AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मटण अर्धवट शिजल्याने पतीचा पारा चढला, मित्रासमोर बोल लावल्याने पत्नीने संपवले जीवन

संसाराचा गाडा परस्पर विश्वासाने चालत असतो. छोट्या मोठ्या तक्रारीने संसाराची रंगत कमी होत जाते. झालेल्या क्षुल्लक चुकांचा बाऊ न करता संसार हसतखेळत एकमेकांच्या दु:खावर फुंकर घालत आणि उणीवांवर दुर्लक्ष करीत पुढे जात असतो. मात्र यवतमाळ येथे विपरीत घडले...

मटण अर्धवट शिजल्याने पतीचा पारा चढला, मित्रासमोर बोल लावल्याने पत्नीने संपवले जीवन
Yavatmal
| Updated on: Apr 18, 2026 | 5:59 PM
Share

यवतमाळ : केवळ मटण नीट शिजले नाही म्हणून पत्नीचा स्वत:च्या मित्रासमोर नवऱ्याने पाणउतारा केल्याने दुखावलेल्या विवाहितेने विष पिऊन जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना यवतमाळ येथे घडली आहे. यवतमाळ येथील आर्णी तालुक्यातील बोरगाव येथे या हसत्या खेळत्या संसाराची वाताहत झाली आहे. मित्रासमोर पतीने केलेला अपमान सहन झाल्याने या विवाहितेने विष प्राशन केले. तिला रुग्णालयात नेण्यात आले, परंतू तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

चेतना मनोज जाधव (३३) असे या दुर्दैवी मृत महिलेचे नाव आहे.चेतना जाधव हिच्यासाठी हा दिवस अखेरचा ठरेल असे कोणालाही वाटले नाही. चेतनाचा पती मनोज याने एका मित्राला घरी जेवायला बोलावले होते. मटणाची भाजी बेतशीर आणि चांगली कर अशा सूचना मनोज याने पत्नीला दिल्या. अंगणात जेवणाचा बेत रंगला होता. मात्र, मटण काही नीट शिजले नाही. त्यामुळे पाहुण्यासमोरच मनोज याचा पारा चढला. मटण व्यवस्थित शिजले नसल्याच्या कारणावरून त्याने पत्नीशी जोरदार वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद केवळ स्वयंपाकापुरता मर्यादित राहिला नाही. त्यात मनोज हा व्यसनी आणि संशयी स्वभावाचा असल्याने शब्दाला शब्द वाढत गेला.

बुधवारी झालेल्या अपमानाचा घाव चेतना हिच्या मनाला खोलवर लागला. त्यामुळे चेतनाने टोकाचे पाऊल उचलले. भरल्या ताटावरून घरात आत गेली आणि तिने विषारी औषध प्राशन केले. बाहेर येऊन जेव्हा तिने पतीला ही बाब सांगितली, तेव्हा एकच खळबळ उडाली. तिला तातडीने आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. पण खूपच उशीर झाला होता. डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.

मनोज हा दारूच्या आहारी गेला होता. यापूर्वीही २०१५ मध्ये त्याच्यावर कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल झाला होता. २०१७ मध्ये ‘पुन्हा सुखाने संसार करू’ या अटीवर चेतनाने त्याला माफ केले होते. मात्र, बुधवारी पतीने केलेल्या अपमानाने ती प्रचंड दुखावली आणि तिने हे टोकाचे पाऊल उचलले.

पतीवर गुन्हा दाखल

चेतनाचे मामा मनोहर राठोड ( रा. देवगाव) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चेतनाचा पती मनोज जाधव याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तक्रार दिली. त्यावरुन मनोज याला पोलिसांनी अटक केली. चेतनाच्या मृत्यूनंतर आर्णी ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. एका हसत्या खेळत्या संसाराची शुल्लक गोष्टीवरुन राखरांगोळी झाली. पोलीस उपनिरीक्षक पल्लवी निनगूरकर या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत