AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माजी राज्यपालांनी सांगितलं ते योग्यच ! कोश्यारी यांच्या गौप्यस्फोटावर देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले

माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या दाव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल यांच्या भूमिकेचे समर्थन करत उद्धव ठाकरे यांचा इगो होता असे म्हंटले आहे.

माजी राज्यपालांनी सांगितलं ते योग्यच ! कोश्यारी यांच्या गौप्यस्फोटावर देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Image Credit source: Google
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Feb 21, 2023 | 3:56 PM
Share

पुणे : माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Bhagatsing Koshyari ) यांनी उद्धव ठाकरे यांनी मला 12 आमदारांच्या नियुक्तीचे पत्र दिले ते धमकी वजा पत्र असल्याचा खळबळजनक आरोप केल्याचे समोर आले होते. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पत्र अजित पवार यांनी लिहीलेलं नाही तर ते पत्र उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी लिहीलेलं होतं, तसेच माजी राज्यपालांनी सांगितलं ते योग्यच आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं आहे. खरंतर गेल्या काही दोन वर्षांपासून विधानपरिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीवरुन उलटसुलट चर्चा सुरू आहे. अशातच भगतसिंह कोश्यारी यांनी विधान करून खळबळ उडवून दिली आहे.

महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एक मोठा दावा केला आहे. त्यामध्ये म्हंटलय 12 आमदारांची यादीसोबत जे पत्र दिले ते धमकी वजा पत्र होतं. 12 आमदारांच्या नियुक्तीसाठी जे पत्र दिलं त्यातून मला धमकी देण्यात आली होती.

असा खळबळ जनक दावा करत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केला त्यामुळे 12 आमदारांची नियुक्ती केली नसल्याचा खुलासा केला आहे. त्यासाठी जो फॉरमॅट असायला हवा त्याची मागणी राज्यपाल यांनी केली होती.

ज्यावेळी तिन्ही पक्षांचे नेते राजभवन येथे भगतसिंह कोश्यारी यांना भेटायला गेले होते तेव्हा राज्यपालांनी त्यांना सल्ला दिला होता. अशा धमकीच्या पत्रावर राज्यपाल कधीच कारवाई करत नाहत. योग्य फॉरमॅटमध्ये पत्र पाठवा.

तेव्हा त्यांचाही इगो होता त्यामुळे त्यांनी आम्ही बदलणार नाही असं सांगितलं असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

महाविकास आघाडीच्या काळात राज्यपाल विरुद्ध सरकार असा सामना सुरू असतांनाच 12 आमदारांचा मुद्दा हा देखील एक विषय समोर आला होता. त्यावरू महाविकास आघाडी सरकार विरुद्ध राज्यपाल असा सामना अधिकच रंगला होता.

तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपाल पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्या 12 आमदारांच्या नियुक्तीवरुन खुलासा केला आहे. त्यामुळे राज्यातील 12 आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा पुन्हा चर्चेचा विषय ठरत आहे.

सरकारही गेलं आणि राज्यपालही बदलले गेले तरी देखील 12 आमदारांचा विषय प्रलंबित आहे. महाविकास आघाडीच्या काळात अनेकदा 12 आमदारांच्या नावात बदल करण्यात आल्याचे राज्यपाल यांनी म्हंटले होते.

इतकंच काय हे पत्र देत असतांना 15 दिवसांची मुदत देत मुख्यमंत्री मला आदेश देत होते. त्यामुळे मला त्यांनी धमकी दिल्याने मी त्या नावांची नियुक्ती केली नाही असे जाहीर बोलून टाकले आहे.

राज्यपाल यांच्या या विधानाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य असल्याचे म्हणत उद्धव ठाकरे यांना टोला लागवला आहे. एकूणच यावर उद्धव ठाकरे काही बोलतात का हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच