AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अतिमुसळधार पावसाचा इशारा, थेट अलर्ट, महाराष्ट्रात आज..

Maharashtra Weather Update : राज्यातील हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. कधी थंडी तर कधी उकाडा अशी स्थिती आहे. काही राज्यांमुळे भारतीय हवामान विभागाने थेट अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

अतिमुसळधार पावसाचा इशारा, थेट अलर्ट, महाराष्ट्रात आज..
Rain
| Updated on: Feb 09, 2026 | 8:19 AM
Share

राज्यासह देशातील हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. ऐन फेब्रुवारी महिन्यात पाऊस तर उकाडा बघायला मिळत आहे. राज्यातून थंडी जवळपास गायब झाली. उत्तरेकडे कडाक्याची थंडी पडली असून वातावरणात चढउतार बघायला मिळत आहे. निफाड येथे राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. निफाडमध्ये 10.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दुपारच्यावेळी उकाडा असेल. दुपारच्यावेळी 2 ते 3 अंशांची घट होण्याची शक्यता आहे. यासोबतच अनेक भागात आज ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. भारतीय हवामान विभागाने देशातील अनेक राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला. यासोबतच उत्तरेकडील राज्यात कडाक्याची थंडी कायम असेल.

मुंबईत हवेचा गुणवत्ता निर्देशांक पुन्हा वाईट श्रेणीत पोहोचलाय. हवा पुन्हा दुषित झालीये. दृष्यमानतेवर परिणाम स्पष्ट दिसून येतोय. आज मुंबईत हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा 204 वर पोहोचलाय. पीएम 10 चं प्रमाण 180 वर तर पीएम 2.5 चं प्रमाण 151 वर गेलेय. आगामी 48 तासांत किमान तापमानात 2-3 अंशांची घट होणार असल्याने राज्यात पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढण्याची चिन्हे आहेत.

मुंबईत सकाळी धुरकट वातावरण तर दुपारी आकाश निरभ्र असेल. कमाल तापमान 35 अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता असल्याने उन्हाचा चटकाही जाणवणार आहे. राज्याच्या हवामानात सध्या मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज राज्यात संमिश्र हवामान राहण्याची शक्यता आहे. काही भागांत थंडीची लाट येण्याचे संकेत आहेत.

तर काही ठिकाणी उन्हाचा तडाखा वाढू शकतो. पुढील 48 तासांत हे हवामान पुन्हा बदलण्याचे संकेत आहेत. दरम्यान, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तर राजस्थान, छत्तीसगड आणि बिहारमध्ये तापमान 5 ते 10 अंश सेल्सिअस दरम्यान होते. यासोबतच मुसळधार पावसाचाही इशारा देण्यात आला. देशात काही भागात मुसळधार पाऊस, कडाक्याची थंडी तर काही भागात थेट उकाडा जाणवत आहे. सतत हवामानात बदल होताना दिसत असून याचा परिणाम थेट आरोग्यावर होताना दिसत आहे.

चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु
चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु.
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?.
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा.
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ.
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत.
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित.
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर.
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न.