AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gondia News : स्वातंत्रदिनाच्या सु्ट्टीनिमित्त चार शिक्षक पिकनिकला गेले होते, मात्र एकच परतला, तिघांसोबत काय घडलं?

दोन दिवस सलग सुट्टी आल्याने चार मित्रांनी पिकनिकचा प्लान केला. त्यानुसार चौघे धरणावर पिकनिकला गेले. मात्र ही पिकनिक त्यांच्यासाठी अखेरची ठरली. पाण्यात पोहायला गेलेले तिघे पुन्हा बाहेर आलेच नाहीत.

Gondia News : स्वातंत्रदिनाच्या सु्ट्टीनिमित्त चार शिक्षक पिकनिकला गेले होते, मात्र एकच परतला, तिघांसोबत काय घडलं?
गोंदियात पिकनिकला गेलेले तीन शिक्षक धरणात बुडालेImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Aug 16, 2023 | 1:59 PM
Share

गोंदिया / 16 ऑगस्ट 2023 : पिकनिकला गेलेल्या तीन मित्रांचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना गोंदियात घडली आहे. तिघेही गोंदियातील एका खाजगी शिकवणी वर्गात शिक्षक पदावर कार्यरत होते. एन. मिश्रा, अरविंद सर आणि अतुल कडू अशी तिघा मयतांची नावे आहेत. स्वातंत्र्य दिन आणि पतेतीनिमित्त दोन दिवस सुट्टी असल्याने चौघे शिक्षक मित्र सहलीला गेले होते. यावेळी ही दुर्दैवी घटना घडली. मृतांमधील एक छत्तीसगड, एक नागपूर आणि एक नागपूरचा रहिवासी आहे. घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथकाने धरणाच्या बाहेर काढून राजनांदगाव पोलिसांच्या ताब्यात दिले.

दोन दिवसाच्या सुट्टीनिमित्त सहलीला गेले होते चौघे मित्र

गोंदियातील सिद्धीविनायक एज्युकेशन इन्स्टिट्यूट या खाजगी शिकवणी वर्गात चार शिक्षक कार्यरत होते. दोन दिवस सुट्टी असल्याने चौघेही छत्तीसगड राज्यातील भिलाई येथे मित्राच्या आमंत्रणावरुन पिकनिकला गेले होते. राजनांदगाव-सोमनी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या मांगता धरण येथे 15 ऑगस्ट रोजी सहलीसाठी गेले होते. धरणात पोहायला उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने तिघे जण बुडाले.

घटनेची माहिती मिळताच राजनांदगाव पोलीस आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी धाव घेतली. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथकाने तिघांचे मृतेदह पाण्यातून बाहेर काढले. तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी राजनांदगाव जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येतील. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.