AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पालघरमध्ये रासायनिक कारखान्यात गॅस गळती, दहा कामगारांची प्रकृती बिघडली

पालघर जिल्ह्यातल्या बोईसरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका रासायनिक कारखान्यामध्ये निष्काळजीमुळे गॅस गळती झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत दहा पेक्षा अधिक कामगारांची प्रकृती बिघडली आहे.

पालघरमध्ये रासायनिक कारखान्यात गॅस गळती, दहा कामगारांची प्रकृती बिघडली
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 18, 2025 | 7:26 PM
Share

पालघर जिल्ह्यातल्या बोईसरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका रासायनिक कारखान्यामध्ये निष्काळजीमुळे गॅस गळती झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत दहा पेक्षा अधिक कामगारांची प्रकृती बिघडली आहे. ही दुर्दैवी घटना बोईसच्या तारापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये घडली आहे. विशेष म्हणजे जेव्हा गॅस गळतीमुळे कामगारांची प्रकृती बिघडल्याचं लक्षात आलं तेव्हा या रासायनिक कारखान्याच्या मॅनेजरनं ही घटना दाबवण्याचा प्रयत्न केला असा आरोप होत आहे. या घटनेनंतर कारखान्याच्या व्यवस्थापकानं सर्व मजुरांना दुसऱ्या ठिकाणी हलवलं.

मात्र जेव्हा कामगारांना तीव्र वेदना होऊ लागल्या, डोळ्यांमध्ये आणि नाकामध्ये तीव्र जळजळ जाणवू लागली, त्यांची प्रकृती खालावली तेव्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, या कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाची पाहाणी केली.

प्रकृती खालवल्यानंतर केलं रुग्णालयात दाखल

मिळालेल्या माहितीनुसार हा गॅस इतका विषारी होता की, या गॅसच्या संपर्कात जे मजूर आले, त्यांना तीव्र वेदना होऊ लागल्या, त्यांच्या डोळ्यात आणि नाकात तीव्र जळजळ होऊ लागली, त्यांची प्रकृती खालावली, ते जोरजोरात ओरडून लागले. सुरुवातीला या कारखान्याच्या व्यवस्थापकानं हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र कामगारांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, या कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानं हे प्रकरण समोर आलं आहे.

धक्कादायक बाब म्हणजे कोणतीही सुरक्षिततेची काळजी न घेता या कारखान्यामध्ये धोकादायक केमिकलचं उत्पादन सुरू होतं. यामुळे पुन्हा एकदा कामगारांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. सध्या या कामगारांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन, घटनास्थळाची पाहाणी केली. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.  यामुळे कामगारांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.  कोणतीही सुरक्षेची काळजी घेण्यात आली नव्हती अशी माहिती समोर येत आहे.

Follow Us
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात.
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?.
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.