
छत्रपती संभाजीनगर मध्ये पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू. छत्रपती संभाजीनगर शहरातील पोलीस भरती प्रक्रिया सुरू असताना घडली दुर्देवी घटना.लोहमार्ग पोलीस पदासाठी शारीरिक चाचणी सुरू असताना घडला प्रकार. सांगली जिल्ह्यातील संग्राम शिंदे हा तरुण धावत असताना अचानक कोसळला.
गोंदियात आंब्याच्या मोहोराने बहरल्या बागा. ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत. यंदा भरघोस उत्पानाची आशा. पण बदलत्या हवामानाचा फटका बसण्याची भीती.गोंदियात आंब्याचा मुबलक मोहोर. किडी-रोगांच्या प्रादुर्भावाची शक्यता वाढली. हवामानावर शेतकऱ्यांची नजर. आंबा हंगामावर ढगांचे सावट.
सोलापूर जिल्ह्यातील विधान परिषदेच्या जागेसाठी विविध नेत्यांकडून आमदारकीसाठी फिल्डिंग. जिल्ह्यातील भाजपचे 5 नेते विधान परिषदेच्या रेसमध्ये पाहायला मिळत आहेत. प्रशांत परिचारक, राजेंद्र राऊत, राम सातपुते, राजन पाटील आणि शहाजी पवार यांची नावे आघाडीवर आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेची विधान परिषद निवडणूक 2022 पासून रिक्त आहे. मात्र ही निवडणूक एप्रिलच्या अखेरीस होऊ घातली आहे. त्यामुळे या पाचपैकी विधान परिषदेला कोणाची वर्णी लागतेय हे पाहणे महत्वाचे आहे.
ज्यांनी महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप विरोधात आणि विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती विरोधात काम केलं, त्यांनाच भाजपने स्वीकृत नगरसेवक केलं. अमरावती महानगरपालिकेत भाजपच्या स्वीकृत नगरसेवक निवडीवर मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ विवेक कलोती यांची नाराजी.भाजपमधल्या लोकांनी काम न केल्याने माझा निवडणुकीमध्ये पराभव झाल्याचाही कलोती यांचा आरोप.
तपोवन मध्ये आज पर्यावरण प्रेमींचे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण पुकारलं आहे. पर्यावरण प्रेमींकडून उपोषणाला सुरुवात झाली आहे. वृक्षतोडीच्या निर्णयाविरोधात नाशिकच्या तपोवनमध्ये मागच्या गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू होते. पुन्हा एकदा तपोवन येथील वृक्षतोडीच्या निर्णयाविरोधात वृक्ष प्रेमींचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण सुरु आहे.
लोणार तालुक्याच्या चिखला येथील छत्रपती पुतळा हटवण्याचा कारणावरून झालेल्या वादाचे पडसाद आता देऊळगाव राजा शहरात उमटले असून नागरिकांनी देऊळगाव राजा शहर बंद ठेवले आहे . तर शेकडो नागरिक निषेध म्हणून रस्त्यावर देखील उतरले असून घटनेतील आरोपी यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी केलीय ..
हिमाचल प्रदेशातील दुर्गम भागात कर्तव्य बजावत असताना दरड कोसळून झालेल्या भीषण अपघातात गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील सुकाटोला पिपरिया येथील सुभेदार नेतराम हेमराज यांना वीरमरण आले आहे. या घटनेमुळे जिल्हाभर शोककळा पसरली आहे… शहीद जवानाचे पार्थिव आज दुपारी तीन वाजेपर्यंत त्यांच्या गावी पोहोचणार असून शासकीय सन्मानाने अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. गावात हळहळ व्यक्त होत आहे….देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्याया वीर जवानाला भावपूर्ण श्रद्धांजली…
या चौकशीला न्याय द्यायचा असेल तर देशातील सर्वात प्रमुख लोकांनी म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शाह हेच अजितदादांना न्याय देऊ शकतात. या प्रकरणातील लोक पॉवरफुल आहेत. त्यामुळे मोदी शहा यांनी या प्रकरणाला न्याय द्यावा. मी मोदींना लेटर देणार आहे. इमेलद्वारे मी देणार आहे… असं वक्तव्य रोहित पवार यांनी केलं आहे.
दिल्लीत रोहित पवार यांची पत्रकार परिषद सुरु आहे… VRC कंपनीच्या पाठीशी मोठी लोकं आहेत… केंद्रीय मंत्री राममोहन नायडूंच्या राजीनाम्याची मागणी देखील रोहित पवार यांनी केली. राहुल गांधी यांनी लक्ष घालून आमचा विषय मांडावा… असं वक्तव्य देखील रोहित पवार यांनी केलं आहे.
