AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भ्रष्टाचाऱ्यांचा नवीन नारा, तुरुंगात जाण्यापेक्षा भाजप बरा…; शरद पवार गटाच्या नेत्याचा हल्लाबोल

NCP Leader Jayant Patil on BJP : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. जळगावमध्ये बोलताना जयंत पाटील यांनी हे मोठं विधान केलं आहे. विशाळगडाच्या पायथ्याशी झालेल्या तोडफोडीवरही जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे. वाचा सविस्तर...

भ्रष्टाचाऱ्यांचा नवीन नारा, तुरुंगात जाण्यापेक्षा भाजप बरा...; शरद पवार गटाच्या नेत्याचा हल्लाबोल
जयंत पाटीलImage Credit source: Facebook
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Jul 21, 2024 | 5:10 PM
Share

किती भ्रष्टाचार असावा याचा आता सुमार राहिलेला नाही. मात्र भ्रष्टाचारावर कोणी बोलत नाही. आता भ्रष्टाचाऱ्यांकडून नवीन नारा दिला जात आहे. तुरुंगात जाण्यापेक्षा भाजपमध्ये गेलेलं बरं… कारण भाजपमध्ये गेल्या तर सर्व चौकशा थांबतात. त्यामुळे मागे लागलेल्या सर्व कटकटी थांबतात. आमच्या 25 नेत्यांवर तुम्हीच आरोप केलं. अंतर 23 जणांच्या चौकश्या थांबल्या. राज्यातली जनता दूध खुळी आहे का? या सरकारने गेल्या दीड ते दोन वर्षात महाराष्ट्रात खूप मोठ्या भ्रष्टाचार केलेला आहे. मात्र तो लोकांना जावून सांगण्याची गरज आहे. महायुतीच्या सरकारचे काळे कारनामे असे पुस्तक आम्ही प्रसिद्ध केलेला आहे. ते पुस्तक लोकांमध्ये जाऊन लोकांना वाचून दाखवा, असं म्हणत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार निशाणा साधला आहे.

शिंदे सरकारवर निशाणा

लोकसभेच्या निकालानंतर हे सरकार प्रचंड भेदरलेले आहेत. राज्यावर मोठे कर्ज आहे. मोठा बोजा आहे. राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा प्रचंड बोजवरा या सरकारने उडवला आहे. पहिल्या दुसऱ्या क्रमांकावर असणारा आपला राज्य आता थेट 11 वय क्रमांक वर गेला आहे. डबल इंजिन मुळे आम्हाला पैसे मिळतात असं सरकार सांगतात. मात्र हे डबल नाही तर लोकांना त्रास देणाऱ्या ‘ट्रबल इंजिन’ आहे, असं म्हणत जयंत पाटील यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.

शेतकरी प्रश्नावर भाष्य

शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम राज्यातल्या विमा कंपन्या करत नाही. निर्यातीच्या चुकीच्या धोरणाचा फटका हा आपल्याला मोठ्या प्रमाणावर बसला. पिकांना हमीभाव नाही यासह विविध समस्यांमुळे शेतकरी नाराज असल्याने त्याचा फटका सरकारला लोकसभा निवडणुकीत असल्याचा आपण बघतो आहे. मुख्यमंत्री झाल्यावर एकनाथ शिंदे यांनी मोठ्या घोषणा केल्या मात्र आजही आपल्या राज्यातला शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत आहे. उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी या मोदी सरकारला अपयश आलेला आहे. त्यामुळे देशात बेरोजगारीचा उच्चांक हा गाठलेला आहे, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

विशाळगडावर ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम या दोघा समाजाचा या ठिकाणी अतिक्रमण आहे. पावसाच्या आधी किंवा नंतर अतिक्रमण काढायला होतं. मुस्लिम लोकांना बेदमपणे मारहन करण चुकीचा आहे. या घटनेचा निषेध केला आहे. निवडणुका असल्याने राज्यात हिंदू आणि मुस्लिम लोकांचा ऐक्य बिघडेल असा प्रयत्न काही लोक करत आहेत, असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

Follow Us
मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बस्तर सफरीत काळाचा घाला! मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या....
Kumbh Mela | बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या नावाने नेमकं काय घडलं?
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
Zeeshan Siddique | झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! थेट मुंबई आयुक्तांना फोन; फडणवीसांनाही दिली माहिती
अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार
Abhijit Dipke | अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार; नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...