पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान, उभ्या पिकाला कोंब

राज्यात परतीच्या पावसाने अनेक जिल्ह्यात थैमान (Farmers lost crop due to rain) घताले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान, उभ्या पिकाला कोंब
Follow us
| Updated on: Oct 29, 2019 | 4:32 PM

अकोला : राज्यात परतीच्या पावसाने अनेक जिल्ह्यात थैमान (Farmers lost crop due to rain) घातले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अकोला जिल्ह्यात परतीच्याने पावसामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान (Farmers lost crop due to rain) झाले. तर कोकणात भात शेतींसह नाचणी आणि वरी कुजून गेली. शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिसकावून घेतला आहे.

शेतकऱ्यांनी शेतात सोयाबीन आणि कापूस पिकवला होता. पण पावसामुळे या पिकांचं नुकसान झालं आहे. सोयाबीनच्या पिकाला जागेवर परतीच्या पावसामुळे कोंब फुटले आहे. तर कोकणातील नाचणीच्या पिकांना पुन्हा अंकुर फुटले आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

यवतमाळमध्येही कपाशी, सोयाबीन आणि तुरीच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. परतीचा पाऊस गेले 10 ते 15 दिवस सलग कोसळत असल्याने पाणी साचून पिकांचे नुकसान झाले आहे. सरकारने तातडीने शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी आता केली जात आहे.

राज्यातील शेतकरी हा नेहमीच संकटात सापडतो. कधी कोरडा दुष्काळ तर कधीओला दुष्काळ, पण यावेळी शेतकऱ्यांना वेगळ्याच संकटाचा सामना करावा लागत आहे. ऐन दिवाळीच्या दिवसात शेतकरी कपाशी काढण्याच्या व सोयाबीन सोंगण्याच्या तयारीत असताना अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्याची धांदल उडाली. परतीचा पाऊस एक दिवस नव्हे तर चक्क 15 दिवसांची हजेरी लावल्याने उभ्या सोयाबीनला कोंब फुटले.

दरम्यान, शेतकऱ्याचे नुकसान झाल्यामुळे सरकार काही मदत करेल का या प्रतीक्षेत शेतकरी बसला आहे. परतीच्या पावसांमुळे राज्यातील अनेक ठिकाणी मोठं नुकसान झालं आहे.

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.