AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ज्या शेतकऱ्यांची परिस्थिती नाही त्यांची वीजतोडणी थांबवा’, आता कृषीमंत्र्यांचंच ऊर्जामंत्र्यांना आवाहन

वीज तोडणी मोहीम सुरु असल्याच्या पार्श्वभूमवीर दादा भुसे म्हणाले की, ज्या शेतकऱ्यांची वीज बिल भरण्याची परिस्थिती नाही. त्यांची वीज तोडणी थांबवा. तर ज्या शेतकऱ्यांची परिस्थिती आहे त्यांनी चालू बिल भरावं. आम्ही ऊर्जा विभागाला विनंती करतो की शेतकऱ्यांची वीज तोडणी करण्यात येऊ नये.

'ज्या शेतकऱ्यांची परिस्थिती नाही त्यांची वीजतोडणी थांबवा', आता कृषीमंत्र्यांचंच ऊर्जामंत्र्यांना आवाहन
दादा भुसे, नितीन राऊत
| Edited By: sagar joshi | Updated on: Dec 20, 2021 | 6:42 PM
Share

मुंबई : राज्यात वीज बिल वसुली आणि वीज तोडणीवरुन विरोधक आक्रमक झाले आहेत, शेतकरी संघटनाही आंदोलनं करत आहेत. शेतात भिजणं सुरु असताना शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम महावितरणकडून (MSEDCL) सुरु आहे. दुसरीकडे कुणालाही वीज फुकट मिळणार नाही, असं ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) म्हणत आहे. या पार्श्वभूमीवर आता कृषीमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनीच ऊर्जामंत्र्यांना महत्वाचं आवाहन केलं आहे. ज्या शेतकऱ्यांची परिस्थिती नाही त्यांची वीज तोडू नका, असं आवाहन भुसे यांनी नितीन राऊतांना केलंय.

वीज तोडणी मोहीम सुरु असल्याच्या पार्श्वभूमवीर दादा भुसे म्हणाले की, ज्या शेतकऱ्यांची वीज बिल भरण्याची परिस्थिती नाही. त्यांची वीज तोडणी थांबवा. तर ज्या शेतकऱ्यांची परिस्थिती आहे त्यांनी चालू बिल भरावं. आम्ही ऊर्जा विभागाला विनंती करतो की शेतकऱ्यांची वीज तोडणी करण्यात येऊ नये. ऊर्जा विभाग सांगत आहे की 60 हजार कोटी वीज बिल थकित आहे. त्यामुळे ऊर्जा विभाग अडचणीत येऊ शकतो. ही वस्तूस्थिती असलली तरी शेतकऱ्यांची वीज तोडू नका, असं आवाहन दादा भुसे यांनी केलं आहे.

कुणालाही फुकट वीज मिळणार नाही- नितीन राऊत

महावितरण कंपनी स्वतः वीज विकत घेऊन नागरिकांना वीज पुरवठा करते. त्यामुळे जे वीजेचा वापर करतात, त्या सर्वांना पैसे भरावेच लागतील. कोणालाही वीज फुकट मिळणार नाही. कोरोनामुळे इतर विभागांप्रमाणे महावितरणदेखील अडचणीत आले आहे. सध्या महावितरणची थकबाकी 71 हजार कोटी रुपयांची आहे. ग्राहकांनी बिले भरली तरच महावितरणचा कारभार सुरुळीत चालू शकेल, त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्व ग्राहकांनी वीज बिले भरून सहकार्य करावे, असे आवाहन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी केलं आहे.

बिल माफ करण्याच्या मागणीवर काय म्हणाले मंत्री?

या बैठकीत लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांकडून चालू एक बिल माफ भरून घेण्यासंबंधी मागणी केली. राज्याकडून शेतीपंपांच्या वीज बिलासाठी विशेष आर्थिक मदत दिली तर सवलत देता येईल, अन्यथा कंपनी चालवायची असेल तर किमान चालू दोन वीज बिले भरून घेणे आवश्यक असल्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले. मात्र काही शेतकऱ्यांकडे मोठी थकबाकी आहे, त्यांना हप्त्याची सवलतही दिल्याचे त्यांनी सांगितले.

इतर बातम्या :

‘राष्ट्रपती राजवट लागण्यासाठीची कोणतीही कारणे राज्य सरकारने शिल्लक ठेवली नाहीत’, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यानं चर्चेला उधाण

‘परीक्षा घोटाळ्याचे धागेदोरे मंत्रालयात कुणाकडे जातात हे शोधण्याची गरज’, दरेकरांकडून सीबीआय चौकशीची मागणी

Follow Us
पुण्यातील चूल मटण हॉटेलचा परवाना एफडीएने केला निलंबित
लोहगाव येथील चूल मटण हॉटेलवर अस्वच्छतेमुळे एफडीएची कारवाई
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
मनोज जरांगे पुन्हा मुंबईत आंदोलन करण्याच्या तयारीत?
मनोज जरांगे पाटील यांचा मुंबईत आंदोलनाचा मानस, मराठा आरक्षणावरून नवा सस्पेन्स
'पान मसाला जाहिरातींवरील कारवाईला उशीर, आता १० लाखांचा दंड'
पान मसाला जाहिरातींवरील कारवाईला उशीर, आता कठोर पाऊले उचलणार: तुकाराम मुंढे
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली; मराठवाडा दौरा रद्द
अशक्तपणा आणि ताप, मनोज जरांगे पाटील यांच्यावर जालन्यात उपचार सुरू
विधानसभा अध्यक्षांनी अधिकारांची...शिवसेनेच्या सुनावणीत काय काय घडलं?
विधानसभा अध्यक्षांनी अधिकारांची मर्यादा ओलांडली अन्.... शिवसेनेच्या सुनावणीत आत्तापर्यंत काय काय घडलं? A टू Z माहिती
केरळम्'चे गृहमंत्री पदाचा फायदा घेतात हे... चंद्रशेखर बावनकुळे संतापले
केरळम्'चे गृहमंत्री पदाचा फायदा घेतात हे... चंद्रशेखर बावनकुळे संतापलेच, नेमकं काय घडलं?
रस्ते आहेत, अपघात होणारच; बालकाच्या मृत्यूनंतर नेत्याचं धक्कदायक विधान
रस्ते आहेत तर अपघात होणारच; भोरमधील बालकाच्या मृत्यूनंतर शंकर मांडेकरांच्या विधानाने खळबळ
मुंबईकरांनो सावधान! 4 हजारहुन अधिक... मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोस
मुंबईकरांनो सावधान! 4 हजारहुन अधिक... मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ
अध्यक्षांच्या गोंधळलेल्या भूमिकेमुळे... सुनावणीनंतर ठाकरे गटातील...
अध्यक्षांच्या गोंधळलेल्या भूमिकेमुळे... सुनावणीनंतर ठाकरे गटातील बड्या नेत्याची सुचक प्रतिक्रिया