AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“मराठा समाजाच्या मागण्या योग्य, पण…”; मराठा आरक्षणाबद्दल देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट विधान

मराठा समाजाला त्यांचे हक्क मिळायला हवं, तसेच त्यावेळी समाजात कुठेही दुफळी निर्माण होऊ नये. या दृष्टीने आमचा सातत्याने प्रयत्न आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मराठा समाजाच्या मागण्या योग्य, पण...; मराठा आरक्षणाबद्दल देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट विधान
फडणवीसांनी धर्मवीर तीनची पटकथा लिहिणार असल्याचं म्हणताच राऊतांनी अमित शाहांवरुन निशाणा साधला. महाराष्ट्र लुटायला जे औरंगजेब येत आहेत, त्यांच्यावर फडणवीसांनी चित्रपट काढावा अशी टीका राऊतांनी केली.
| Updated on: Sep 25, 2024 | 12:26 PM
Share

Devendra Fadnavis On Maratha Reservation : गेल्या काही दिवसांपासून मराठा समाज हा सातत्याने आरक्षणाची मागणी करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. “मराठा समाजाला त्यांचे अधिकार आणि आरक्षण हे मिळायलाच हवं, असं आमच्या सरकारचे वचन आहे. मराठा समाजाच्या मागण्या या योग्य आहे. त्यातून मार्ग काढण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत”, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते नवी मुंबईत बोलत होते.

देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांची 91 वी जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी गुणवंत कामगार पुरस्कार वितरण समारंभ आणि माथाडी कामगारांचा भव्य मेळावा पार पडला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाबद्दल एक मोठे वक्तव्य केले.

“दुर्दैवाने त्यानंतर ते टिकू शकले नाही”

“दरवर्षी अण्णासाहेब पाटील यांची जयंती साजरी करण्यासाठी आपण इथे जमतो. मराठा समाजाची चळवळ उभी झाली ती अण्णासाहेब पाटील यांच्या निमित्ताने उभी झाली. मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. देशात मराठा आरक्षण हे एकमेव आरक्षण होते, जे उच्च न्यायालयात आपण टिकवून दाखवलं. जोपर्यंत मी मुख्यमंत्री होतो, तेव्हा सर्वोच्च न्यायालयातही ते टिकलं. पण दुर्दैवाने त्यानंतर ते टिकू शकले नाही”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“मराठा समाजाची पिळवणूक आणि फरफट होता कामा नये”

“पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात 10 टक्के आरक्षण दिलं. मोदींनीही EWS चेही आरक्षण दिलं. त्याचाही फायदा मराठा समाजाला झाला. पण सातत्याने वेगळ्या आरक्षणाची मागणी होत असल्याने शिंदेंच्या नेतृत्वात आम्ही 10 टक्के आरक्षण दिले. आज वेगवेगळ्या मागण्या होत आहेत, त्या चुकीच्या आहेत असं मी म्हणणार नाही. पण आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण जी कोणतीही मागणी ती कायद्याच्या चौकटीत बसली पाहिजे, अन्यथा आपण एखादा निर्णय घ्यायाचा आणि कायद्याच्या चौकटी बसला नाही म्हणून तो निर्णय न्यायालयाने रद्द करायचा, अशाप्रकारे वारंवार पिळवणूक आणि फरफट मराठा समाजाची होता कामा नये. त्यामुळे यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्हीही करत आहोत”, असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले.

“समाजात दुफळी निर्माण होऊ नये म्हणून प्रयत्न”

“कारण मराठा समाजाने विविध समाजाचे नेतृत्व केलं आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे १८ पगड जातीचे मावळे एकमेकांविरोधात उभे आहेत, अशाप्रकारचे चित्र उभं राहणं हे महाराष्ट्रासाठी योग्य नाही. ते उभं होऊ नये, असा सर्वांचा प्रयत्न आहे. त्यामुळे आमच्या सरकारचे वचन आहे की मराठा समाजाला त्यांचे अधिकार आणि आरक्षण हे मिळायलाच हवं. पोलीस भरतीतही मराठा आरक्षण दिले. मराठा समाजाला त्यांचे हक्क मिळायला हवं, तसेच त्यावेळी समाजात कुठेही दुफळी निर्माण होऊ नये. या दृष्टीने आमचा सातत्याने प्रयत्न आहे”, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.