AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेना नेत्याने फोडली मंत्रिमंडळाच्या आतली बातमी, ‘आता दर तीन महिन्यांनी…’

अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसावर शिरसाट म्हणाले, ते मोठे नेते आहेत. ते शहरात काय मुंबईतही वाढदिवस साजरा करू शकतात. त्यांचा वाढदिवस माझ्या शुभेच्छा आहेत. ते म्हणतात मी पुन्हा येईन. अडीच वर्षानंतर ते येणार असल्याचे म्हणतात. परंतु त्याचा निर्णय शिंदे साहेब घेतील.

शिवसेना नेत्याने फोडली मंत्रिमंडळाच्या आतली बातमी, 'आता दर तीन महिन्यांनी...'
ajit pawar devendra fadnavis eknath shinde
| Updated on: Dec 22, 2024 | 3:46 PM
Share

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार १५ डिसेंबर रोजी झाली होता. त्यानंतर २१ डिसेंबर रोजी खाते वाटप जाहीर करण्यात आले. मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेले आमदार खूश आहेत तर ज्यांचा समावेश झाला नाही ते नाराज आहेत. आता मंत्रिमंडळासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निकष ठरवले आहेत. ते निकष काही आहे, त्याची माहिती शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी दिली.

काय म्हणाले संजय शिरसाट?

मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या कामांचा आता दर तीन महिन्यांनी आढावा घेतला जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक मंत्र्यास काम करणे गरजेचे आहे. जे शिवसेनेचे मंत्री काम करणार नाही त्यांची खाती काढून घेतले जाणार आहे. म्हणजेच ज्यांची कामगिरी चांगली नसले त्यांचे मंत्रिपद जाणार आहे, असे शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी सांगितले असल्याचे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.

संजय शिरसाट म्हणाले, शिंदे साहेबांनी माझ्यावर नवीन जबाबदारी टाकली आहे. ज्या सामाजिक न्याय खात्याची मला जबाबदारी दिली आहे, त्याचे काम लगेच सुरु करणार आहे. संभाजीनगरचे पालकमंत्रीपद कोणाला मिळणार, हे वरिष्ठ नेते ठरवणार आहे.

जमीन बळकविण्याची जी काम सुरु आहे, ती थांबविण्याकडे माझे लक्ष असणार आहे. मग जमीन बळकवणारा कोणत्याही पक्षाचा असो त्याच्यावर कारवाई केली जाईल. सिल्लोड असो की छत्रपती संभाजीनगर कुठेही जमीन बळकवणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यात येईल, असे संजय शिरसाट यांनी म्हटले.

कुणीही पालकमंत्री असो, आमदार असो की खासदार असो, शासकीय निधीचा दुरुपयोग करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत समान निधीचे वाटप करण्यात येईल. जर असमान निधीचा वाटप झाला असेल तर कारवाई होणार आहे. त्यासाठी डीपीडीसीचा अहवाल आपण मागितला आहे, असे संजय शिरसाट यांनी सांगितले.

अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसावर शिरसाट म्हणाले, ते मोठे नेते आहेत. ते शहरात काय मुंबईतही वाढदिवस साजरा करू शकतात. त्यांचा वाढदिवस माझ्या शुभेच्छा आहेत. ते म्हणतात मी पुन्हा येईन. अडीच वर्षानंतर ते येणार असल्याचे म्हणतात. परंतु त्याचा निर्णय शिंदे साहेब घेतील.

Follow Us
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दरवाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दरवाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय.