AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kolhapur North By Election 2022 : कोल्हापुरात जिंकतायत मविआच्या जयश्री जाधव पण चर्चाय ती एकाच नेत्याची, सतेज पाटलांनी कशी फिल्डींग लावली?

कोल्हापूर जिल्ह्यात केडीसीची निवडणूक असो किंवा गोकुळ दूध संघाची त्यामध्ये बंटी पाटलांनी लक्ष दिले की, ती निवडणूक बंटी पाटील आपल्याच खिशात घालणार हे नक्की असते. याही निवडणुकीत तेच झालं. त्यामुळे कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक चर्चेत राहिली आहे ती बंटी पाटील यांच्या नावामुळेच

Kolhapur North By Election 2022 : कोल्हापुरात जिंकतायत मविआच्या जयश्री जाधव पण चर्चाय ती एकाच नेत्याची, सतेज पाटलांनी कशी फिल्डींग लावली?
कोल्हापूर पोटनिवडणुकीत बंटी पाटलांची हवाImage Credit source: TV9
| Updated on: Apr 16, 2022 | 4:21 PM
Share

कोल्हापूरः जयश्री जाधव (Jayshri Jadhav) यांची कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर, त्यांच्या लढतीसाठी खरी फिल्डींग लावली सतेज उर्फ बंटी पाटील (Satej Patil) यांनी. बंटी पाटील यांना कोल्हापुरातल्या राजकारणाची नस सापडल्याचे मत राजकीय विश्लषक करतात ते याच कारणामुळे. कोल्हापूर जिल्ह्यात केडीसीची निवडणूक असो किंवा गोकुळ दूध संघाची त्यामध्ये बंटी पाटलांनी लक्ष दिले की, ती निवडणूक बंटी पाटील आपल्याच खिशात घालणार हे नक्की असते. याही निवडणुकीत तेच झालं. त्यामुळे कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक (Kolhapur by Election) चर्चेत राहिली आहे ती बंटी पाटील यांच्या नावामुळेच.

चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माजी आमदार राजेश क्षीरसागरांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र त्यावर तोडगा काढत जयश्री जाधवांची उमेदवारी कायम ठेवण्यात आली. त्यानंतर चालू झाला खरा प्रचार. या प्रचारात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असं चित्र होतं, मात्र प्रतिष्ठेची लढत केली ती चंद्रकांत पाटील यांनी.

चंद्रकांतदादांची ईडीची भीती

या प्रचारादरम्यान भाजपनंही आपले सगळे डाव वापरून बघितले. अगदी ईडीच्यी भीतीही घातली गेली. मात्र ठोश्यास ठोसा या उक्तीप्रमाणे बंटी पाटील यांनीही कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीसाठी शड्डू ठोकला आणि कुस्तीचा फड जिंकावा तसे त्यांनी कोल्हापुरचे राजकीय मैदान मारलेही. त्यामुळेच कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव विजयी झाल्या असल्या तरी खरी चर्चा सुरु झाली आहे ती, बंटी पाटील यांचीच.

तुम्हाला मी हिशोब देतो

भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी जेव्हा काँग्रेसच्या सत्तर वर्षाचा हिशोब सतेज पाटील यांच्याकडे मागितला त्याच वेळी कोल्हापूरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले, मात्र त्यानंतर थोडाही वेळ न दवडता बंटी यांनी पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांचे आव्हान स्वीकारत बिंदू चौकात येऊन मी सत्तर वर्षाचा हिशोब देतो म्हणत, तुम्ही सात वर्षाचा हिशोब द्या अशी भूमिका घेतल्यानंतरही कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत खरी रंगत आली.

आई बंटी पाटील आलाय

मागील एका निवडणुकी दरम्यान त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, त्यामध्ये लहान पोरगं आई म्हणतं आई बंटी पाटील आलाय हे कोल्हापूरकरांना इतकं अपिल झालं आहे की, कालच्या निवडणुकीतही येणार तर बंटी पाटील हेच चर्चेत होतं.

चर्चा बंटीच्या राजकारणाची

कोल्हापुरची पोटनिवडणूक खरी चर्चेत आली ती सतेज पाटील आणि चंद्रकांत पाटील यांच्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरीमुळे त्यामुळे जयश्री पाटील या उमेदवार म्हणून निवडून आल्या खऱ्या मात्र आता चर्चा सुरु झाली आहे ती, बंटी पाटील यांचीच.

संबंधित बातम्या

Kolhapur North By Poll Election 2022 : त्यांचे भोंगे उतरवण्याचं काम कोल्हापूरकरांनी केलं, संजय राऊत म्हणतात, हे तर महाराष्ट्राचं जनमत!

VIDEO : Kolhapur Election Result 2022 | कोल्हापुरात मविआचा दणदणीत विजय

By Election Results 2022 : 5 जागांच्या पोटनिवडणुकीत भाजपला झटका, बंगालमध्ये टीएमसीची जादू, ममतांचं अभिनंदन

Follow Us
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल.
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत.
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला...
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला....
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू.
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.