AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भुसावळच्या या कांद्याला परराज्यात मागणी, काय आहे या कांद्याची विशेषता?

या कांद्याला परराज्यातूनही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. एकीकडं कांद्याचे भाव कमी असताना दुसरीकडे चांगल्या आणि टिकाऊ कांद्याला मागणी नक्कीच आहे.

भुसावळच्या या कांद्याला परराज्यात मागणी, काय आहे या कांद्याची विशेषता?
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Apr 13, 2023 | 12:39 PM
Share

जळगाव : कांदा हे पीक फार काळ टिकवून ठेवता येत नाही. त्यामुळे याचे भाव कमी-जास्त होत असतात. पण, विशिष्ट जातीचे कांदे हे जास्त काळ टिकून राहतात. त्यामुळे या कांद्याला विशेष मागणी असते. भुसावळ भागातील या कांद्याला खास मागणी आहे. त्याचे कारण म्हणजे हा कांदा जास्त काळ टिकून राहतो. वर्षभर टिकून राहत असल्याने या कांद्याला परराज्यातूनही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. एकीकडं कांद्याचे भाव कमी असताना दुसरीकडे चांगल्या आणि टिकाऊ कांद्याला मागणी नक्कीच आहे.

302 हेक्टरवर कांद्याची लागवड

भुसावळ तालुक्यातील कांद्याला राज्याबाहेर मोठ्या प्रमाणात मागणी असते. यामुळे भुसावळ महसूल मंडळातील चार मंडळांमध्ये ३०२ हेक्टरवर कांद्याची लागवड करण्यात आली आहे. पुनरी कांदा या महिन्यातील काढण्यास सुरुवात होईल. या कांद्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते. ती मुख्य म्हणजे वर्षभर हा कांदा साठवून ठेवला तरी खराब होत नाही. त्यामुळे या कांद्याला पश्चिम बंगाल भागामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असते.

चार महसूल मंडळात लागवड

भुसावळ तालुक्यातील भुसावळ, कुन्हा पानाचे वरणगाव, पिंपळगाव खुर्द ही चार महसूल मंडळ आहे. या महसूल मंडळांमध्ये भुसावळ २ हेक्टर, कुन्हा पानाचे ४० हेक्टर, वरणगाव १७६ हेक्टर पिंपळगाव खुर्द ८४ हेक्टर असे एकूण ३०२ हेक्टरची कांद्याची लागवड करण्यात आलेली आहे. यामध्ये सर्वाधिक कमी लागवड ही भुसावळ या मंडल क्षेत्रामध्ये झालेली आहे.

या कांद्याचे भाव काय?

तालुक्यातील साकरी, वेल्हाळा, वरणगाव या भागात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड करण्यात येते. या भागातील लालसर कांदा व्यापारी थेट शेताच्या बांधावरून माल हा पश्चिम बंगालच्या मार्केटमध्ये घेऊन जात असतात. सध्याला बाजारात विक्रीला आलेला कांदा हा चाळीस किलोची गोणी २२० रुपयांपासून तर ३०० रुपयांपर्यंत कांदा विक्री होतो, तर किरकोळमध्ये ७ रुपयांपासून ते १० आहे.

या कांद्यामुळे उत्पादकांना चार पैसे चांगले मिळत आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक खूश आहेत. हा कांदा चांगला आणि टिकाऊ असल्याने बाजारातही चांगली मागणी आहे.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...