AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘येताना मराठा आरक्षणाचा जीआर घेऊनच या, नाहीतर…’, मनोज जरांगे यांचा सरकारला मोठा इशारा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीनंतर उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवर मोठी घोषणा करतील, असं वाटत होतं. पण त्यांनी ठोस अशी कोणतीही मोठी घोषणा केली नाही. त्यानंतर जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर आलीय.

'येताना मराठा आरक्षणाचा जीआर घेऊनच या, नाहीतर...', मनोज जरांगे यांचा सरकारला मोठा इशारा
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Sep 04, 2023 | 5:06 PM
Share

जालना | 4 सप्टेंबर 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज एकत्रित पत्रकार परिषद घेतली. त्याआधी मराठा आरक्षण उपसमितीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर तीनही मंत्र्यांनी सविस्तर भूमिका मांडली. जालन्यातील उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देवून ओबीसी आरक्षण द्यावं अशी मागणी केलीय. याबाबत मुख्यमंत्री आज मोठी घोषणा करतील, असं वाटत होतं. पण मुख्यमंत्र्यांनी याबाबत ठोस भूमिका केली नाही. त्यानंतर आता मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले?

“मराठा आरक्षणाचा अध्यादेश घेऊन या. तुम्ही चर्चेचं दार खुलं केलं असं म्हणून पहिलेच पाढे बोलू नये. त्यामुळे सरकारने आमचं आरक्षण जाहीर केलं असेल, सरकारने शंभर टक्के मराठ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असेल, सरकारने शंभर टक्के आरक्षणाचा निर्णय घेतला असेल. कारण त्याठिकाणी छत्रपती घराण्याचे वंशज उदयनराजे भोसले देखील होते. सरकारचं शिष्ठमंडळ येताना मराठा आरक्षणाच्या विजयाचं पत्र घेऊन येईल”, असा विश्वास मनोज जरांगे यांनी व्यक्त केला.

‘आरक्षणाचा जीआर आला नाही तर…’

“सरकारचं शिष्ठमंडळ जीआर घेऊन येतंय. आम्ही त्याची वाट पाहतोय. पण जीआर आला नाही तर आंदोलन मागे घेणार नाही. जीआर आलं नाही तर उद्यापासून पाणी सुटलं ते समजा. सरकारच्या प्रतिनिधीची वाट बघेन. त्यानंतर मी अधिकृत भूमिका जाहीर करेन. आम्ही आता अधिकृत असं काहीच बोलू इच्छित नाही. पण महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण दिल्याचा जीआर घेऊनच सरकारचं शिष्टमंडळ येईल”, असं मनोज जरांगे म्हणाले.

“सरकारला दोन दिवसांचा वेळ आहे. मराठा घाबरलेला नाही. प्रत्येकाच्या कनाकनात ऊर्जा आहे. मी मराठ्यांना आरक्षण मिळवून देणार तेव्हाच थांबणार. त्यांचं शिष्ठमंडळ येतंय अशी माहिती मिळाली आहे. या शिष्टमंडळाने माहिती दिल्यानंतर आमची गावकऱ्यांसोबत बैठक पार पडेल. या बैठकीत पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवली जाईल”, अशी माहिती मनोज जरांगे यांनी यावेळी दिली.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...