AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तो आजही येणार… अलर्ट जारी, तब्बल इतके जिल्हे संकटात, 24 तास धोक्याची..

राज्यात मागील काही दिवसांपासून सतत अवकाळी पाऊस सुरू आहे. या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसत आहे. शेतीचे मोठे नुकसान होत आहे. आजही भारतीय हवामान विभागाने पावसाचा अत्यंत मोठा इशारा दिला.

तो आजही येणार... अलर्ट जारी, तब्बल इतके जिल्हे संकटात, 24 तास धोक्याची..
Rian
| Updated on: Apr 03, 2026 | 7:18 AM
Share

भारतीय हवामान विभागाने नुकताच पावसाचा मोठा इशारा दिला. गेल्या काही दिवसांपासून राज्यात सतत पाऊस सुरू आहे. त्यामध्येच आता पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला. काल अवकाळी पावसाने पुण्यात थैमान घातले. दिवसाच पावसामुळे अंधार झाला. जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. पुण्यासह अन्य जिल्ह्यांमध्येही पाऊस आणि गारपिट झाली. आजही राज्यात पावसाचा ऑरेंज आणि येलो अलर्ट देण्यात आलाय. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. काही भागात आजही गारपिटीची शक्यता आहे. पुढील पाच दिवस पाऊस कायम राहण्याचा अंदाज आहे. सोलापूर, धाराशिव, पुणे, अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, नंदूरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या भागात पावसाचा इशारा देण्यात आला. या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे. एप्रिल महिन्याला सुरूवात झाली पण पाऊस काही थांबत नाहीये.

पुढील पाच दिवस राज्यात अवकाळी पाऊस राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला. पावसामुळे शिरपूर बाजार समितीत शेतीमालाचे लाखोंचे नुकसान झाले. शिरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतमाल खरेदी विक्रीचे व्यवहार सलग सुट्यांमुळे तीन दिवस बंद होते. मात्र, अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे हा शेतमाल भिजून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

जळगावच्या चोपड्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिट झाली. शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील चेनापूर येथे वादळी वाऱ्यांसह झालेल्या पावसामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झालय. हाता तोंडाशी आलेल ज्वारीच पीक भुईसपाट झाले, प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जातं आहे.

नाशिकच्या निफाड तालुक्यातील पूर्व-दक्षिण भागातील कानदळ, देवगाव, शिरवाडे वाकद, रुई, मानोरी फाटा तसेच परिसरात दुपारी चार वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने सुमारे अर्धा तास जोरदार हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. काढणीला आलेल्या कांदा, गहू व द्राक्ष पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात असून बळीराजाच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला.

Follow Us
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच..
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच...
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात.
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना..
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन.
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो.
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान.
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले.
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला...
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला....
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण...
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण....