AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘क्या तुमने कभी किसी से प्यार किया?’ हिंगोलीतील प्रेमवेड्या तरुण शेतकऱ्याचं थेट उद्धव ठाकरेंना पत्र

हिंगोली जिल्ह्यातील एका प्रेमवेड्या तरुणाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भावनिक पत्र लिहिलं आहे. या पत्रात मुख्यमंत्रीसाहेब, तुम्ही कधी प्रेम केलं आहे का? असा सवाल त्याने मुख्यमंत्र्यांना केलाय.

'क्या तुमने कभी किसी से प्यार किया?' हिंगोलीतील प्रेमवेड्या तरुण शेतकऱ्याचं थेट उद्धव ठाकरेंना पत्र
उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री
| Updated on: Apr 08, 2022 | 5:35 PM
Share

मुंबई : हिंगोली जिल्ह्यातील एका प्रेमवेड्या तरुणाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना भावनिक पत्र (Emotional letter) लिहिलं आहे. या पत्रात मुख्यमंत्रीसाहेब, तुम्ही कधी प्रेम केलं आहे का? असा सवाल त्याने मुख्यमंत्र्यांना केलाय. शेतकरी असल्याने प्रेम करण चुकीचं आहे का? असा सवाल त्याने या पत्रातून विचारला आहे. हे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Latter) होतंय. हिंगोलीतील व्हायरल होणाऱ्या या पत्रात कुणाचंही नाव नाहीये. पण हे पत्र हिंगोली जिल्ह्यातील एक तरुण शेतकऱ्याने लिहिलं असल्याचं या पत्रातील मजकुरावरून लक्षात येतंय. त्याने थेट मुख्यमंत्र्यांना तुम्ही कुणावर प्रेम केलंय का असा प्रश्न विचारलाय. हे पत्र सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे

पत्रातील मजकूर काय आहे?

cm latter

“उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब, पत्र लिहितांना खुप दुःख होत आहे. प्रेम धन दौलतीवर अवलंबून आहे का…? मी प्रेम केलं पण मला शेतजमीन कमी आहे म्हूणन माझ्या प्रेमाला विरोध होत आहे. तुम्ही जनतेचे प्रश्न सोडवता. तुम्ही ही कधी तरी प्रेम केलं आहे का? केलं असेल तर उत्तर दया…” असं म्हणत या तरूणाने थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सवाल विचारलाय. हिर-रांझा, लैला -मजनु, सोनी-महिवाल यांनी प्रेम केलं तर त्यांना मृत्यू का? प्रेमात विरह का? साहेब शेतकरी होऊन प्रेम करणं चुकीचं आहे का? खरं तर तुम्हाला भेटून खुप रडाव वाटतंय कारण आजपर्यंत तुम्ही सगळ्यांचे प्रश्न सोडवले. तुम्ही सगळ्यांचं ऐकून घेता मग माझं का नाही?” असा प्रश्न या तरुणाने उद्धव ठाकरे यांना केलाय.

“या पुरोगामी महाराष्ट्रात प्रेमात आत्महत्या करावी लागत असेल तर मी अशा प्रेमाचा धिक्कार करतो. माझ्या प्रश्नांची उत्तरं दया… मी तुमच्या उत्तराची वाट पाहात आहे. अन्यथा माझ्याकडे आत्महत्या करण्यापलीकडे दुसरा पर्याय नाहीये… “, असा या पत्रातील मजकूर आहे.

हिंगोलीतील व्हायरल होणाऱ्या या पत्रात कुणाचंही नाव नाहीये. पण हे पत्र हिंगोली जिल्ह्यातील एक तरुण शेतकऱ्याने लिहिलं असल्याचं या पत्रातील मजकुरावरून लक्षात येतंय. त्याने थेट मुख्यमंत्र्यांना तुम्ही कुणावर प्रेम केलंय का असा प्रश्न विचारलाय. हे पत्र सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

संबंधित बातम्या

Social Media Trending : वधू-वराला लग्नात पेट्रोल-डिझेल गिफ्ट! सोशल मीडियावर चर्चाच चर्चा…

Video : एमर्जंन्सी लॅंडिंगच्यावेळी विमानाला मोठी दुर्घटना, भीषण आग, विमानाचे जागीच तुकडे

Pushpa Song : पुष्पाचं परदेशी व्हर्जन!, सामी-सामी गाण्यावर पॅरिसमधल्या नागरिकांचा कमाल डान्स, पाहा व्हीडिओ…

... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं
... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं.
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान.
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा.
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी.
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका.
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!.
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक.
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका.
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका.
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक.