AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“छत्रपती संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का?” शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाडांचे पुन्हा वादग्रस्त विधान

MLA Sanjay Gaikwad : हिंदी-मराठी भाषिक मुद्यावर बोलताना एकनाथ शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी वादग्रस्त विधान केले. त्याच्या वक्तव्यावरून वादाची ठिणगी पडली आहे.

छत्रपती संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाडांचे पुन्हा वादग्रस्त विधान
वादग्रस्त विधानांचा पाऊसImage Credit source: गुगल
| Updated on: Jul 06, 2025 | 11:33 AM
Share

मुंबईमध्ये वरळी डोममध्ये ठाकरे बंधूंचा विजयी महोत्सव पार पडला. 19 वर्षानंतर दोन्ही बंधू एकत्र आले. मनसे आणि उद्धव सेना एका मंचावर आल्याने राज्याच्या राजकारण कूस बदलण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या मेळाव्यानंतर त्यावर साधक बाधक चर्चा होत आहे. टीका होत आहे. ठाकरेंवर भाजप आणि शिंदे गोटातून तिखट प्रतिक्रिया येत आहे. त्यातच टीका करताना शिंदे सेनेचे शिलेदार आमदार संजय गायकवाड यांची दाखला देताना जीभ घसरली. त्यांच्या वक्तव्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर राज्यात वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

काय केले वादग्रस्त वक्तव्य

आमदार संजय गायकवाड यांनी ठाकरे बंधूंवर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केले. ते म्हणाले की, केवळ हिंदीचा विषय नाही. परराज्यात गेल्यावर हिंदी भाषा तुम्ही बोलणार नाहीत का? तुम्हाला जगात टिकायचं असेल तर, सगळ्याच भाषा अवगत असायला हव्यात. छत्रपती संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? छत्रपती शिवाजी महाराज बहुभाषिक होते. ताराराणी, येसूबाई, जिजाऊ यांनी अनेक भाषा शिकल्या. ते सर्व लोक काय मूर्ख होते का? डोके ताळ्यावर न ठेवता त्यांनी असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांच्या वक्तव्याने नवीन वादाला तोंड फुटले आहे.

उर्दू भाषा पण यायला हवी

भाषेवरून राजकारण करणं चुकीचं आहे. जर पाकिस्तानचा दहशतवाद रोखायचा असेल तर उर्दू भाषा पण आपल्याला यायला हवी असे ते म्हणाले. लातूर येथील हाडोळती येथे ते आले होते. भाषेवरून राजकारण करणं चुकीचे असल्याचे ते म्हणाले. त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्याने संतापाची लाट उसळली आहे.

ठाकरे ब्रँडवर तोंडसुख

संजय गायकवाड यांनी ठाकरे नावाचा ब्रँड राहिला नसल्याचे म्हटले आहे. असा ब्रँड असता तर बाळासाहेब ठाकरे असतानाच 288 आमदार निवडून आले असते. त्यावेळी 70 ते 74 जागा निवडून आल्या असता, असा घणाघात गायकवाड यांनी केला. त्यामुळे त्यांनी अप्रत्यक्षरित्या बाळासाहेब ठाकरे यांच्यावर पण टीका केल्याचे बोलले जात आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.