AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monsoon | महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन लांबण्याची चिन्हं, केरळात 5 जूनला धडकण्याचा अंदाज

हवामान विभागाने नुकतेच मान्सून आगमनाच्या संभाव्य तारखांचे नवीन वेळापत्रक जाहीर केले. यानुसार मान्सून यंदा चार दिवस उशिराने म्हणजेच 5 जून रोजी केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज आहे (Maharashtra Monsoon May Delay)

Monsoon | महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन लांबण्याची चिन्हं, केरळात 5 जूनला धडकण्याचा अंदाज
| Updated on: May 15, 2020 | 3:27 PM
Share

मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनचं (नैर्ऋत्य मोसमी वारे) आगमन लांबण्याची चिन्हं आहेत. केरळात 1 जूनऐवजी 5 जूनला मान्सून धडकणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजासह घरात बसूनही उन्हाळ्याचा त्रास सोसणाऱ्या महाराष्ट्राला थोडी आणखी कळ सोसावी लागणार आहे. (Maharashtra Monsoon May Delay)

केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाल्यानंतर सहा ते सात दिवसांनी महाराष्ट्रातही दाखल होतो. यंदा केरळमध्ये उशिरानं आगमन होणार असल्याने महाराष्ट्रातील आगमनही लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. त्याची तीव्रता वाढून या भागात चक्रीवादळ घोंगावणार आहे. या वादळी प्रणालीमुळे मान्सूनच्या प्रवाहाला चालना मिळणार असून रविवार (17 मे) सकाळपर्यंतचा 48 तासांमध्ये केव्हाही मान्सून दक्षिण बंगालच्या उपसागर, दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटावर डेरेदाखल होण्यास पोषक स्थिती आहे.

हवामान विभागाने नुकतेच मान्सून आगमनाच्या संभाव्य तारखांचे नवीन वेळापत्रक जाहीर केले. यानुसार मान्सून यंदा चार दिवस उशिराने म्हणजेच 5 जून रोजी केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज आहे. वाऱ्यांचे आगमन चार दिवस मागे पुढे होण्याची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे.

‘स्कायमेट’ अंदाज काय?

केरळात मान्सून एक जून रोजी दाखल होण्याचा अंदाज ‘स्कायमेट’ या खासगी हवामान संस्थेने व्यक्त केला होता. अंदमानच्या समुद्रात 22 मे रोजी मान्सून धडकणार असल्याचा ‘स्कायमेट’चा अंदाज आहे.

केरळमध्ये मान्सून आपल्या निर्धारित वेळेच्या 7 दिवस पुढे-मागे येत असतो. 99 टक्के वेळा केरळमध्ये मान्सूनचे आगमन 25 मे ते 08 जून दरम्यान झाले आहे. गेल्या 10 वर्षात, 2009 मध्ये एकदाच मान्सून सर्वात आधी म्हणजे 23 मे रोजी केरळमध्ये पोहोचला होता. तर 2016 मध्ये मान्सूनने 8 जूनला केरळमध्ये धडक दिली होती.

हेही वाचा : राज्यात अनेक ठिकाणी वळीव बरसला, पुणे, नगर, नांदेड, जालन्यात जोरदार पाऊस

दरम्यान, केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाची वेळ आणि देशाच्या इतर भागांमध्ये मान्सूनचे आगमन यामध्ये कोणताही संबंध नसल्याचं ‘स्कायमेट’ने म्हटलं आहे. केरळमध्ये मान्सून लवकर आला, याचा अर्थ आपल्या शहरात मान्सून तितकाच जलद येईल, हा तर्क निराधार असल्याचं ‘स्कायमेट’ने स्पष्ट केलं आहे. (Maharashtra Monsoon May Delay)

छत्री, रेनकोट, प्लास्टिक कव्हर अत्यावश्यक

‘कोरोना’चे संकट पावसाळ्याच्या तोंडावरही कायम राहण्याची शक्यता असल्याने राज्य सरकारने अत्यावश्यक गोष्टींचे निकष बदलले आहेत. छत्री, रेनकोट, प्लास्टिक कव्हर यांचा समावेश आता अत्यावश्यक गोष्टींमध्ये होणार आहे.

महसूल, वने तसेच आपत्ती व्यवस्थापन आणि पुनर्वसन विभागाने काढलेल्या परिपत्रकात याचा उल्लेख आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार 30 सप्टेंबर 2020 पर्यंत छत्री, रेनकोट आणि प्लास्टिक कव्हर यांना अत्यावश्यक वस्तू म्हणून मान्यता देण्यात आली आहे.

(Maharashtra Monsoon May Delay)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.