AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आजोबा गेले, आक्रोश झाला, अंत्यसंस्काराची वेळ आली अन् घडलं असं काही…

पाळधी गावातील ६५ वर्षीय रघुनाथ खैरनार यांचा रेल्वे रुळावरील मृतदेह सापडला, ज्यामुळे कुटुंबात शोककळा पसरली. अंत्यसंस्काराच्या तयारीदरम्यानच रघुनाथ जिवंत घरी परतले. हा विचित्र आणि हृदयस्पर्शी प्रसंग संपूर्ण गावाला हादरवून टाकला.

आजोबा गेले, आक्रोश झाला, अंत्यसंस्काराची वेळ आली अन् घडलं असं काही...
funeral rituals
| Updated on: Jul 09, 2025 | 9:00 AM
Share

मृत्यू आणि जीवन यांच्यातील सीमारेषा कधीकधी इतकी धूसर होते की, त्यावर विश्वास ठेवणेही कठीण होऊन जाते. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पाळधी गावात असाच एक विचित्र आणि तितकाच हृदयस्पर्शी प्रसंग घडला. ज्यामुळे संपूर्ण गाव क्षणार्धात शोकातून आनंदात न्हाऊन निघाले. ज्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरू होती, तेच ६५ वर्षीय आजोबा जिवंत परतल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

गेले काही दिवस पाळधी गावातील ६५ वर्षीय रघुनाथ खैरनार हे बेपत्ता होते. कुटुंबिय आणि गावकरी त्यांच्या शोधात होते. अशातच रेल्वे रुळावर एक अनोळखी मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. शरीरयष्टी, अंगातील कपडे, पायातील चप्पल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अंगावरील गोंदलेले खुणा या रघुनाथ खैरनार यांच्याशी इतक्या मिळत्याजुळत्या होत्या की कुटुंबियांनी तो मृतदेह रघुनाथ खैरनार यांचाच असल्याचा समज करून घेतला. यानंतर नातेवाईकांनी हंबरडा फोडला आणि गावात शोककळा पसरली.

अंतिम संस्काराची वेळ जवळ आली…

मन हेलावून टाकणाऱ्या या प्रकारानंतर, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत मृतदेहाचे शवविच्छेदनही करण्यात आले. मृतदेह घरी आणण्यात आला. त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी मोठ्या लगबगीने सुरू झाली. दुःखाचा डोंगर कोसळलेल्या कुटुंबियांना आणि गावकऱ्यांना आता फक्त अखेरचा निरोप देण्याची औपचारिकता बाकी होती. अंत्यसंस्काराची वेळ जवळ येत होती. चिता रचली जात होती, मंत्रोच्चारांनी वातावरण गंभीर झाले होते. त्याच वेळी, अचानक एक धक्कादायक दृश्य समोर आले. दारातून रघुनाथ खैरनार स्वतःच्या पायांनी चालत घरात येत असल्याचे पाहून कुटुंबातील सदस्यांना आणि उपस्थित गावकऱ्यांना मोठा धक्का बसला.

क्षणभर कुणालाच काही कळेना. डोळ्यासमोर आपल्या आजोबांचा मृतदेह समजून ठेवलेले पार्थिव आणि त्याच क्षणी जिवंत, सुखरूप परतलेले आजोबा! हे नेमकं काय घडतंय, याचा विचार करत सर्वजण अवाक् झाले. मृत्यूच्या दारातून परतलेल्या रघुनाथ खैरनार यांना पाहताच काही क्षणांपूर्वी शोकसागरात बुडालेले कुटुंब आनंदाने गहिवरले. डोळ्यातील अश्रू अचानक आनंद अश्रुत बदलले. पाळधी गावही या अनपेक्षित पुनरागमनाने हादरुन गेले. जे मृत झाले म्हणून अंत्यसंस्कार करणार होते, तेच प्रत्यक्षात परतल्याने कुटुंबियांबरोबरच ग्रामस्थांनाही आश्चर्याचा धक्का बसला.

देव तारी त्याला कोण मारी

गोंधळातून सुटका झाल्यानंतर, कुटुंबियांनी रघुनाथ खैरनार यांचे मोठ्या उत्साहात आणि भावनिक वातावरणात घरी औक्षण करून स्वागत केले. “आम्हाला वाटलं की… पण देव तारी त्याला कोण मारी!” अशा भावना त्यावेळी अनेकांच्या चेहऱ्यावर दिसत होत्या. आता रेल्वे रुळावर सापडलेला तो मृतदेह नेमका कुणाचा होता आणि रघुनाथ खैरनार एवढे दिवस कुठे होते? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.