AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसला पुन्हा मोठं खिंडार, धडधडणारी तोफ शिंदे गटात; काँग्रेसच्या बड्या नेत्याने पक्ष सोडला

congress raju waghmare: काँग्रेसला आणखी झटका बसला आहे. पक्षाची भूमिका माध्यमांकडे मांडणाऱ्या व्यक्तीनेच हा धक्का दिला आहे. काँग्रेस पक्षाचे प्रवक्त राजू वाघमारे यांनी काँग्रेसची साथ सोडत शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी काँग्रेसवर घणाघाती हल्ला त्यांनी केला.

काँग्रेसला पुन्हा मोठं खिंडार, धडधडणारी तोफ शिंदे गटात; काँग्रेसच्या बड्या नेत्याने पक्ष सोडला
राजू वाघमारे, एकनाथ शिंदे
| Updated on: Apr 09, 2024 | 11:30 AM
Share

काँग्रेसमधून एकामागे एक नेते बाहेर पडत आहेत. मुंबईतील बडे राजकीय व्यक्तीमत्व मिलिंद देवरा यांनी काही दिवसांपूर्वी पक्ष सोडला. त्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्षाला रामराम केला. मग बाबा सिद्दिकी यांनी काँग्रेसची साथ सोडली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला पुन्हा एक धक्का बसला आहे. आता पक्षाची भूमिका माध्यमांकडे मांडणाऱ्या व्यक्तीनेच हा धक्का दिला आहे. काँग्रेस पक्षाची धडधडणारी तोफ शिवसेनेत गेली आहे. काँग्रेस पक्षाचे प्रवक्त राजू वाघमारे यांनी काँग्रेस पक्षाची  साथ सोडत शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी काँग्रेसवर घणाघाती हल्ला त्यांनी केला.

काय म्हणाले राजू वाघमारे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजू वाघमारे यांचे शिवसेनेत स्वागत केले. त्यानी वाघमारे यांना शिवसेनेचा भगवा ध्वज दिला. यावेळी बोलताना राजू वाघमारे म्हणाले की, काही नेत्यांच्या गलिच्छ राजकारणामुळे पक्षाची अवस्था वाईट झाली आहे. काँग्रेस पक्ष आता उद्धव ठाकरे यांच्या हाताखाली दबलेला पक्ष झाला आहे. सांगली आणि भिवंडी येथील जागेबाबत असाच निर्णय झाला. सांगलीची जागा शिवसेनेने जाहीर केली.

भिवंडीची जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली. या सर्व प्रकाराचा परिणाम माझ्यावर झाला आहे. यामुळे मी कॉमन मॅन मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश घेत आहे. भविष्य काय आहे, हे भविष्य दाखविण्यासाठी आज चांगलं दिवस आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकास काय आहे, हे दाखवून दिले आहे. त्यांनी कमी वेळेत राज्याचा मोठा विकास केला आहे. आतापर्यंत कोणत्याच मुख्यमंत्री यांनी असे काम केले नाही. हे विरोधकांना देखील मान्य करावे लागेल.

तो सर्व्हे सांगितला

राज वाघमारे यांनी सांगितले की, मी काँग्रेसमध्ये असताना एक सर्व्ह आला होता. त्या सर्व्हमध्ये लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, असे मी ऑन रिकोर्डवर संगितले होते. लाखो कार्यकर्ते त्यांच्या मागे आहेत. ते एअर कंडिशनमध्ये बसणारे नेते नाहीत. सामान्य मुख्यमंत्री आहेत.

शिवसेनेत प्रवेश करताना प्रसंगी बोलताना राजू वाघमारे

अनेक प्रकल्प थांबले होते

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला केला. राज्यात काँग्रेसचा ना झेंडा, ना अजेंडा राहिला आहे. 35 वर्षे प्रामाणिकपणे राजू वाघमारे यांनी पक्षाचे काम केले. त्यांच्यासारख्या कार्यकर्त्यांची पक्षात घुसमट होत होती. यामुळे त्यांनी चांगला निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अनेक प्रकल्प थांबले होते. आता जोरदार काम सुरु आहे.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.