AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रवाशांचे हाल होत आहेत; कामावर रुजू व्हा, एसटी महामंडळाचे कर्मचाऱ्यांना भावनिक आवाहन

आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. कर्मचारी संपावर ठाम असल्याने आता महामंडळाकडून त्यांना कामावर पुन्हा रुजू होण्यासाठी भावनिक आवाहन करण्यात आले आहे.

प्रवाशांचे हाल होत आहेत; कामावर रुजू व्हा, एसटी महामंडळाचे कर्मचाऱ्यांना भावनिक आवाहन
| Edited By: | Updated on: Nov 12, 2021 | 11:15 AM
Share

मुंबई – आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांचे गेल्या चार – पाच दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहेत. तसेच एसटी महामंडळाला दिवसाला 12 कोटींचा तोटा सहन करावा लागतोय. कर्मचारी आपल्या संपावर ठाम असल्याने आता महामंडळाकडून कर्मचाऱ्यांना भावनिक आवाहन करण्यात आले आहे. महामंडळाच्या वतीने एक जाहीर पत्रक काढण्यात आले  आहे. या पत्रकातून कर्मचाऱ्यांना कामावर पुन्हा एकदा रुजू होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

काय आहे पत्रक?

महामंडळ 12 हजार कोटी रुपयांच्या संचित तोट्यात असताना देखील कर्मचाऱ्यांना 18 महिन्यांचा पगार देण्यात आला आहे. यापुढे देखील सर्व वेतन वेळेत देण्याचा महामंडळाचा प्रयत्न असेल. कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार महागाई भत्ता 28 टक्के तर घर भाडे 8 हजार रुपये मान्य करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांनी केलेल्या संपामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहेत. महामंडळाला देखील दिवसा काठी 12 कोटींचा तोटा सहन करावा लागत आहे. कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या या संपाचा परिणाम संस्था आणि कर्मचाऱ्यांना दीर्घकाळ भोगावे लागतील. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी तातडीने कामावर रुजू व्हावे, त्यांच्या इतर मागण्या देखील हळूहळू पूर्ण केल्या जातील असे आवाहन या पत्रकातून कर्मचाऱ्यांना करण्यात आले आहे.

काय आहेत आंदोलकांच्या मागण्या?

एसटी कर्मचाऱ्यांना तुटपुंजा पगार मिळतो, याच वेतनामध्ये त्यांना आपले घर चालवावे लागते. मागील काही महिन्यांपासून हे वेतनही वेळेवर मिळालेले नाही. कोरोना काळात त्यांच्या अतिरिक्त ड्युट्या लावण्यात आल्या होत्या, मात्र पगार मिळाला नाही. अशा विविध कारणांमुळे अखेर एसटी कर्मचाऱ्यांच्या संयमाचा बांध फुटला आणि त्यांनी राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे. एसटी महामंंडळाचे शासकीय सेवेत विलगिकरण करावे आणि कर्मचाऱ्यांना क दर्जा देण्यात यावा अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. या मागणीसोबतच वेतन वेळेवर मिळावे, महागाई भत्ता वाढावा अशा अनेक मागण्या त्यांनी केल्या आहेत.

संबंधित बातम्या 

कंगनाबेनला दिलेले पुरस्कार परत घ्या; लाज लज्जा असेल तर तिने देशाची माफी मागावी, संजय राऊत भडकले

महाविकास आघाडी सरकारला हद्दपार करणार; मुंबईत येताच नड्डांचा हुंकार

पिकांचे भाव माहित नाहीत; गांजा किती रुपयांना मिळतो हे बरोबर ठावूक असते, विखेंचा मलिकांवर निशाणा

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.