AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात ढगफुटी सदृश्य पावसाचा इशारा; शाळेला सुट्टी, पुढील काही तास अत्यंत धोक्याचे, आयएमडीच्या नव्या इशाऱ्याने झोप उडाली

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, त्यामुळे पुढील काही तासांमध्ये राज्यात पावसाचा जोर अधिक वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील काही भागांना भारतीय हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यात ढगफुटी सदृश्य पावसाचा इशारा; शाळेला सुट्टी, पुढील काही तास अत्यंत धोक्याचे, आयएमडीच्या नव्या इशाऱ्याने झोप उडाली
महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा इशारा Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 03, 2026 | 9:23 PM
Share

राज्यात सध्या धो-धो पाऊस कोसळत आहे, दरम्यान पुढील काही तासांमध्ये आता महाराष्ट्रात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. पुढील चार दिवस राज्यात पावसाची स्थिती अशीच राहणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील काही भागांमध्ये भारतीय हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे.  तसेच हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर आता काही ठिकाणी शाळांना सुट्टी देखील जाहीर करण्यात आली आहे.  पुढील चार दिवस कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा आणि विदर्भात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

काय आहे हवामान विभागाचा नवा अंदाज? 

‘रेड अलर्ट हा कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यासाठी देण्यात आलेला आहे. उर्वरीत महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील पडू शकतो. विदर्भात देखील काही भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुढील चार दिवस राज्यात पावसाची स्थिती अशीच राहण्याची शक्यता आहे.

जून मध्ये राज्यात सरासरीच्या फक्त 53 टक्के इतकाच पाऊस झाला आहे. आणि संपूर्ण देशाचा विचार केला तर फक्त सरासरीच्या 40 टक्के इतकाच पाऊस झाला आहे. एकंदरीत विचार केला तर राज्यात जूनमध्ये 40 ते 50 टक्के पावसाची तूट झाली आहे, परंतु येणाऱ्या चार दिवसांमध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे, ज्यावेळी कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो, त्यावेळी मान्सूनचे वारे स्ट्रॉग होतात हीच स्थिती राज्यात सध्या निर्माण झाली आहे, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

 शाळेला सुट्टी 

दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर कल्याण -डोंबिवलीतील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सुरक्षेसाठी शिक्षण विभागाने सुट्टीचा निर्णय घेतला आहे.  रेड अलर्टच्या इशाऱ्या नंतर केडीएमसी अलर्ट मोडवर असल्याचं पहायला मिळत आहे. विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून, अधिकाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर १२ नियंत्रण कक्ष सज्ज झाले आहेत.  पूरस्थिती उद्भवल्यास नागरिकांच्या निवाऱ्यासाठी पालिकेच्या शाळा सज्ज करण्यात आल्या आहेत, गरज लागली तर खासगी शाळा देखील ताब्यात घेतल्या जाणार आहेत.   नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असं आवाहन देखील करण्यात आलं आहे.  दरम्यान दुसरीकडे पालघर जिल्ह्याला देखील पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला असून, या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पालघरमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?