AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हात धुवा, सॅनिटायझर लावा असं बोंबलून चालणार नाही, खांद्याला खांदा लावून काम करा : गिरीश महाजन

भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी कोरोना नियंत्रणात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे (Girish Mahajan criticize Thackeray Government on Corona prevention).

हात धुवा, सॅनिटायझर लावा असं बोंबलून चालणार नाही, खांद्याला खांदा लावून काम करा : गिरीश महाजन
| Updated on: Jun 07, 2020 | 6:12 PM
Share

नाशिक : भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी कोरोना नियंत्रणात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे (Girish Mahajan criticize Thackeray Government on Corona prevention). तसेच केवळ घरात बसून हात धुवा, सॅनिटायझर लावा असं बोंबलून चालणार नाही. खांद्याला खांदा लावून काम करा, असं मत यावेळी गिरीश महाजन यांनी व्यक्त केलं. ते नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना उत्तरं दिली.

गिरीश महाजन म्हणाले, “देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या जास्त वाढली. मुंबईत कोरोनाने कहर केला आहे. अक्षरशः धिंगाणा घातला आहे. राज्य सरकारने ढिसाळ निर्णय घेतले म्हणूनच महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. राज्यात नियोजनाचा मोठा अभाव आहे. अनेक नेते अजून घराच्या बाहेर निघत नाही. फक्त हात धुवा, सॅनिटायझर लावा असं बोंबलून चालणार नाही. फक्त लढ म्हणून चालणार नाही, खांद्याला खांदा लावून काम करायला हवं.”

“टेस्टिंगबाबत मोठा गोंधळ आहे. जळगावला तर 12 दिवसांनी रिपोर्ट येतो. म्हणून झपाट्याने संख्या वाढली. दुर्दैवाने अजून चांगलं काम नाही. पदाधिकारी आणि अधिकारी यांच्यात समन्वय नाही. घरात बसून भाषण ऐकायला चांगलं वाटतं, मात्र सरकार अपयशी ठरलं आहे. संख्या वाढू नये म्हणून आकडे लपवत बसू नका. खासगी लॅब बंद केल्या काय तर म्हणे आकडे वाढत आहेत. सरकार लोकांच्या जीवाशी खेळ करत आहे. जळगावला तर स्वॅब गायब केले आहेत. यंत्रणा व्यवस्थित नसताना बदल्या करुन काहीही होणार नाही. अपयश झाकण्यासाठी उचल टाक करुन चालणार नाही,” असंही गिरीश महाजन म्हणाले.

“सोनू सूदने दुर्दैवी प्रसंगी मदत केली, तर त्यात चुकीचं काय?”

गिरीश महाजन यांनी यावेळी सामनातून अभिनेता सोनू सूदवर झालेल्या टीकेवरही भाष्य केलं. ते म्हणाले, “सोनू सूद मदत करणाऱ्यांपैकी एक आहे. दुर्दैवी प्रसंगी मदत केली तर त्यात चुकीचं काय आहे. सामनातून टीका करणं योग्य नाही.”

चक्रीवादळामुळे कोकणात मोठं नुकसान झालं. त्यासाठी 100 कोटी रुपयांच्या मदतीने काही होणार नाही. मुख्यमंत्र्यानी मोठी मदत करावी, अशी मागणीही गिरीश महाजन यांनी यावेळी केली. कोरोनाच्या संकटात केंद्राने योग्य निर्णय घेतल्याने इतर देशांच्या तुलनेत आपलं नुकसान कमी झालं आहे, असाही दावा त्यांनी केला. ते म्हणाले, “6 वर्षात देशात ऐतिहासिक निर्णय घेतले गेले. स्वप्नवत वाटणारा 370 कलम हटवण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या छुप्या कारवायांना आळा बसला. सीएए कायदा बहुमताने पारित केला. राममंदिर प्रश्न संयम ठेऊन कोर्टाच्या निर्णयानुसार सोडवला.”

संबंधित बातम्या :

राज्यात 60 कारागृहातील कैद्यांना पॅरोलवर सोडण्याचा निर्णय, आणखी 7 हजार कैद्यांना सोडणार : गृहमंत्री

सोनू सूदवर ‘सामना’तील टीकेला भाजप-मनसेतून उत्तर, निरुपम यांच्याही कानपिचक्या

‘आध्यात्मिक पुस्तकं वाचा, मन:शांती लाभेल’, हसन मुश्रीफांचा देवेंद्र फडणवीसांना सल्ला

Girish Mahajan criticize Thackeray Government on Corona prevention

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.