AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धीरज देशमुख यांचा पराभव, अमित देशमुख फक्त 1800 मतांनी आघाडीवर

काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या लातूरमध्ये धीरज देखमुख यांना पराभवाचा धक्का बसला आहे. लातूर ग्रामीणमधून धीरज देशमुख यांचा पराभव झाला. तर लातूर शहर मधून अमित देशमुख हे फक्त १८०० मतांना आघाडीवर आहेत. त्यामुळे येथेही कांटे की टक्कर आहे.

धीरज देशमुख यांचा पराभव, अमित देशमुख फक्त 1800 मतांनी आघाडीवर
| Updated on: Nov 23, 2024 | 3:37 PM
Share

राज्यातल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास लागला आहे. राज्यात महाविकासाघाडीला मोठा झटका बसला आहे. लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदावर धीरज विलासराव देशमुख यांना पराभवाचा मोठा धक्का बसला आहे.  गेल्या निवडणुकीत त्यांना १ लाखांची लीड मिळाली होती. पण या निवडणुकीत त्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. लातूर ग्रामीण मधून भाजपच्या रमेश कराड यांचा विजय झाला आहे.

दुसरीकडे लातूर शहर मतदारसंघातून अमित देशमुख फक्त १८०० मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे येथे ही अतीतटीची लढत आहे.  काँग्रेसची सर्वात सुरक्षित जागा मानल्या जाणाऱ्या लातूर ग्रामीण आणि लातूर शहरात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. मतमोजणी सुरू झाली तेव्हा या जागेवरून काँग्रेसचे अमित विलासराव देशमुख आघाडीवर होते, तर मतमोजणीच्या सहाव्या फेरीत भाजपच्या डॉ अर्चना पाटील चाकूरकर पुढे गेल्या.

लातूर शहरात माजी गृहमंत्री शिवराज पाटील यांची सून डॉ.अर्चना पाटील चाकूरकर यांना भाजपने काँग्रेसच्या विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित देशमुख यांच्या विरोधात रिंगणात उतरवण्यात आले होते. अमित देशमुख हे येथून तीन वेळा आमदार आहेत. याआधी राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत नेते विलासराव देशमुख 5 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.