AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IMD Weather Update : हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा हाय अलर्ट, महाराष्ट्राला मोठा इशारा

गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने उघडीप दिली होती, परंतु दिलासादायक बातमी म्हणजे मागच्या 24 तासांमध्ये राज्यातील काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून मोठा इशारा देण्यात आला आहे.

IMD Weather Update : हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा हाय अलर्ट, महाराष्ट्राला मोठा इशारा
IMD Monsoon UpdateImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 16, 2026 | 8:08 PM
Share

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे, परंतु आनंदाची बातमी म्हणजे पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाचं आगमन झालं असून, गेल्या 24 तासांमध्ये राज्यातील काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. तर येत्या 20 जुलैपासून राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचं भारतीय हवामान विभागाने म्हटलं आहे. 17 जुलै रोजी उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांसह 12 राज्यांना आयएमडीकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याच काळात प्रति तास 60 किमी वेगाने वारे वाहण्याची देखील शक्यता आहे. वादळी वाऱ्यांमुळे काही भागांमध्ये वृक्ष कोसळण्याच्या घटना देखील घडू शकतात, तसेच पर्वती प्रदेशात भूस्खलनाच्या घटना देखील घडू शकतात, असं हवामान विभागाने म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर आयएमडीकडून नागरिकांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पूर्व भारतातील राज्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कोणत्या राज्यांमध्ये पावसाचा इशारा?

भारतीय हवामान विभागाकडून उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, जम्मू-काश्मीर, झारखंड, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि छत्तसगढ या राज्यांना हवामान विभागाकडून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या राज्यांमध्ये पुढील 24 तासांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढणार असून, या काळात प्रति तास 70 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असं हवामान विभाने म्हटलं आहे.

महाराष्ट्रात काय स्थिती?

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे, परंतु मागील 24 तासांमध्ये राज्यातील काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान 20 तारखेपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. येत्या 20 तारखेपासून मराठवाडा, कोकण आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे. 20 तारखेपासून 13 जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे, ज्यामध्ये नांदेड, बीड, नाशिक, पुणे, मुंबई, पालघर, ठाणे, मुंबई या जिल्ह्यांसह इतर काही जिल्ह्यांचा समावेश आहे.

Follow Us
'पक्षात बाहेरुन सरदार आले आणि मंत्री झाले'-सदाभाऊ खोत
Sadabhau Khot : 'पक्षात बाहेरुन सरदार आले आणि मंत्री झाले', मंत्रीपद न मिळाल्याने सदाभाऊ खोतांकडून खदखद व्यक्त
24 तासात योग्य तो निर्णय घेऊ- उदय सामंत
Uday Samant On Manoj Jarange Protest : 24 तासात योग्य तो निर्णय घेऊ- उदय सामंत
प्रसंगावधान राखत बस कर्मचाऱ्याने वाचवले वृद्ध प्रवाशाचे प्राण
केरळमध्ये बस कर्मचाऱ्याच्या तत्परतेमुळे वृद्ध प्रवासी पडण्यापासून वाचले
महापौर वर्षा मॅरेथॉनमध्ये मेडलवरून वाद; पालकांकडून अधिकाऱ्यांना घेराव
ठाणे मॅरेथॉन: विजेत्यांना मेडल न मिळाल्याने पालकांचा गोंधळ
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवारांचाच -सुप्रिया सुळे
Supriya Sule : चुकीच्या पद्धतीने काढून घेतलेला राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांना परत करा: सुप्रिया सुळे
पैठणीसाठी आता बारकोड, वस्त्रोद्योग मंत्र्यांची माहिती
Paithani Saree : पैठणी साडीसाठी आता बारकोड: वस्त्रोद्योग मंत्र्यांनी दिली माहिती, फसवणूक थांबणार
संजय जाधवांच्या पक्ष प्रवेशाबबात पुन्हा शिंदेंचं सुचक वक्तव्य, म्हणाले
संजय जाधवांच्या पक्ष प्रवेशाबबात पुन्हा शिंदेंचं सुचक वक्तव्य, म्हणाले...
सुप्रिया सुळेच्या वक्तव्यावर भाजप नेत्याचा खोचक टोला; म्हणाले...
सुप्रिया सुळेच्या वक्तव्यावर भाजप नेत्याचा खोचक टोला; म्हणाले, फोडण्यासाठी पक्षच...
थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये हायड्रो पॉवर बोगद्यात कामगार अडकले
थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये हायड्रो पॉवर बोगद्यात कामगार अडकले, बचावकार्य सुरु
एकनाथ शिंदेंनी मध्येच भाषण थांबवलं: परभणीत भरमंचावर असं काय घडलं?
एकनाथ शिंदेंनी मध्येच भाषण थांबवलं: परभणीत भरमंचावर असं काय घडलं?