AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजितदादांचा विमान अपघात नेमका कसा झाला? मुख्यमंत्री फडणवीसांच्या पत्राला विमान वाहतूक मंत्र्यांचं उत्तर, केला मोठा खुलासा

अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला, या विमान अपघातामध्ये अजित पवार यांचं निधन झालं, त्यानंतर या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाला पत्र पाठवलं होतं.

अजितदादांचा विमान अपघात नेमका कसा झाला? मुख्यमंत्री फडणवीसांच्या पत्राला विमान वाहतूक मंत्र्यांचं उत्तर, केला मोठा खुलासा
Ajit Pawar plane crashImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 29, 2026 | 4:13 PM
Share

बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला, ते मुंबईवरून बारामतीकडे निघाले होते, विमान धावपट्टीवर उतरत असतानाच विमानावरील नियंत्रण सुटलं आणि विमान थेट जमिनीला धडकलं, घटनास्थळी मोठा स्फोट झाला, आणि विमानाला आग लागली. या घटनेमध्ये अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. आज अजित पवार यांच्यावर बारामतीमध्ये शोकाकूल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.  अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. आज महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये बंद ठेवून अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. दरम्यान एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री नायडू यांना या अपघातासंदर्भात एक पत्र पाठवलं होतं, त्याला आता केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाकडून उत्तर देण्यात आलं आहे.

अजित पवार यांच्यासारख्या अतिशय वरिष्ठ नेत्याचा विमान अपघातात मृत्यू झाला, आणखी चार जणांनी देखील या अपघातात आपले प्राण गमावले. हा अपघात नेमका कशामुळे घडला? याच्या कारणांची चौकशी करण्यात यावी, अशी या पत्रातून फडणवीस यांनी मागणी केली होती, तसेच भविष्यात असे अपघात घडणार नाहीत, या दृष्टीने तातडीने पाऊले उचलण्यात यावेत असंही फडणवीस यांनी आपल्या पत्रात म्हटलं होतं.

दरम्यान त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांच्या या पत्राला केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री नायडू यांनी उत्तर दिलं आहे. विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) यांनी तपास सुरु केला आहे. विमानातील ब्लॅकबॉक्स ताब्यात घेण्यात आला आहेत. विमान अपघात आणि घटनेचा नियमांनुसार तपास सुरू केला आहे. तो पारदर्शी आणि कालबद्ध पद्धतीने होईल. सर्व टेक्निकल रेकॉर्डस, ऑपरेशनल तपशील, घटनास्थळावरील तथ्य याचा तपास केला जात आहे. भविष्यात अशा घटना होऊ नये, या आपल्या विनंतीची मंत्रालयाने दखल घेतली असून, चौकशी अहवाल येताच त्यादृष्टीने उपाययोजना करण्यात येतील. या चौकशीत महाराष्ट्र सरकारचेही सहकार्य आम्हाला मौल्यवान असेल. स्थानिक प्रशासनाची देखील यात मदत लागेल. हा संपूर्ण चौकशी अहवाल राज्य सरकारलाही आम्ही देऊ, असं नायडू यांनी म्हटलं आहे.

Follow Us
पवनराजे निंबाळकर प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिय
पवनराजे निंबाळकर प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; थेट अमित शाह...
निंबाळकरांचा निर्णय आता उद्धव ठाकरेंच्या कोर्टात!
Omraje Nimbalkar | निंबाळकरांचा निर्णय आता उद्धव ठाकरेंच्या कोर्टात! अनिल देसाईंच्या त्या विधानाने महाराष्ट्रात खळबळ
ओमराजेंचे कट्टर समर्थक कैलास पाटील मातोश्रीवर, राजकारणात मोठं घडणार?
Omraje Nimbalkar | ओमराजेंचे कट्टर समर्थक कैलास पाटील अचानक 'मातोश्री'वर, राजकारणात मोठं घडणार?
मी शिंदे गटात... ओमराजेंचा निर्णय बदलला? त्या एका विधानानं खळबळ
Omraje Nimbakakar | मी शिंदे गटात... ओमराजेंचा निर्णय बदलला? त्या एका विधानानं खळबळ
दुर्दैव! हायकोर्टात जाणार... निंबाळकर निकालावर ओमराजेंची प्रतिक्रिया
दुर्दैव! हायकोर्टात जाणार...पवनराजे निंबाळकर निकालावर ओमराजेंची पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! आरोपींची निर्दोष मुक्तता, मात्र खोट्या साक्षीदारामुळे खटला
मोठी बातमी! आरोपींची निर्दोष मुक्तता, मात्र खोट्या साक्षीदारामुळे खटला... पवनराजे निंबाळकर प्रकरणात कायदेतज्ज्ञ काय म्हणाले?
20 वर्षांनंतरचा निकाल! माफीचा साक्षीदार विश्वासार्ह नाही; सर्व आरोपी..
मोठी बातमी! 20 वर्षांनंतरचा निकाल! माफीचा साक्षीदार विश्वासार्ह नाही; पद्मसिंह पाटलांसह सर्व आरोपी निर्दोष
1 रुपया देतात, 100 रुपये काढतात, ठाकरेंकडून लाडकी बहीण योजनेची पोलखोल
Raj Thackeray | 1 रुपया देतात, 100 रुपये काढतात, राज ठाकरेंकडून लाडकी बहीण योजनेची पोलखोल; सरकारची पिसेच काढली
निकालाचे वाचन; इंद्रप्रस्थ गेस्ट हाऊसमाध्ये... पवनराजे निंबाळकर प्रकरण
Video | निकालाचे वाचन; इंद्रप्रस्थ गेस्ट हाऊसमाध्ये... पवनराजे निंबाळकर प्रकरणात नेमकं काय घडलं?
एकच खळबळ! भाजपमध्ये भयंकर घडतंय... नरेंद्र मोदी आहे तोपर्यंतच शांतता..
एकच खळबळ! भाजपमध्ये भयंकर घडतंय... नरेंद्र मोदी आहे तोपर्यंतच शांतता... राज ठाकरेंचा मोठा दावा