AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ekanth Shinde : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा धक्कादायक निर्णय

Ekanth Shinde : आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. आज अधिवेशनाला सुरुवात होण्याआधीच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र दिले आहे.

Ekanth Shinde : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा धक्कादायक निर्णय
Eknath Shinde
| Updated on: Feb 23, 2026 | 12:41 PM
Share

आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. येत्या 6 मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. वित्त खातं हे अजित पवार यांच्याकडे होतं. पण मागच्या महिन्यात बारामती येथे अजित पवारांवर काळाने घाला घातला. भीषण विमान अपघातात अजित पवार यांचं निधन झालं. आता त्यांच्याकडे असलेल्या अर्थ खात्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. दरम्यान आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

अधिवेशन काळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असणाऱ्या खात्यांची जबाबदारी इतर मंत्र्यांवर सोपवण्यात आली आहे. उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अध्यक्षांना तसं पत्र दिलं आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी मंत्री दादाजी भुसे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. नगर विकास विभागाची जबाबदारी मंत्री उदय सामंत यांच्याकडे दिली आहे. तर गृहनिर्माण विभागाची जबाबदारी मंत्री शंभूराजे देसाई यांच्यावर आहे. अधिवेशन काळात एकनाथ शिंदे यांनी अचानक घेतलेल्या या निर्णयाने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. पण अधिवेशन काळात येणाऱ्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी या मंत्र्यांकडे खाते दिले आहे. तात्पुरती व्यवस्था म्हणून शिंदे यांनी हा निर्णय घेतला आहे.

अधिवेशन हे विरोधी पक्ष नेत्याविनाच

राज्यात आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. अधिवेशनामध्ये सरकारला घेरण्यासाठी विरोधकांकडून रणनीती आखण्यात आली आहे. यंदाचा अधिवेशन हे विरोधी पक्ष नेत्याविनाच होणार आहे. राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून, हे अधिवेशन 25 मार्चपर्यंत चालणार आहे. तसेच 6 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

राज्यपालांच्या अभिभाषणाने सुरुवात होणार

आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने होईल. त्यानंतर अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडला जाईल. यामध्ये अजित पवार यांच्या आठवणींना आमदार उजाळा देतील. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा परिचय सभागृहाला करून देतील.

अजित पवार यांच्या शोकप्रस्तावर कोण भाषण करणार?

विधानसभेत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत शोकप्रस्ताव मांडला जाणार. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह प्रत्येक पक्षाचे गटनेते आणि तीन सदस्य अजित पवार यांच्या शोकप्रस्तावर भाषण करणार. प्रत्येक वेळी शोकप्रस्ताव विधानसभा अध्यक्षांकडून मांडला जातो आणि त्यांच्याकडूनच शोकप्रस्ताव वाचून दाखवला जातो. मात्र, काही सदस्यांकडून सभागृहात अजित पवार यांचा शोकप्रस्तावावर मत मांडण्याचा आग्रह होता.

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल