AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी बायकोला माहेरी सोडलं अन् चार मुलांना विहिरीत ढकलून स्वत:लाही संपवलं; महाराष्ट्र हादरला

Crime News : जामोद तालुक्यातील भाले अंजन गावातील एका व्यक्तीने आपल्या 4 मुलांना विहिरीत ढकलून स्वत:लाही संपनल्याची घटना घडली आहे, त्यामुळे संपूर्ण परिसर हादरला आहे.

आधी बायकोला माहेरी सोडलं अन् चार मुलांना विहिरीत ढकलून स्वत:लाही संपवलं; महाराष्ट्र हादरला
Jalgaon Crime Image Credit source: Google
| Updated on: May 25, 2026 | 4:51 PM
Share

जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा धरण परिसरात असलेल्या एका शेतातील विहिरीत पाच मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. जामोद तालुक्यातील भाले अंजन गावातील विजय मुसा किराडिया याने आपली मुले प्रित किराडिया, प्राची किराडिया, पूर्वी किराडिया आणि पियुष किराडिया या चार मुलांसह राजुरा धरण परिसरातील विहिरीत आधी ढकलून नंतर स्वतः आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पत्नीसोबत वाद झाल्याने उचलले टोकाचे पाऊल

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काल विजय यांचे आपल्या पत्नीसोबत कडाक्याचे भांडण झाले. त्यामुळे विजय यांची पत्नी मुलांना सोडून माहेरी निघून गेली होती. त्यामुळे विजय चिंतेत होते. आज सकाळी विजय यांना आपल्या मुलांना चहा करून पाजला. त्यानंतर ते घरातील घरकाम करत असताना त्यांच्या वडिलांनी, तू स्वतः काम का करतो तुझी बायको कुठे गेली? असं विचारलं.

आधी मुलांना विहिरीत ढकलले आणि नंतर आत्महत्या

वडिलांनी विचारल्यामुळे विजय यांना आणखी मानसिक त्रास झाला आणि त्यांनी रागाच्या भरात आपल्या चारही मुलांना घेत जवळची विहीर गाठली. त्यानंतर त्यांनी आपल्या चारही मुलांना विहिरीत ढकलून दिले आणि स्वतःही आत्महत्या केली आहे. मुलांना विहिरीत टाकल्यानंतर त्यांनी स्वतः विहिरीच्या कडेला दोरीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला; परंतु वजनामुळे दोरी तुटली आणि हेही विहिरीत पडले. त्यामुळे पाचही जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

पोलिसांकडून तपासाला सुरुवात

या घटनेच्या काही वेळानंतर शेताचे मालक तिथे आले असता, त्यांना विहिरीच्या काठावर मोबाईल, चपला आणि कापलेली दोरी आढळून आली. त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता त्यांच्या पायाखालची जमीन सरकली, त्यांना मृतदेह दिसले. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती जळगाव जामोद पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाचही मृतदेह विहिरीबाहेर काढले. हे सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा