
“विमान क्रॅश झालं त्याचवेळी ब्लॅकबाॅक्स सुरक्षित होतं असं बोलण्यात आलं होतं. मग तो खराब झाला अशी बातमी आली. आता तो सुरक्षित आहे असं समजतंय. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. काही दिवस वाट पहायला पाहिजे. रोहित पवार यांचे काका गेले, पण राज्याचे दादा गेले. त्यांनी संयमाने घेणं गरजेचं आहे. सीबीआय चौकशीत सगळंच बाहेर येईल. संजय राऊत आगीत तेल ओतणारा माणूस आहे. ते राज्याचं हित पाहू शकणार नाहीत,” असं वक्तव्य आमदार संजय गायकवाड यांनी केलं आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सेनेचे नेते आणि मंत्री VSR चे विमान वापरणार नाहीत. अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारांचा निर्णय एकनाथ शिंदेंकडून मान्य करण्यात आला आहे.
बीडच्या चौसाळा इथल्या बारावीच्या परीक्षा केंद्रावर कॉपीचा प्रकार समोर आला होता. याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कॉपीला मदत करणाऱ्या 17 शिक्षकांवर गुन्हे दाखल झाले होते. यानंतर आता या सर्व शिक्षकांवर निलंबनाची देखील कारवाई करण्यात आली आहे. हे सर्व शिक्षक वेगवेगळ्या शाळांमध्ये कार्यरत होते त्या शाळांच्या व्यवस्थापनाने निलंबनाचे आदेश काढले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्ष अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची तब्येत सुधारली. ते सध्या मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात शरद पवार उपचार घेत आहेत. शरद पवार यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होत असल्याची माहिती समोर आली आहे. आता अजून दोन दिवस शरद पवार या रुग्णालयात असणार आहे. खासदार सुप्रिया सुळे हे शरद पवार यांच्या सोबत रुग्णालयात आहेत. दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर शरद पवार यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे
कांदिवलीतील बाल भारती कॉलेजचे नाव गुजराती भाषेत लिहिलेले आहे, जे आता वादाचा विषय बनले आहे. सर्व महाविद्यालयांची नावे ठळक मराठी अक्षरात दर्शनी भागात प्रवेशद्वारावर लावण्याचे मुंबई विद्यापीठाचे आदेश असताना कांदिवलीच्या महाविद्यालयाने या आदेशाला हरताळ फासला आहे. या महाविद्यालयावर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी बाल भारती महाविद्यालयाची नामफलक मराठीत बदलण्यासाठी आंदोलन केले होते. त्यानंतर एक मराठी नामफलक स्टिकर चिकटवण्यात आला जो निघून गेला आहे.
जळगावात आयटीआयजवळील घंटागाडी डेपो संदर्भात विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर महापौर, उपमहापौर प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. आयटीआयच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारीची दखल घेत महापौर दीपमाला काळे आणि उपमहापौर मनोज चौधरी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या पाहणी दरम्यान महापौरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. हा घंटागाडी डेपो येथून लवकरात लवकर हलवला जाईल, असे आश्वासन महापौर आणि उपमहापौर यांनी यावेळी दिले
उजनीत सोडल्या जाणाऱ्या दूषित पाण्यामुळे सोलापुरात कॅन्सरचे प्रमाण वाढले. भाजप आमदार देवेंद्र कोठेनीं यांनी विधानसभेत लक्ष वेधले. सोलापूरसाठी वरदायिनी असणाऱ्या उजनी धरणातील प्रदूषित होणाऱ्या पाण्याबाबत आमदार देवेंद्र कोठे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. गेल्या 30 ते 40 वर्षांपासून पुणे, पिंपरी तसेच कुरकुंभ एमआयडीसी भागातील कारखान्यांचे दूषित पाणी उजनी धरणात मिसळले जात असून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप देवेंद्र कोठेनी यांनी केला आहे. सोलापुरात कर्करोगावर उपचार करणारी पाच ते सहा मोठे रुग्णालय सुरू असून यावर गांभीर्याने विचार करावा, अशी विनंती देवेंद्र कोठेनी यांनी केली आहे.
