AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ज्या शेतकऱ्यांची परिस्थिती नाही त्यांची वीजतोडणी थांबवा’, आता कृषीमंत्र्यांचंच ऊर्जामंत्र्यांना आवाहन

वीज तोडणी मोहीम सुरु असल्याच्या पार्श्वभूमवीर दादा भुसे म्हणाले की, ज्या शेतकऱ्यांची वीज बिल भरण्याची परिस्थिती नाही. त्यांची वीज तोडणी थांबवा. तर ज्या शेतकऱ्यांची परिस्थिती आहे त्यांनी चालू बिल भरावं. आम्ही ऊर्जा विभागाला विनंती करतो की शेतकऱ्यांची वीज तोडणी करण्यात येऊ नये.

'ज्या शेतकऱ्यांची परिस्थिती नाही त्यांची वीजतोडणी थांबवा', आता कृषीमंत्र्यांचंच ऊर्जामंत्र्यांना आवाहन
दादा भुसे, नितीन राऊत
| Edited By: | Updated on: Dec 20, 2021 | 6:42 PM
Share

मुंबई : राज्यात वीज बिल वसुली आणि वीज तोडणीवरुन विरोधक आक्रमक झाले आहेत, शेतकरी संघटनाही आंदोलनं करत आहेत. शेतात भिजणं सुरु असताना शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम महावितरणकडून (MSEDCL) सुरु आहे. दुसरीकडे कुणालाही वीज फुकट मिळणार नाही, असं ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) म्हणत आहे. या पार्श्वभूमीवर आता कृषीमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनीच ऊर्जामंत्र्यांना महत्वाचं आवाहन केलं आहे. ज्या शेतकऱ्यांची परिस्थिती नाही त्यांची वीज तोडू नका, असं आवाहन भुसे यांनी नितीन राऊतांना केलंय.

वीज तोडणी मोहीम सुरु असल्याच्या पार्श्वभूमवीर दादा भुसे म्हणाले की, ज्या शेतकऱ्यांची वीज बिल भरण्याची परिस्थिती नाही. त्यांची वीज तोडणी थांबवा. तर ज्या शेतकऱ्यांची परिस्थिती आहे त्यांनी चालू बिल भरावं. आम्ही ऊर्जा विभागाला विनंती करतो की शेतकऱ्यांची वीज तोडणी करण्यात येऊ नये. ऊर्जा विभाग सांगत आहे की 60 हजार कोटी वीज बिल थकित आहे. त्यामुळे ऊर्जा विभाग अडचणीत येऊ शकतो. ही वस्तूस्थिती असलली तरी शेतकऱ्यांची वीज तोडू नका, असं आवाहन दादा भुसे यांनी केलं आहे.

कुणालाही फुकट वीज मिळणार नाही- नितीन राऊत

महावितरण कंपनी स्वतः वीज विकत घेऊन नागरिकांना वीज पुरवठा करते. त्यामुळे जे वीजेचा वापर करतात, त्या सर्वांना पैसे भरावेच लागतील. कोणालाही वीज फुकट मिळणार नाही. कोरोनामुळे इतर विभागांप्रमाणे महावितरणदेखील अडचणीत आले आहे. सध्या महावितरणची थकबाकी 71 हजार कोटी रुपयांची आहे. ग्राहकांनी बिले भरली तरच महावितरणचा कारभार सुरुळीत चालू शकेल, त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्व ग्राहकांनी वीज बिले भरून सहकार्य करावे, असे आवाहन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी केलं आहे.

बिल माफ करण्याच्या मागणीवर काय म्हणाले मंत्री?

या बैठकीत लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांकडून चालू एक बिल माफ भरून घेण्यासंबंधी मागणी केली. राज्याकडून शेतीपंपांच्या वीज बिलासाठी विशेष आर्थिक मदत दिली तर सवलत देता येईल, अन्यथा कंपनी चालवायची असेल तर किमान चालू दोन वीज बिले भरून घेणे आवश्यक असल्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले. मात्र काही शेतकऱ्यांकडे मोठी थकबाकी आहे, त्यांना हप्त्याची सवलतही दिल्याचे त्यांनी सांगितले.

इतर बातम्या :

‘राष्ट्रपती राजवट लागण्यासाठीची कोणतीही कारणे राज्य सरकारने शिल्लक ठेवली नाहीत’, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यानं चर्चेला उधाण

‘परीक्षा घोटाळ्याचे धागेदोरे मंत्रालयात कुणाकडे जातात हे शोधण्याची गरज’, दरेकरांकडून सीबीआय चौकशीची मागणी

... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं
... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं.
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान.
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा.
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी.
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका.
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!.
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक.
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका.
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका.
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक.