AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Temperature Today : पुढील 4 तास धोक्याची, प्रशासनाचा मोठा इशारा, घरातून अजिबात बाहेर..

Maharashtra Temperature Today 27th April 2026 : देशातील तापमानात मोठी वाढ होत आहे. त्यामध्येच काल राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. राज्यात सुर्य आग ओकताना दिसत आहे.

Maharashtra Temperature Today : पुढील 4 तास धोक्याची, प्रशासनाचा मोठा इशारा, घरातून अजिबात बाहेर..
Heat
| Updated on: Apr 27, 2026 | 1:02 PM
Share

देशात तीव्र उष्णतेची लाट आहे. इशान्य भाग वगळता जवळपास राज्यांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे आले. तब्बल 47. अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाची नोंद झाली. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या सात जिल्ह्यांमध्ये 46 अंश सेल्सिअसच्या पुढे तापमानाची नोंद झाली. अकोल्यात 46.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अमरावथी येथे 46.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यवतमाळमध्ये 46. अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. भारतीय हवामान विभागाने आजही अमरावती, अकोला आणि वर्धा जिल्ह्यात उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जारी केला. आजही उष्णता वाढण्याचे संकेत आहेत. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यातील जवळपास जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंश पार असेल. वाढत्या उष्णतेमध्ये दक्षता घेण्याकरिता प्रशासनाने काही सुचना जाहीर केल्या. महत्वाच्या कामाशिवाय नागरिकांनी 12 ते 4 घराबाहेर निघणे टाळा.

देशात काल सर्वाधिक तापमानाची नोंद अकोला जिल्ह्यात झाली. अकोल्यात काल पारा 46.9 अंश सेल्सिअसवर गेला. यंदाच्या उन्हाळ्यातील हे सर्वाधिक तापमान होते. अकोल्यापाठोपाठ देशात सर्वाधिक तापमान नोंदवलेल्या शहरांमध्ये अमरावतीचा दुसरा नंबर आहे. विदर्भातील सर्वच शहरांचे तापमान 44 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले. विदर्भातील चार जिल्ह्यांत पारा 46 अंशांच्या पुढे जाऊन विक्रमी 47 अंश सेल्सिअसकडे जात आहे.

नागपूर आणि चंद्रपूरचा पारा 45 अंशाच्या पुढे गेला. हवामान विभागाने पुढील दोन दिवस आणखी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला. विदर्भाच्या तापमानात जीवघेणी वाढ झाली. अकोला 46.9, अमरावती 46.8, भंडारा 44.0, बुलढाणा 43.5, चंद्रपूर 44.0, गडचिरोली 44.6, गोंदिया 44.4, नागपूर 45.4, वर्धा 46.4, वाशीम 44.6, यवतमाळ 46.0 याप्रमाणे तापमानाची नोंद झाली.

अकोला जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून रविवारी 46.9 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. तर एप्रिल महिन्यातील मागील पाच वर्षांतील हे सर्वाधिक तापमान मानले जात आहे. यापूर्वी 2019 मध्ये अकोल्यात एप्रिल महिन्यात 47.7 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले होते.  दरम्यान, भारतीय हवामान विभागाकडून आज सोमवारी अकोला जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तसेच 26 ते 28 एप्रिल दरम्यान यलो अलर्ट देण्यात आला असून, उष्णतेची लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर जाणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे आणि आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे…..!

गोंदिया जिल्ह्यात मागील तीन-चार दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली. जिल्ह्याचा पारा तब्बल 44.5 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. एप्रिल महिन्यातील आतापर्यंतचे हे सर्वाधिक तापमान नोंदवले गेले असून कडक उन्हामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यात उष्णतेची लाट जाणवत आहे. दुपारच्या वेळेत कडक उन्हामुळे रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. कोरेगाव पार्क परिसरात तापमान चक्क 43 अंश सेल्सियसवर. पुणे शहरात तापमान चक्क 40 पार गेले.

Follow Us
गांधींचा मोठा इशारा; राजीनामा पुरेसा नाही, पंतप्रधानांनी माफी मागावी!
Rahul Gandhi | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर राहुल गांधींचा मोठा इशारा; राजीनामा पुरेसा नाही, पंतप्रधानांनी माफी मागावी!
जेपी नड्डा यांची घोषणा –एफआयआर मागे घेणार, नुकसानभरपाई आणि...
JP Nadda | नीट आंदोलनाला मोठं यश; जेपी नड्डा यांची घोषणा –एफआयआर मागे घेणार, नुकसानभरपाई आणि परीक्षा सुधारणांवरही सकारात्मक निर्णय
सरकार झुकलं! आमच्या तीनही मागण्या मान्य; CJP च्या प्रवक्त्यांचा दावा
सरकार झुकलं! आमच्या तीनही मागण्या मान्य; CJP च्या प्रवक्त्यांचा दावा
मोठी अपडेट! राजीनामा देताच धर्मेंद्र प्रधान यांचा मोठा निर्णय, अचानक..
मोठी अपडेट! राजीनामा देताच धर्मेंद्र प्रधान यांचा मोठा निर्णय, अचानक...
अखेर आंदोलन संपलं! CJP आंदोलकांनी शांतपणे घरी जावं, भाजप मंत्र्यांसोबत
अखेर आंदोलन संपलं! CJP आंदोलकांनी शांतपणे घरी जावं, भाजप मंत्र्यांसोबतच्या बैठकीत मोठा निर्णय
तरुणाईचा विजय! Gen Z ने सरकारला जमिनीवर आणलं; राज ठाकरेंचं मोठं विधान
Raj Thackeray | तरुणाईचा विजय! Gen Z ने सरकारला जमिनीवर आणलं; राज ठाकरेंचं मोठं विधान
आता आंदोलकांचा मोर्चा अमित शहांकडे... बड्या नेत्याच्या विधानाने...
आता आंदोलकांचा मोर्चा अमित शहांकडे... बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
प्रधान यांनी राजीनामा देताच शरद पवारांची सर्वात मोठी प्रतिक्रिया
Sharad Pawar | धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देताच शरद पवारांची सर्वात मोठी प्रतिक्रिया, म्हणाले...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही पहिली विकेट, पुढे... अभिजीत दीपके...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही पहिली विकेट, पुढे... अभिजीत दीपकेच्या विधानेने अनेकाच्या भुवया उंचावल्या
धर्मेंद्र प्रधान OUT! आता देवेंद्र फडणवीस होणार नवे शिक्षणमंत्री?
धर्मेंद्र प्रधान OUT! आता देवेंद्र फडणवीस होणार नवे शिक्षणमंत्री?; त्या बड्या नेत्याने नावच सांगून टाकलं