रोहित पवार बारामती पोलीस ठाण्यात पोहोचले, रोहित पवार DGCA, VSR विरोधात तक्रार दाखल करणार आहे. रोहित पवारांसोबत युगेंद्र पवारदेखील त्यांच्यासोबत बारामती पोलीस ठाण्यात जाणार आहेत. तक्रार दाखल केल्यानंतर सविस्तर बोलणार, अशी माहिती रोहित पवारांनी यावेळी दिली.
तुमचे सगळे अश्रू मगरीचे होते. भाजपमधून कुणाचा अपघात झाला असता तर हलक्यात घेतलं असतं का? कुणालाही पाठीशी घातलं तर महाराष्ट्र माफ करणार नाही, असेही संजय राऊत म्हणाले.
अजित दादांचा विमान अपघात सरकार हलक्यात घेतंय. VSR कंपनीत अनेक मंत्र्यांचे पैसे गुंतले आहेत. अपघाताबाबात रोहित पवारांकडून अनेक गोष्टी समजून घेतल्या. काहीतरी लपवण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला.
नाशिकमध्ये विश्व मराठी साहित्य संमेलना आधीच वादाची ठिणगी पडली आहे. विश्व मराठी साहित्य संमेलनावर त्र्यंबकेश्वर संस्थांनी पत्र काढत रोष व्यक्त केला आहे. मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी संतपरंपरेचा अवमान केला, असा आरोप या पत्रातून करण्यात आला आहे. आयोजकांना संत परंपरेचा आणि संतांच्या योगदानाचा विसर पडला आहे. मराठी भाषेला पहिला मान संतांनी दिला, मग साहित्य संमेलनात संतांचा सन्मान का नाही? असा सवालही या पत्रातून विचारण्यात आला आहे. या संमेलनाच्या नियोजन समितीकडे लेखी निवेदन देऊनही समाधानकारक उत्तर नसल्याचा दावा करण्यात आला आहे. यावेळी ऐन संमेलनाच्या तोंडावर नवा वाद पेटल्याने साहित्य वर्तुळात खळबळ उडाली आहे.
KDMC मध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत महापौर-उपमहापौर याची निवड बिनविरोध तरही महासभा घेण्यास विलंब का ? …कुणाचा दबाव?… ठाकरे गटाचा सवाल. बजेट विहित वेळेत मंजूर न झाल्यास विकासकामांवर परिणाम होणार. 28 तारखेपर्यंत खुलासा करा, अन्यथा KDMC मुख्यालयावर ढोल ताशांच्या गजरात आंदोलन करणार…शिवसेना उबाठा गटनेते उमेश बोरगावकर यांचा इशारा
बीड येथील जीएसटी विभागातील अधिकारी सचिन जाधवर यांनी 17 जानेवारी रोजी आत्महत्या केली होती. या प्रकरणातील आरोपी असलेला वरिष्ठ अधिकारी प्रदीप फाटे हा अद्यापही फरार आहे. त्याला अटक करावी या मागणीसाठी जाधवर कुटुंबीयांनी उपोषण सुरू केले होते. या प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यांनी प्रदीप फाटे याला सोमवार पर्यंत अटक केली जाईल तसेच त्याला फरार घोषित करण्यात येईल
उद्या होणार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महापौर यांच्या उपस्थितीत उद्घाटन. १३० वर्ष जुन्या ब्रिटिश कालीन पुलावर बस स्थानक आणि खाली जाण्यास पायऱ्या होत्या. नवीन पुलावर बस स्थानक आणि बाहेर जाण्यास एक्सेस नसल्याने तो अक्सेस देण्यात यावा अशी स्थानिक आणि जेष्ठ नागरिकांची मागणी
अकरा वाजून पन्नास मिनिटांनी भूकंप झटके आले. अहेरी नागेपली आलापल्ली या तीन ठिकाणी जाणवले भूकंप चे झटके 20 ते 25 सेकंद या भूकंपच्या झटक्यांमुळे नागरिकांमध्ये भीती. एक वर्ष अगोदरही या भागात भूकंप चे झटके जाणवले होते. काही सेकंदाचे भूकंपचे झटके अनेक ठिकाणी जाणवले
विधानसभेत आज पुरवणी मागण्यांवरती चर्चेला सुरुवात होईल..अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारकडून 11000 कोटीच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आलेल्या आहेत..त्यामुळे राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली जात असल्याचा आरोप करत विरोधक सरकारवरती जोरदार टीका करतील..पुरवणी मागण्यांच्या चर्चेनंतर विरोधकांचाही प्रस्ताव चर्चेला येणार आहे..त्यामुळे विरोधक वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सरकार वरती टीका करण्याची संधी सोडणार नाहीत.. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक आहे. या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात..
