AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Konkan ZP Result 2026 : राणे की ठाकरे? कोकणातील जनतेने कोणाला नाकारले, पाहा संपूर्ण निकाल

कोकणच्या राजकारणात राणे की ठाकरे? जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालांतून समोर आली मोठी माहिती. वैभववाडीत राणेंचा करिश्मा तर रत्नागिरीत शिंदेंची सरशी.

Konkan ZP Result 2026 : राणे की ठाकरे? कोकणातील जनतेने कोणाला नाकारले, पाहा संपूर्ण निकाल
uddhav thackeray narayan rane
| Updated on: Feb 09, 2026 | 1:13 PM
Share

राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी झालेल्या मतदानाचे निकाल आज ९ फेब्रुवारी २०२६ रोजी जाहीर झाले आहेत. कोकणात पुन्हा एकदा महायुतीचा झंझावात पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्गात भाजपने, तर रत्नागिरीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने विरोधकांचे सर्व किल्ले भुईसपाट केले आहेत. विशेषतः मंत्री नितेश राणे यांनी वैभववाडीत विजयाचा नवा विक्रम गाठत भाजपची एकहाती सत्ता आणली आहे.

वैभववाडीत नितेश राणेंचा करिश्मा, विरोधकांचा सुफडासाफ

वैभववाडी पंचायत समितीच्या ६ पैकी ६ जागा जिंकून भाजपने निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. जिल्हा परिषदेच्या तिन्ही जागांवरही भाजपने विजय मिळवला आहे. त्यामुळे राणे समर्थकांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जल्लोष सुरू केला आहे.

पंचायत समिती विजयी उमेदवार

  • भुईबावडा: देवानंद पालांडे (भाजप)
  • कोळपे: सुवर्णा संसारे (भाजप)
  • खांबाळे: मंगेश लोके (भाजप)
  • लोरे: सिध्देश रावराणे (भाजप)
  • उंबर्डे: साची कोलते (भाजप)
  • कोकिसरे: साधना नकाशे (भाजप – बिनविरोध)

जिल्हा परिषद निकाल (वैभववाडी)

  • कोकिसरे: श्रावणी रावराणे (विजयी)
  • लोरे: रिध्दी सुतार (विजयी)
  • कोळपे: प्रमोद रावराणे (बिनविरोध)

रत्नागिरीत शिंदेचा विजय

रत्नागिरी पंचायत समितीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने एकतर्फी विजय मिळवला आहे. एकूण २० जागांपैकी तब्बल १७ जागांवर शिवसेनेने बाजी मारली आहे. तर भाजपला केवळ २ जागा मिळाल्या आहेत.

  • भांबेड जिल्हा परिषद गट: विनिता गांगण (शिवसेना – शिंदे) विजयी.
  • भांबेड पंचायत समिती गण: उमेश पत्की (शिवसेना) आणि शैलेश खामकर (भाजप) विजयी.

सिंधुदुर्गातील इतर महत्त्वाचे निकाल 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवडणूक निकालांनी अनेक ठिकाणी अनपेक्षित निकाल पाहायला मिळत आहेत. विशेषतः वेंगुर्ला तालुक्यातील आडेली पंचायत समिती गणात अपक्ष उमेदवार नितीन मांजरेकर यांनी प्रस्थापित राजकीय पक्षांच्या उमेदवारांना धूळ चारत विजय मिळवला आहे. याच तालुक्यात परुळे आणि म्हापण या पंचायत समिती गटांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आपली पकड मजबूत केली आहे. या ठिकाणी अनुक्रमे सचिन देसाई आणि यज्ञा साळगावकर यांनी दणदणीत विजय मिळवून पक्षाचा झेंडा फडकवला आहे.

तर दुसरीकडे, सावंतवाडी तालुक्यातील माडखोल गणात भाजपला मोठ्या बंडाळीचा फटका बसला आहे. येथे भाजपच्याच बंडखोर अपक्ष उमेदवाराने विजय मिळवला आहे. त्यामुळे मोठा राजकीय धक्का बसला असून, अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. या संमिश्र निकालांमुळे जिल्ह्यातील स्थानिक सत्तासमीकरणे अधिक रंजक बनली आहेत.

Follow Us
विद्यार्थ्यांना मोठा झटका.... अचानक नीट परीक्षा रद्द; सीबीआयची एन्ट्री
विद्यार्थ्यांना मोठा झटका.... अचानक नीट परीक्षा रद्द; सीबीआयची एन्ट्री.
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांचा पाय आणखी खोलात, ईडीचं समन्स? चौकशी
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांचा पाय आणखी खोलात, ईडीचं समन्स? चौकशी.
महाराष्ट्र पोलिसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, नेमकी घोषणा काय?
महाराष्ट्र पोलिसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, नेमकी घोषणा काय?.
मोदींच्या आवाहनानंतर राज्य सरकार अॅक्शन मोडमध्ये; विभागीय बैठका ऑनलाइन
मोदींच्या आवाहनानंतर राज्य सरकार अॅक्शन मोडमध्ये; विभागीय बैठका ऑनलाइन.
सुवेंदू अधिकारी यांचा मास्टरस्ट्रोक? निवडणूक अधिकाऱ्याचीच या पदावर...
सुवेंदू अधिकारी यांचा मास्टरस्ट्रोक? निवडणूक अधिकाऱ्याचीच या पदावर....
आई तुळजाभवानीच्या चरणी रेकॉर्डब्रेक सोनं; आकडा ऐकूनच व्हाल थक्क....
आई तुळजाभवानीच्या चरणी रेकॉर्डब्रेक सोनं; आकडा ऐकूनच व्हाल थक्क.....
पश्चिम बंगालमध्ये राजकीय भूकंप! भाजप सत्तेत येताच मोठी कारवाई; गंभीर..
पश्चिम बंगालमध्ये राजकीय भूकंप! भाजप सत्तेत येताच मोठी कारवाई; गंभीर...
आमच्याकडून चूक झाली, यापुढे मी किंवा माझे सहकारी... राज ठाकरे यांचं...
आमच्याकडून चूक झाली, यापुढे मी किंवा माझे सहकारी... राज ठाकरे यांचं....
बेवड्यांचं काही खरं नाही...थलपती विजयची तळीरामांवर वाकडी नजर.....
बेवड्यांचं काही खरं नाही...थलपती विजयची तळीरामांवर वाकडी नजर......
पावसाळ्याआधीच मुंबईकरांच्या घशाला कोरड... पाणी जपून वापरा.....
पावसाळ्याआधीच मुंबईकरांच्या घशाला कोरड... पाणी जपून वापरा......