AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यातील 7 जिल्ह्यांवर संकट! थेट मोठा इशारा, अलर्ट जारी, अवकाळी पावसासोबत…

राज्यातील हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. त्यामध्येच आता भारतीय हवामान विभागाने राज्यातील काही भागात पावसाचा इशारा दिला आहे. यासोबतच ढगाळ वातावरणामुळे उकाडा वाढण्याचीही शक्यता आहे.

राज्यातील 7 जिल्ह्यांवर संकट! थेट मोठा इशारा, अलर्ट जारी, अवकाळी पावसासोबत...
Maharashtra Weather
| Updated on: Jan 23, 2026 | 7:17 AM
Share

हवामानात सातत्याने बदल होताना दिसतोय. कधी पाऊस तर कधी थंडी अशी स्थिती आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जानेवारी महिन्यात पाऊस कायम असेल. मात्र, जानेवारी महिन्यात वातावरणात सातत्याने बदल होताना दिसतोय. 1 जानेवारी रोजी राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर वातावरणात बदल होताना दिसत आहे. उत्तरेकडे कडाक्याची थंडी आहे. पण राज्यातील गारठा कमी झाला. उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरीचे प्रमाण अत्यंत कमी आहे. ज्यामुळे तापमान वाढत आहे. देशातून मॉन्सून जाऊन काही महिने झाली आहेत. मात्र, तरीही पाऊस काही जाण्याचे नाव घेत नाहीये. देशातील अनेक भागात पाऊस सुरू आहे. नुकताच भारतीय हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा मोठा इशारा दिला. सतत वातावरणात बदल होत असल्याने त्याचा आरोग्यावर थेट परिणाम होत आहे.

पुण्यात थंडी ओसरली असून उकाड्यात वाढ झाली आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून किमान तापमानात घट होऊन गारठा वाढला होता. मात्र, गेल्या दोन दिवसात किमान तापमान साधारण तीन अंश सेल्सिअसची वाढ तर कमाल तापमानात दोन अंश सेल्सिअसची घट नोंदविण्यात आली. परिणामी शहरातील थंडी ओसरली असून, उकाड्यात वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वीच कडाक्याची थंडी होती.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरणासह पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरणामुळे उकाडा अधिक वाढण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक ठिकाणी तापमान 11 अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदवले गेले. त्यामध्ये सध्याच्या परिस्थितीला तरी राज्यातून थंडी गायब झाल्याचे स्पष्ट आहे. पूर्वी राज्यातील पारा 5-6 अंश सेल्सिअसपर्यंत गेला होता.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, धुळे, पालघर, नाशिक, जळगाव, नंदूरबार, अहिल्यानगर आणि नाशिकमध्ये ढगाळ वातावरण असेल. यासोबतच अवकाळी पाऊसही हजेरी लावू शकतो. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात पुढील काही दिवसात हवामानात काही बदल होतील. मात्र, जानेवारी महिना संपायला काही दिवस शिल्लक असताना राज्यात पाऊस होताना दिसतोय.

Follow Us
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...