AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“एक दिवस काम बंद ठेवून आंदोलनात या”, मनोज जरांगे यांचं आवाहन; आरपारची लढाई सुरू

मनोज जरांगे पाटील यांनी एक दिवस काम बंद ठेऊन आपली ताकद दाखवा, असे आवाहन संपूर्ण मराठा समाजाला केले आहे.

एक दिवस काम बंद ठेवून आंदोलनात या, मनोज जरांगे यांचं आवाहन; आरपारची लढाई सुरू
मनोज जरांगे पाटील
| Updated on: Jul 06, 2024 | 1:27 PM
Share

Manoj Jarange Patil Maratha Reservation Movement : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आजपासून शांतता जनजागृती रॅली काढली जाणार आहे. याची सुरुवात हिंगोली जिल्ह्यापासून होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीची सुरुवात आजपासून होणार आहे. अंतरवाली येथील उपोषणस्थळी ग्रामदेवाचे दर्शन करुन जरांगे पाटील हे दौऱ्याला सुरुवात करणार आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी एक दिवस काम बंद ठेऊन आपली ताकद दाखवा, असे आवाहन संपूर्ण मराठा समाजाला केले आहे.

“आपल्या मुलांसाठी आपल्याला लढावे लागेल”

“मराठा आरक्षणाबाबत जनजागृती करा. येत्या १३ जुलैपर्यंत रॅली असेल. त्यामुळे एक दिवस काम बंद ठेवून आपली ताकद दाखवा. एकट्याच्या आणि सर्वांच्या लढण्यात खूप शक्ती असते. आपल्या मुलांसाठी आपल्याला लढावे लागेल. त्यामुळे या रॅलीत सर्वांनी शक्ती दाखवा”, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.

“हैद्राबाद गॅझेट, सगे सोयरे यांच्याबाबतीत अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा झाली. चर्चा झाल्याशिवाय प्रश्न मार्गी लागत नाही. मी कृती आणि अंमलबजावणीवर जास्त विश्वास ठेवतो. सगे सोयरे कायदा आमच्या व्याख्येप्रमाणे करा. हैदराबाद, बॉम्बे, सातारा गॅझेट स्वीकारा”, अशी मागणीही जरांगे पाटील यांनी यावेळी केली.

“शेती कामांमुळे कमी लोक दिसतील”

“288 उमेदवार उभे करायचे की पडायचे हे समाजाची बैठक घेऊन ठरवू. राजकीय इच्छाशक्ती असेल तर 2 तासातच सर्व प्रश्न मार्गी लागेल. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी सर्व आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावे. सध्या शेती कामे वेगाने सुरू आहे. त्यामुळे रॅलीसाठी कमी लोक दिसतील. शंभुराजे देसाई यांच्याशी मी फोनवरून रात्री बोललो त्यांच्या बोलण्यावरून असं वाटत की त्यांनी कामाला वेग दिला आहे. तसेच मुंबईतही जोरदार रॅली होईल”, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

पाच टप्प्यात रॅली

हिंगोलीपासून मराठा आरक्षण शांतता जनजागृती रॅलीला सुरुवात होत आहे. ही रॅली 5 टप्प्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात होणार आहे. हिंगोलीनंतर परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, जालना आणि संभाजीनगर या ठिकाणी जरांगे पाटील यांच्या शांतता जनजागृती रॅलीचे आयोजन केले जाईल.

राहुल गांधींना नरवणेंच्या पुस्तकावर बोलताना रोखल्याने, काँग्रेस आक्रमक
राहुल गांधींना नरवणेंच्या पुस्तकावर बोलताना रोखल्याने, काँग्रेस आक्रमक.
पालघरमध्ये पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, तब्बल 200 पोलीस तैनात!
पालघरमध्ये पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, तब्बल 200 पोलीस तैनात!.
जयंती नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर
जयंती नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर.
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ.
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची.
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना.
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त.
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु.
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता.
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प.