AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगायची – एकनाथ शिंदेंचा थेट निशाणा

औरंगजेब जेवढा क्रूर शासक होता, आज फडणवीस सुद्धा तेवढेच क्रूर आहेत. नेहमी धर्माचा आधार घेतात” असं वक्तव्य हर्षवर्धन सपकाळ यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्यामुळे सत्ताधारी नेते चांगलेच आक्रमक झाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही सपकाळ यांच्या विधानाचा समाचार घेत त्यांना खडे बोल सुनावले.

Eknath Shinde : जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगायची - एकनाथ  शिंदेंचा थेट निशाणा
एकनाथ शिंदे भडकलेImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Mar 18, 2025 | 12:00 PM
Share

ज्या औरंगजेबाने हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले, त्याची तुलना तुम्ही राज्याच्या, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी करता ? आम्ही शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेऊन राज्य चालवतो,सर्वसामान्य लोकांना न्याया देण्याचं काम करतोय. मी मुख्यमंत्री असताना आम्ही अनेक योजना सुरू केल्या, अनेक लोकाभिमुख कल्याणकारी योजना सुरू केल्या, या राज्याला विकासाकडे नेलं. अडीच वर्ष आम्ही काम केलं, त्याची पोचपावती म्हणून जननेते आम्हाला लँडस्लाईड मँडेट दिलं. आता मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि आम्ही टीम म्हणून काम करत आहोत.

या राज्यातल्या जनतेला सुखी समाधानी करण्याचा आमचा अजेंडा आहे. कुठे औरंगजेब आणि कुठे देवेंद्र फडणवीस हे ? अशी तुलना करण्यापूर्वी त्यांना जनाची नाही तर मनाची तर ( लाज वाटायला) पाहिजे होती, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर थेट निशाणा साधला. औरंगजेबाचं उदात्तीकरण करणाऱ्या लोकांना महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही, असा इशाराही शिंदे यांनी दिला.

औरंगजेब जेवढा क्रूर शासक होता, आज फडणवीस सुद्धा तेवढेच क्रूर आहेत. नेहमी धर्माचा आधार घेतात” असं वक्तव्य हर्षवर्धन सपकाळ यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्यामुळे सत्ताधारी नेते चांगलेच आक्रमक झाले असून त्यांच्या या विधानाचा निषेध केला जात आहे. आज माध्यमांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही सपकाळ यांच्या विधानाचा समाचार घेत त्यांना खडे बोल सुनावले.

औरंगजेब यांचा कोण लागतो ?

मुघल शासक असलेला औरंगजेब हा महाराष्ट्राचा घास घ्यायला, महाराष्ट्र उद्ध्वस्त करायला आला होता. त्याचं समर्थन करणारा कोणीही असेल, त्याला सोडण्यात येणार नाही. या देशातील सच्चा मुसलमान जो आहे, तोही औरंगजेबाचं समर्थन करणार नाही. मग हे समर्थन का करत आहेत ? मग यांचा औरंगजेब कोण लागतो ? नातेवाईक लागतोय की सगासोयरा लागतो का आणखी कोण लागतोय ?असा तिखट सवाल शिंदे यांनी विचारला. औरंगजेब हा देशद्रोही आहे, तो राष्ट्रद्रोही आहे. महाराष्ट्रातील, देशभक्त जनता ही त्याला सहन करणार नाही असेही शिंदे म्हणाले.

महाराष्ट्रातील औरंगजेबाची कबर या मुद्यावरून राज्यातलं रान पेटलं असून ती कबर उखडून काढा असं सत्ताधारी पक्षातील अनेकांचं म्हणणं आहे. याच कबरीच्या मुद्यावरून काल नागपुरात हिंसा , दगडफेक झाली, पोलिसही जखमी झाले. सध्या शहरात तणाव असून संचारबंदीही लागू करण्यात आली. एकीकडे या मुद्यावरून वातावरण तापलं आहे, तर दुसरीकडे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमत्री फणडणवीसांवर टीका करताना त्यांची औरंगजेबाशी तुलना केल्याने आणखीनच वाद चिघधळला आहे. त्यातच आता एकनाथ शिंदे यांनी हे विधान केलं आहे.

Follow Us
गॅसचे दरवाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दरवाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय.
खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल, एकूण गुन्ह्यांची संख्या १०, हवाला रॅकेट..
खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल, एकूण गुन्ह्यांची संख्या १०, हवाला रॅकेट...
रुपाली चाकणकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार ? काय म्हणाल्या अंधारे?
रुपाली चाकणकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार ? काय म्हणाल्या अंधारे?.
'ऑल पार्टी मिटींगला जे उपस्थित नाहीत ते...', राऊत यांची मोदींवर टीका
'ऑल पार्टी मिटींगला जे उपस्थित नाहीत ते...', राऊत यांची मोदींवर टीका.
रत्नागिरीत अवकाळी पावसाचा आंब्यांना फटका, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
रत्नागिरीत अवकाळी पावसाचा आंब्यांना फटका, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.
'कर्माचे फळ...,' चाकणकरांच्या राजीनाम्यावर दमानिया यांची प्रतिक्रीया
'कर्माचे फळ...,' चाकणकरांच्या राजीनाम्यावर दमानिया यांची प्रतिक्रीया.