छत्रपती संभाजीनगर शहरातील रोशन गेट परिसरात अचानक लागलेल्या आगीमुळे एकच खळबळ उडाली. सीमा दूध डेअरीसमोरील पॅराडाईज पिझ्झा या दुकानाला अचानक आग लागल्याची घटना घडली. दुकानातून धूर आणि ज्वाळा बाहेर येताना दिसताच स्थानिक नागरिक आणि शेजारील दुकानदारांनी तत्काळ धाव घेतली. नागरिकांनी प्रसंगावधान राखत पाण्याच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला आणि अग्निशमन दल येण्यापूर्वीच आगीचा फैलाव रोखण्यात यश मिळवले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
आज राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची निवड होणार असून त्यावेळी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी विधिमंडळ नेतेपदी निवड झाली आहे.
विश्व मराठी साहित्य संमेलनावर त्र्यंबकेश्वर संस्थांचा पत्र काढत रोष.संमेलनाच्या आयोजकांनी संत परंपरेचा अवमान केल्याचा पत्रात आरोप. आयोजकांना संत परंपरेचा आणि संतांच्या योगदानाचा विसर पडल्याचाही आरोप. मराठी भाषेला पहिला मान संतांनी दिला, मग साहित्य संमेलनात संतांचा सन्मान का नाही? संमेलनाच्या नियोजन समितीकडे लेखी निवेदन देऊनही समाधानकारक उत्तर नसल्याचाही करण्यात आला दावा.
पिकअप मालवाहू गाडी आणि जीपची जोरदार धडक होऊन 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक नागरिकांच्या मदतीने सर्व जखमींना तात्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसले तरी पिकअप गाडीत कलिंगड भरलेले होते.
कागदपत्रांअभावी शेतकरी नोंदणीपासून वंचित राहण्याची शक्यता. गेल्या आठ-दहा दिवसांत कापसाच्या दरात 1000 ते 1200 रुपयांची घसरण. दर वाढतील या आशेने शेतकऱ्यांनी कापूस घरातच ठेवला. दर न वाढल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत. खुल्या बाजारात कमी भावात विक्री करण्याची वेळ. नोंदणी बंद झाल्यास कापूस विकायचा कुठे? शेतकऱ्यांचा सवाल.
आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. हा दिवस विरोधक जोरदार गाजवणार असल्याची शक्यता आहे. विरोधक सत्ताधाऱ्यांना दावोस दौऱ्यावरुन घेरतील. जानेवारी 2025 आणि जानेवारी 2026 दावोस आंतरराष्ट्रीय आर्थिक परिषदेत 15 लाख कोटी आणि 37 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणून देखील सुमारे 70 लाख युवक बेरोजगार असल्याचे नोंद
आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. हा दिवस विरोधक जोरदार गाजवणार असल्याची शक्यता आहे. विरोधक सत्ताधाऱ्यांना दावोस दौऱ्यावरुन घेरतील. जानेवारी 2025 आणि जानेवारी 2026 दावोस आंतरराष्ट्रीय आर्थिक परिषदेत 15 लाख कोटी आणि 37 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणून देखील सुमारे 70 लाख युवक बेरोजगार असल्याचे नोंद. त्यावरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरणार असल्याची माहिती. सोबतच बारावीच्या एका विद्यार्थ्यांचा प्रवासादरम्यान लोकल रेल्वेतून पडून अपघातात मृत्यू झाला. मुंबई लोकल रेल्वे बाबत देखील प्रश्न उपस्थित करण्यात येणार आहेत. विधानसभेत आज पुरवणी मागण्यांवरती चर्चेला सुरुवात होईल. अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारकडून 11000 कोटीच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली जात असल्याचा आरोप करत विरोधक सरकारवरती जोरदार टीका करतील.