AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत करा, अन्यथा रस्त्यावर उतरू, किसान सभेचा इशारा

केंद्रात व राज्यात सत्तेवर आलेल्या सत्ताधाऱ्यांनी असे बेजबाबदार वर्तन थांबवावे. शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा किसान सभेने दिला आहे.

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत करा, अन्यथा रस्त्यावर उतरू, किसान सभेचा इशारा
FARMER AND RAIN
| Edited By: | Updated on: Oct 01, 2021 | 10:49 PM
Share

मुंबई : गुलाब चक्रीवादळामुळे राज्यात अतिवृष्टी झाल्याने 12 लाख हेक्‍टरवरील खरिप पिके नष्ट झाली आहेत. शेतजमीन वाहून गेली आहे. मराठवाडा व विदर्भातील ओढे, नदी-नाल्यांना पूर आल्याने काठालगतची शेती संपूर्णपणे वाहून गेली आहे. खरीप हंगामातील हातातोंडाशी आलेले सोयाबीन, कापूस व इतर पिके संपूर्णपणे नष्ट झाली आहेत. राज्य व केंद्र सरकारमध्ये सामील पक्षांचे नेते अशा भीषण आपत्तीचेही राजकारण करू पाहत आहेत. मदतीची जबाबदारी एक दुसऱ्यावर ढकलू पहात आहेत. केंद्रात व राज्यात सत्तेवर आलेल्या सत्ताधाऱ्यांनी असे बेजबाबदार वर्तन थांबवावे. शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा किसान सभेने दिला आहे.

किसान सभेच्या वतीने राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांचा आढावा घेऊन वाटचालीची पुढील दिशा ठरविण्यासाठी नाशिक येथे संघटनेच्या राज्यभरातील प्रमुख 250 कार्यकर्त्यांची दोन दिवसांची कार्यशाळा दिनांक 1 व 2 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. राज्यातील 22 जिल्ह्यांचे प्रतिनिधी या कार्यशाळेला उपस्थित आहेत. राज्यभरातील प्रतिनिधींकडून राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांवर सविस्तर चर्चा केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत किसान सभेने हा इशारा दिला आहे.

जगप्रसिद्ध पत्रकार पी. साईनाथ यांच्या हस्ते उद्घाटन

किसान सभेच्या नेतृत्वाखाली शेतकरी आंदोलनाला जोरदार चालना देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेचे उदघाटन जगप्रसिद्ध पत्रकार पी. साईनाथ यांनी केले. शेतकऱ्यांच्या विविध समस्या व त्यावरील उपायांवर यावेळी पी. साईनाथ यांनी सविस्तर मांडणी केली. 2 ऑक्टोबर रोजी सुप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ डॉ. आर. रामकुमार आणि किसान सभेचे माजी राज्य अध्यक्ष जे. पी. गावीत, अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे कार्यशाळेला मार्गदर्शन करणार आहेत. किसान सभेचे राज्य अध्यक्ष किसन गुजर, सरचिटणीस डॉ. अजित नवले, कोषाध्यक्ष उमेश देशमुख, कार्याध्यक्ष अर्जुन आडे, सहसचिव सुनील मालुसरे व इतर पदाधिकारी कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.

प्रति हेक्टर 50,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावेत

राज्यात उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीचा सखोल आढावा कार्यशाळेत घेण्यात आला. केंद्र व राज्य सरकारने मिळून तातडीची प्राथमिक मदत म्हणून प्रति हेक्टर 50,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावेत. त्यानंतर पीक व शेतजमीन नुकसानीचा योग्य अंदाज घेत शेतकऱ्यांचे उर्वरित संपूर्ण नुकसान भरून निघेल अशी ठोस मदत करावी, अशी मागणी किसान सभेने केली आहे.

फलाईन सूचना स्वीकारण्याची संपूर्ण व्यवस्था करावी

पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांनी 72 तासाच्या आत आपत्तीची सूचना देणे बंधनकारक आहे. शेतकऱ्यांना आपल्या शेतावर व पिकांवर ओढवलेल्या आपत्तीची सूचना देता यावी यासाठी कृषी व महसूल विभागाने शेतकऱ्यांना सर्व ते सहकार्य करावे. पीक विमा कंपन्यांनी आपली कार्यालये व हेल्पलाइन 24 तास सुरू राहतील अशी व्यवस्था करावी. रेंज अभावी शेतकऱ्यांना आपत्तीची ऑनलाईन सूचना देण्यात अडथळे येत असल्याने ऑफलाईन सूचना स्वीकारण्याची संपूर्ण व्यवस्था महसूल विभाग, कृषी विभाग व पीक विमा कंपन्यांनी करावी अशी मागणी किसान सभेने केली आहे. सरकारने या मागण्या मान्य केल्या नाही, तर आगामी काळात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारादेखील किसान सभेने दिलाय.

इतर बातम्या :

पिंपरी-चिंचवड पुन्हा काबिज करण्यासाठी शरद पवार मैदानात! आता भाजप काय रणनिती आखणार?

मास्तराच्या मुलाची संपत्ती हजार बाराशे कोटींची कशी?, त्यांची चौकशी का होत नाही?; नाथाभाऊंचा सवाल

Mumbai School Reopen : आठवड्यात तीन दिवस निर्जंतुकीकरण, पालकांच्या संमतीपत्रानंतरच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश : किशोरी पेडणेकर

(kisan sabha demand help to heavy rain affected farmers unless will protest against state government)

Follow Us
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या….

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या…

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?.

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र.

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी.

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!.

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!