AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता अजितदादांच्या मुलाचीही सुप्रिया सुळेंवर टीका; त्यांना संसदरत्न मिळाला, तुम्हाला?

बारामतीमध्ये निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलं आहे. पवार कुटुंबातच थेट लढाई होत असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या निवडणुकीत पवार कुटुंबातील सदस्य प्रचारात उतरले आहेत. अजित पवार यांची मुलंही निवडणूक प्रचाराच्या कामाला लागली आहेत. तर सुप्रिया सुळे यांच्यासाठीही त्यांच्या कुटुंबातील सदस्य मैदानात उतरले आहेत.

आता अजितदादांच्या मुलाचीही सुप्रिया सुळेंवर टीका; त्यांना संसदरत्न मिळाला, तुम्हाला?
jay pawarImage Credit source: jay pawar
| Edited By: | Updated on: Apr 22, 2024 | 4:40 PM
Share

बारामतीमध्ये निवडणुकीचा फिवर चांगलाच वाढला आहे. आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. पण हे आरोपप्रत्यारोप एकाच कुटुंबात होताना दिसत आहे. आधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संसदरत्न पुरस्कारावरून शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली होती. आता अजित पवार यांचे दुसरे चिरंजीव जय पवार यांनीच आपल्या आत्याच्या संसदरत्न पुरस्कारावरून सवाल केला आहे. त्यांना संसदरत्न पुरस्कार मिळाला, भोर तालुक्याला काय मिळालं? असा सवालच जय पवार यांनी केला आहे. जय पवार यांनी पहिल्यांदाच सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे.

जय पवार यांनी भोर तालुक्यात एका रॅलीला संबोधित करताना हा सवाल केला आहे. अनेक वर्ष तुम्ही सुप्रियाताईंना संधी दिली होती. त्यांना खासदार बनवलेलं होतं, पण जशी कामे व्हायला पाहिजे होती तशी काहीच काम दिसली नाहीत, अशी टीकाच जय पवार यांनी सुप्रिया सुळे यांचं नाव न घेता केली.

तो मोठा पुरस्कार नाही

आज त्या बोलतायत मला संसदरत्न पुरस्कार मिळालाय, त्यांना पुरस्कार मिळालाय. पण तुमच्या भोर तालुक्याला काय मिळाल? संसदरत्न पुरस्कार हा सरकारचा नाहीये, हा एका एनजीओ मार्फत दिला जातो. त्यामुळे तो असं काही मोठा पुरस्कार नाही, असा हल्लाच जय यांनी चढवला आहे.

खोटं बोलून त्यांना काय मिळतंय

मीडियाचा गैरवापर कसा करायचा हे त्यांना चांगलं माहित आहे. काल बारामतीमध्ये जैन समाजाच्या कार्यक्रमादरम्यान सुप्रियाताई आणि मी एकत्र आलो. तेव्हा मी त्यांना बोललो, आत्या तुम्ही पहिला नारळ ठेवा. तर त्या म्हणाल्या, नाही… जय तू आधी ठेव. मग मी नारळ ठेवून डोळे मिटून प्रार्थना करत होतो. त्याच वेळेस माझ्या शेजारी बारामतीचे शहराचे अध्यक्ष जय पाटील येऊन उभे राहिले.

मी प्रार्थना करत असताना सुप्रियाताई म्हणाल्या, काय जय कसं चाललंय, मला वाटलं त्या मला म्हणाल्या. म्हणून मी डोळे उघडून त्यांना बोललो आता सगळं बर आहे. मग त्या मला म्हणाल्या, मी तुला नाही. मी दुसऱ्या जयशी बोलत होते. पण नंतर त्यांनी ते सर्व व्हिडिओ पत्रकारांना दिलेआणि त्यांना खोटी बातमी करायला लावली. सुप्रिया सुळे यांनी जय पवारची विचारपूस केली, अशी बातमी त्यांनी करायला सांगितली. हे खोटं बोलून त्यांना काय मिळतंय?, असा सवाल त्यांनी केला.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली