AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भुसावळच्या या कांद्याला परराज्यात मागणी, काय आहे या कांद्याची विशेषता?

या कांद्याला परराज्यातूनही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. एकीकडं कांद्याचे भाव कमी असताना दुसरीकडे चांगल्या आणि टिकाऊ कांद्याला मागणी नक्कीच आहे.

भुसावळच्या या कांद्याला परराज्यात मागणी, काय आहे या कांद्याची विशेषता?
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Apr 13, 2023 | 12:39 PM
Share

जळगाव : कांदा हे पीक फार काळ टिकवून ठेवता येत नाही. त्यामुळे याचे भाव कमी-जास्त होत असतात. पण, विशिष्ट जातीचे कांदे हे जास्त काळ टिकून राहतात. त्यामुळे या कांद्याला विशेष मागणी असते. भुसावळ भागातील या कांद्याला खास मागणी आहे. त्याचे कारण म्हणजे हा कांदा जास्त काळ टिकून राहतो. वर्षभर टिकून राहत असल्याने या कांद्याला परराज्यातूनही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. एकीकडं कांद्याचे भाव कमी असताना दुसरीकडे चांगल्या आणि टिकाऊ कांद्याला मागणी नक्कीच आहे.

302 हेक्टरवर कांद्याची लागवड

भुसावळ तालुक्यातील कांद्याला राज्याबाहेर मोठ्या प्रमाणात मागणी असते. यामुळे भुसावळ महसूल मंडळातील चार मंडळांमध्ये ३०२ हेक्टरवर कांद्याची लागवड करण्यात आली आहे. पुनरी कांदा या महिन्यातील काढण्यास सुरुवात होईल. या कांद्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते. ती मुख्य म्हणजे वर्षभर हा कांदा साठवून ठेवला तरी खराब होत नाही. त्यामुळे या कांद्याला पश्चिम बंगाल भागामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असते.

चार महसूल मंडळात लागवड

भुसावळ तालुक्यातील भुसावळ, कुन्हा पानाचे वरणगाव, पिंपळगाव खुर्द ही चार महसूल मंडळ आहे. या महसूल मंडळांमध्ये भुसावळ २ हेक्टर, कुन्हा पानाचे ४० हेक्टर, वरणगाव १७६ हेक्टर पिंपळगाव खुर्द ८४ हेक्टर असे एकूण ३०२ हेक्टरची कांद्याची लागवड करण्यात आलेली आहे. यामध्ये सर्वाधिक कमी लागवड ही भुसावळ या मंडल क्षेत्रामध्ये झालेली आहे.

या कांद्याचे भाव काय?

तालुक्यातील साकरी, वेल्हाळा, वरणगाव या भागात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड करण्यात येते. या भागातील लालसर कांदा व्यापारी थेट शेताच्या बांधावरून माल हा पश्चिम बंगालच्या मार्केटमध्ये घेऊन जात असतात. सध्याला बाजारात विक्रीला आलेला कांदा हा चाळीस किलोची गोणी २२० रुपयांपासून तर ३०० रुपयांपर्यंत कांदा विक्री होतो, तर किरकोळमध्ये ७ रुपयांपासून ते १० आहे.

या कांद्यामुळे उत्पादकांना चार पैसे चांगले मिळत आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक खूश आहेत. हा कांदा चांगला आणि टिकाऊ असल्याने बाजारातही चांगली मागणी आहे.

Follow Us
MNS शहराध्यक्षांच्या गाडीची तोडफोड: मनसेचा भाजपवर आरोप
अंबरनाथमधील भाजप-मनसे राड्यावरुन मनसे नेते आक्रमक, गाडी तोडफोड करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न
Sharad Pawar | चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न; शरद पवार यांचा दावा
आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य...
Rahul Narwekar | आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य; सुप्रीम कोर्टात निर्णय....
फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
मुख्यमंत्री फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची पुन्हा भारताला धमकी
‘सिंधूचं पाणी आमची रेड लाईन’; पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'-दिपके
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'- अभिजीत दिपके
जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मेगा प्लॅन
Chandrashekhar Bawankule | जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मेगा प्लॅन; चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली घोषणा, म्हणाले...
जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीक नको’
जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; प्रसाद लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीका नको’
मनिषा कायंदे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल : "शिंदेंच्या जीवावर खासदार
मनिषा कायंदे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल :
राजकीय उद्योग सोडून उद्योजकांकडे लक्ष द्यावे: सामंतांवर हल्लाबोल
राजकीय उद्योग सोडून उद्योजकांकडे लक्ष द्यावे: रोहित पवारांचा उद्योगमंत्री सामंतांवर हल्लाबोल