AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : आजच्या उपराष्ट्रपतीच्या शपथविधीला अजित पवार का आले नाहीत? त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले की…

"महायुती सरकारने जेव्हा मी मुख्यमंत्री होतो, जे जे केलं नियमानुसार, कायद्याच्या चौकटीत बसवून केलं. ओबीसी किंवा अन्य कुठल्या समाजावर अन्याय होऊ नये ही भावना कालही होती, आजही आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर काढला आहे, तो कायद्याच्या चौकटीत बसवून काढला आहे.ओबीसी समाजाच कुठेही नुकसान होणार नाही" असं एकनाथ शिंदे म्हणाले.

Eknath Shinde : आजच्या उपराष्ट्रपतीच्या शपथविधीला अजित पवार का आले नाहीत? त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले की...
Eknath Shinde
| Updated on: Sep 12, 2025 | 11:39 AM
Share

“आजचा दिवस एनडीएच्या दृष्टीने महत्वाचा, आनंदाचा दिवस आहे. उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांचा प्रचंड बहुमताने विजय झालाय. दिमाखदार सोहळा पार पडला.शपथविधीला आम्हाला उपस्थित राहता आलं. मी उपराष्ट्रपती सीपी राधकृष्ण यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांना खूप शुभेच्छा देतो. एवढ्या मोठ्या पदावरुन जाऊनही साधी राहणी, मनमिळावू स्वभाव, उच्च विचासरणी असं बहुआयामी नेतृत्व म्हणून सीपी राधाकृष्णन विराजमान झाले आहेत. राज्यपाल, संसदीय कार्याच त्यांना अनुभव आहे. खऱ्या अर्थाने या पदाची शान, मान ते वाढवतील याचा अभिमान आहे. देशाच्या विकासात, प्रगतीत त्यांच्या अनुभवाचा फायदा होईल, म्हणून मनपासून शुभेच्छा देतो” असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

अजित पवार आजच्या कार्यक्रमाला अनुपस्थित होते, त्यावर सुद्धा एकनाथ शिंदे बोलले. “अजितदादांच्यावतीने प्रफुल पटेल उपस्थित होते. ते मला भेटले एनडीएच सगळे लोक होते. त्यांचा रायगडमध्ये पूर्वनियोजित कार्यक्रम होता, म्हणून अजितदादा आले नाहीत” असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

‘अशा प्रकराच वक्तव्य दुर्देवी, दुर्भाग्यपूर्ण आहे’

महाराष्ट्रात हिंसाचार होईल, नेपाळ सारखी स्थिती होईल असं संजय राऊत म्हणाले. त्यावर एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. “खरं म्हणजे अशा प्रकराच वक्तव्य दुर्देवी, दुर्भाग्यपूर्ण आहे. कारण शेवटी प्रत्येकाला देशाचा स्वाभिमान, अभिान असला पाहिजे. देशावर प्रेम करणारे लोक अशी वक्तव्य करु शकत नाहीत. काही लोकांच्या मनात आहे की, जशी परिस्थिती नेपाळची झाली, तसं अराजक निर्माण करण्यासाठी डाव, कारस्थान कोणी रचत नाही ना? असा प्रश्न निर्माण होतो?” असं एकनाथ शिंदे म्हणाले. “आपली लोकशाही प्रगल्भ आहे, मजबूत आहे. आपल्या मनातले भाव बोलून दाखवण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. देशात अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीवर कठोर कारवाई झाली पाहिजे” अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केली.

‘अन्यथा शिवभक्त जशास तसं उत्तर देतील’

कर्नाटकात काँग्रेस सरकारकडे मेट्रो स्टेशनच छत्रपती शिवाजी महाराजांच नाव बदलून सेंट मेरी करण्याचा प्रस्ताव आहे. त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले की, “हे दुर्देवी आहे. इंग्रज निघून गेलेत, त्याला 75 वर्ष झाली आहेत. इंग्रजांची आठवण ठेवण्याची आवश्यकता नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्रच नाही, तर सगळ्या देशाचे आराध्य दैवत आहेत. प्रत्येकाने याची जाणीव ठेवली पाहिजे. अन्यथा शिवभक्त जशास तसं उत्तर देतील”

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...