AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुठे पिके पाण्याखाली, तर कुठे जनावरे दगावली, महाराष्ट्रातील किती जिल्ह्याला अतिवृष्टीचा फटका?

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीचा सामना करावा लागत आहे. जळगाव, जालना, सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हजारो हेक्टरवर पिके पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांची मोठी हानी झाली आहे.

कुठे पिके पाण्याखाली, तर कुठे जनावरे दगावली, महाराष्ट्रातील किती जिल्ह्याला अतिवृष्टीचा फटका?
| Updated on: Sep 18, 2025 | 10:50 AM
Share

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे अतिवृष्टी झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. जळगाव, जालना, सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यांना या पावसाचा मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने शेतातील पिके वाहून गेली आहेत. तसेच शहरांमध्येही पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले आहेत.

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पावसाने कहर केला असून, सुमारे ७ हजार हेक्टरपेक्षा जास्त शेती पिकांचे नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या पावसामुळे केळी, कापूस, सोयाबीन आणि मका यांसारखी पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मुक्ताईनगर तालुक्यात सरासरी ६७ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. यामुळे ३५ गावे बाधित झाली आहेत. आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री आणि महसूलमंत्र्यांना या नुकसानीची माहिती दिली असून, तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जालना जिल्ह्यात ९४ हजार हेक्टरवर अतिवृष्टीचा फटका

जालना जिल्ह्यातही दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ९४ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसला आहे. यामध्ये कपाशी, सोयाबीन आणि तूर यांसारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने हा प्राथमिक अहवाल दिला आहे. शहरातही अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरात आणि दुकानात पाणी शिरले होते. तसेच ग्रामीण भागात वीज पडून पाच जनावरे दगावली आहेत. पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली असून पंचनाम्याचे आदेश दिले आहेत.

सोलापुरात पिके पाण्याखाली

सोलापूर जिल्ह्यातही पावसाने हाहाकार माजवला आहे. बार्शी तालुक्याच्या उत्तर भागातून वाहणाऱ्या चांदनी नदीला महापूर आला आहे, ज्यामुळे मांडेगाव, कांदलगाव, देवगावसह ८ गावातील हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. तर, दक्षिण सोलापूर तालुक्यातही झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची दैना झाली आहे. येथील शेतांना तळ्याचे स्वरूप आले आहे.

हातातोंडाशी आलेले खरीप पीक पूर्णतः पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे उडीद, तूर, सोयाबीन आणि मूग ही पिके गुडघाभर पाण्यात असल्याने सडू लागली आहेत. मंद्रूप, निंबर्गी, कंदलगाव, तिऱ्हे, पाथरी, पा कणी आणि तेरामैल परिसरातील शेतकऱ्यांना या पावसाचा मोठा फटका बसला आहे. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

स्मार्ट सिटीच्या कामाचा फज्जा

नाशिकमध्ये अवघ्या काही मिनिटांच्या पावसामुळे स्मार्ट सिटीच्या कामाचा फज्जा उडाला. वाघाडी नाल्यातून आलेल्या पाण्यामुळे बुधवारच्या बाजारात दुकाने लावलेल्या शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. अनेक शेतकऱ्यांचे साहित्य वाहून गेले. आजही अनेक शेतकरी आपले साहित्य शोधत आहेत. या घटनेमुळे स्मार्ट सिटीच्या कामाची गुणवत्ता समोर आली आहे.

Follow Us
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच...
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच....