AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jalgaon Suicide : जळगावमध्ये प्रेमी युगुलाची गळफास घेवून आत्महत्या, घरच्यांनी लग्नाला विरोध केल्याने उचलले टोकाचे पाऊल

मयत तरुण तरुणी दोघेही एकाच समाजातील असून एकमेकांचे नातेवाईक आहेत. मात्र तरीही दोघांच्याही घरच्यांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. याच कारणातून दोघांनी गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच रावेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Jalgaon Suicide : जळगावमध्ये प्रेमी युगुलाची गळफास घेवून आत्महत्या, घरच्यांनी लग्नाला विरोध केल्याने उचलले टोकाचे पाऊल
जळगावमध्ये प्रेमी युगुलाची गळफास घेवून आत्महत्याImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Apr 23, 2022 | 4:25 PM
Share

जळगाव : एका प्रेमी युगुला (Couple)ने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना शनिवारी सकाळी रावेर तालुक्यातील विश्रामजीन्सी येथे घडली आहे. मुकेश पवार (25) आणि गायत्री पवार (20) अशी मयत प्रेमीयुगुलाची नावे आहेत. मयत तरुण तरुणी दोघेही एकाच समाजातील असून एकमेकांचे नातेवाईक आहेत. मात्र तरीही दोघांच्याही घरच्यांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. याच कारणातून दोघांनी गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच रावेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले. रावेर पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला आहे. (In Jalgaon a couple committed suicide by hanging themselves after their family members opposed their marriage)

रावेर तालुक्यातील विश्रामजीन्सी गावाजवळील एका शेतातील झाडाला गळफास घेत या जोडप्याने आत्महत्या केली. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलिस निरीक्षक कैलास नागरे, पोलिस उपनिरीक्षक विशाल सोनवणे व अन्य कर्मचाऱ्यांनी धाव घेतली.

मालेगावमध्ये सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मालेगावातील कळवणच्या अभोना येथे घडली. लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच पतीने आपण इस्कॉन संस्थेचे काम करतो, आपणास संन्यास घायचा आहे. फक्त हळद लावण्यापुरतेच आपण लग्न केले.आपण वैवाहिक संबंध ठेवू शकत नसल्याचे सांगत पती मारहाण करत वारंवार छळ करीत होता. अखेर पत्नी विशाखा शैलेश येवले हिने अखेर गळफास लावून आत्महत्या केली. सासरच्या जाचाला कंटाळून महिला माहेरी निघून गेली. मात्र माहेरच्यांनी समजावून पुन्हा सासरी नांदायला पाठवले. मात्र सासरचा छळ थांबत नव्हता. यामुळे अखेर महिलेने टोकाचे पाऊल उचलले. (In Jalgaon a couple committed suicide by hanging themselves after their family members opposed their marriage)

इतर बातम्या

Jaipur : जयपूरच्या सिनेस्टार सिनेमा हॉलला भीषण आग, इमारतीत लोक अडकली असल्याची भीती

VIDEO : सांगलीत चक्क जेसीबीच्या साह्याने एटीएम फोडले, 27 लाखांची रोकड लंपास

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.