AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monsoon | महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन लांबण्याची चिन्हं, केरळात 5 जूनला धडकण्याचा अंदाज

हवामान विभागाने नुकतेच मान्सून आगमनाच्या संभाव्य तारखांचे नवीन वेळापत्रक जाहीर केले. यानुसार मान्सून यंदा चार दिवस उशिराने म्हणजेच 5 जून रोजी केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज आहे (Maharashtra Monsoon May Delay)

Monsoon | महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन लांबण्याची चिन्हं, केरळात 5 जूनला धडकण्याचा अंदाज
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: May 15, 2020 | 3:27 PM
Share

मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनचं (नैर्ऋत्य मोसमी वारे) आगमन लांबण्याची चिन्हं आहेत. केरळात 1 जूनऐवजी 5 जूनला मान्सून धडकणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजासह घरात बसूनही उन्हाळ्याचा त्रास सोसणाऱ्या महाराष्ट्राला थोडी आणखी कळ सोसावी लागणार आहे. (Maharashtra Monsoon May Delay)

केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाल्यानंतर सहा ते सात दिवसांनी महाराष्ट्रातही दाखल होतो. यंदा केरळमध्ये उशिरानं आगमन होणार असल्याने महाराष्ट्रातील आगमनही लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. त्याची तीव्रता वाढून या भागात चक्रीवादळ घोंगावणार आहे. या वादळी प्रणालीमुळे मान्सूनच्या प्रवाहाला चालना मिळणार असून रविवार (17 मे) सकाळपर्यंतचा 48 तासांमध्ये केव्हाही मान्सून दक्षिण बंगालच्या उपसागर, दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटावर डेरेदाखल होण्यास पोषक स्थिती आहे.

हवामान विभागाने नुकतेच मान्सून आगमनाच्या संभाव्य तारखांचे नवीन वेळापत्रक जाहीर केले. यानुसार मान्सून यंदा चार दिवस उशिराने म्हणजेच 5 जून रोजी केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज आहे. वाऱ्यांचे आगमन चार दिवस मागे पुढे होण्याची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे.

‘स्कायमेट’ अंदाज काय?

केरळात मान्सून एक जून रोजी दाखल होण्याचा अंदाज ‘स्कायमेट’ या खासगी हवामान संस्थेने व्यक्त केला होता. अंदमानच्या समुद्रात 22 मे रोजी मान्सून धडकणार असल्याचा ‘स्कायमेट’चा अंदाज आहे.

केरळमध्ये मान्सून आपल्या निर्धारित वेळेच्या 7 दिवस पुढे-मागे येत असतो. 99 टक्के वेळा केरळमध्ये मान्सूनचे आगमन 25 मे ते 08 जून दरम्यान झाले आहे. गेल्या 10 वर्षात, 2009 मध्ये एकदाच मान्सून सर्वात आधी म्हणजे 23 मे रोजी केरळमध्ये पोहोचला होता. तर 2016 मध्ये मान्सूनने 8 जूनला केरळमध्ये धडक दिली होती.

हेही वाचा : राज्यात अनेक ठिकाणी वळीव बरसला, पुणे, नगर, नांदेड, जालन्यात जोरदार पाऊस

दरम्यान, केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाची वेळ आणि देशाच्या इतर भागांमध्ये मान्सूनचे आगमन यामध्ये कोणताही संबंध नसल्याचं ‘स्कायमेट’ने म्हटलं आहे. केरळमध्ये मान्सून लवकर आला, याचा अर्थ आपल्या शहरात मान्सून तितकाच जलद येईल, हा तर्क निराधार असल्याचं ‘स्कायमेट’ने स्पष्ट केलं आहे. (Maharashtra Monsoon May Delay)

छत्री, रेनकोट, प्लास्टिक कव्हर अत्यावश्यक

‘कोरोना’चे संकट पावसाळ्याच्या तोंडावरही कायम राहण्याची शक्यता असल्याने राज्य सरकारने अत्यावश्यक गोष्टींचे निकष बदलले आहेत. छत्री, रेनकोट, प्लास्टिक कव्हर यांचा समावेश आता अत्यावश्यक गोष्टींमध्ये होणार आहे.

महसूल, वने तसेच आपत्ती व्यवस्थापन आणि पुनर्वसन विभागाने काढलेल्या परिपत्रकात याचा उल्लेख आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार 30 सप्टेंबर 2020 पर्यंत छत्री, रेनकोट आणि प्लास्टिक कव्हर यांना अत्यावश्यक वस्तू म्हणून मान्यता देण्यात आली आहे.

(Maharashtra Monsoon May Delay)

Follow Us
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी श्रेयसची डोकेदुखी झाली कमी, प्लेइंग 11 चा निर्णय कसा घेणार?.

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी श्रेयसची डोकेदुखी झाली कमी, प्लेइंग 11 चा निर्णय कसा घेणार?

Fifa World Cup स्पेनने जिंकला पण फायदा मिया खलिफाला, एका रात्रीत मालामाल झाली, तब्बल 14 कोटी कमावलं.

Fifa World Cup स्पेनने जिंकला पण फायदा मिया खलिफाला, एका रात्रीत मालामाल झाली, तब्बल 14 कोटी कमावलं

Congress: भाजप कार्यालयाबाहेर काँग्रेस आक्रमक, कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंब्यासाठी भर पावसात आंदोलन, पोलीस येताच घडलं काय?.

Congress: भाजप कार्यालयाबाहेर काँग्रेस आक्रमक, कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंब्यासाठी भर पावसात आंदोलन, पोलीस येताच घडलं काय?

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..