याशी चर्चा करण्यासाठी समितीची घोषणा केली. या समितीमध्ये 10 नेत्यांचा समावेश आहे.

लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केल्यानंतर शिवसेना (UBT) विधानसभा निवडणुकीत सुमारे 115 ते 125 जागा लढवण्याच्या तयारीत आहे. तर, काँग्रेसनेही 150 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. राज्यात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. त्यामुळे जागावाटपामध्ये या दोन्ही पक्षांना तडजोड करावी लागणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीही या तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपाची चर्चा झाली होती. मात्र, त्यातील कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे दिल्ली पक्षश्रेष्ठींनी विधानसभा निवडणुकीसाठी नव्या समितीची घोषण केली.

congress letter

congress letter

दिल्ली पक्षश्रेष्ठींनी जाहीर केलेल्या राज्यस्तरीय समितीमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ज्येष्ठ नेते नितीन राऊत, नसीम खान आणि सतेज बंटी पाटील यांचा समावेश आहे. तर, मुंबई प्रदेश समितीमध्ये खासदार वर्षा गायकवाड, आमदार भाई जगताप आणि माजी मंत्री अस्लम शेख यांचा समावेश आहे. हे सर्व नेते मित्रपक्षांसोबत जागावाटपाच्या फॉर्म्युल्याबाबत चर्चा करणार आहेत.

दरम्यान, 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेना हा NDA चा घटक पक्ष होता. त्यावेळी शिवसेनेने 124 जागांवर निवडणूक लढवली होती. तर, भाजप आणि इतर मित्र पक्षांसाठी 163 जागा सोडल्या होत्या. निवडणुकीनंतर शिवसेनेची एनडीएसोबत युती तुटली आणि शिवसेना महाविकास आघाडीचा भाग बनली. शिवसेनेचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडली आणि एकनाथ शिंदे यांनी 30 हून अधिक आमदारांसह वेगळे होत पुन्हा एनडीएमध्ये सहभागी झाले.

'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.