नाशिकमधील सारूळच्या जंगलात सापडलेल्या मुलीच्या मृतदेहाची ओळख पटली आहे. मृत मुलगी बुलढाण्याची असल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं आहे. प्रियकराने मित्रांच्या मदतीने प्रेयसीची हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. प्रेयसीचं दुसऱ्या मुलावर प्रेम असल्याने इग्नोर करतेय म्हणून प्रियकराने हत्या केली. मुलीचा मृतदेह गळ्यात चाकू अडकलेल्या अवस्थेत आढळून आलेला. प्रियकर काही वर्षांपूर्वी नाशिकच्या कॉलेजमध्ये घेत शिक्षण होता. याप्रकरणी दोन संशयित आरोपी ताब्यात, तर एकाचा नाशिकच्या ग्रामीण पोलिसांकडून शोध सुरू आहे.
बीडच्या धारूर तालुक्यातील गावंदरा गावच्या एका बावीस वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. धर्मराज बडे असे या तरुणाचे नाव आहे. बडे यांना बालासाहेब कांबळे याने पन्नास हजार रुपये व्याजाने दिले होते. ते परत मागण्यासाठी कांबळे हा बडे यांच्या घरी गेला होता आणि त्या ठिकाणी बडे याच्या कुटुंबीयांच्या विषयी अश्लील शब्द वापरत कांबळे याने त्रास दिला होता.
पाटसांगवी गावात 60 वर्षीय शेतकऱ्याचे सख्या पुतण्याने अपहरण करून जबरदस्तीने जमीन खरेदी करून घेतल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी समोर आला होता. संबंधित वृद्ध शेतकऱ्याला अनेक दिवस डांबून ठेवून मारहाण व दमदाटी करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. या दबावाखाली त्याच्या नावावर असलेली साडेसहा एकर जमीन जबरदस्तीने खरेदी करून घेतल्याचे आरोप होते.
दमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने शुक्रवारपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली. मात्र, पहिल्याच दिवशी मातृभाषा असलेल्या मराठीच्या पेपरमध्ये कॉपीमुक्त अभियानाचा पैठणमध्ये अक्षरशः फज्जा उडाल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. परीक्षा केंद्राबाहेर पोलिसांनी उपस्थित असतानाही उघडपणे कॉपीची देवाणघेवाण सुरू होती. हा सर्व प्रकार काल घडला असून त्याचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे
संजय राऊत हे नुकताच मालेगाव कोर्टात हजर झाले आहेत. दादा भुसे यांनी संजय राऊत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा केला होता, त्याच्या सुनावणीसाठी राऊत कोर्टात हजर झाले.
राहूल गांधी यांना मुलुंड चेक नाका इथे कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे. मोठा पोलीस बंदोबस्त असूनही राहूल गांधींनी दाखवण्यात आले काळे झेंडे. पोलिसांकडून अज्ञातांची धरपकड
माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची वाय प्लस सुरक्षा गृह विभागाने काढली आहे. सुरक्षा पुनरावलोकन समितीच्या अहवाला नंतर निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. अंबादास दानवे यांचा विरोधी पक्षनेते पदाचा कालावधी संपल्यानंतर वाय प्लस सुरक्षा काढून घेण्यात आली.
बीड – संतोष देशमुख खून प्रकरणाची बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुनावणी होणार आहे. आरोप निश्चिती झाल्यानंतर आज प्रथमच खून आणि खंडणी या प्रकरणांवर युक्तिवाद सुरू होण्याची शक्यता आहे. आजच्या सुनावणीत आरोपी विष्णू चाटे याने बीड कारागृहात ठेवण्यासंदर्भात केलेल्या अर्जावर देखील सुनावणी होऊ शकते.
जळगाव शहरातील जुने जळगाव परिसरात तीन भामट्यांनी महिलेची फसवणूक केली. आम्ही पोलिस आहोत, पुढे खून झालाय, पुढे जाऊ नका, असे सांगून तीन भामट्यांनी वृद्धेला फसवलं आणि तिचे 1 लाख 56 हजारांचे सोन्याचे दागिने काढून घेऊन फसवणूक केली.
छत्रपती संभाजीनगरमध्ये माणू,सकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. वाळीज परिसरात सावत्र बापानेच चिमुरड्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेनमतर आरोपी पिता फरार झाला असून पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू केला आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक परिसरात शिवजयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मिरवणुकीत चोरट्यांनी डल्ला मारला. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात दर्शनासाठी झालेल्या प्रचंड गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला. मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या 12 महिलांची मंगळसूत्रे आणि 3 तरुणांच्या सोन्याच्या साखळ्या चोरट्यांनी लांबवल्या आहेत.
भूम, परंडा आणि वाशी तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची चिन्हे दिसत आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांनी आता पक्षांतराची तयारी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला पराभूत झालेल्या उमेदवारांनी घेतलेल्या मंथन बैठकीत पक्षांतराचा सूर दिसत आहे.
लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आज मुंबईत येणार आहेत. त्यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई विमानतळावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. राहुल गांधी सकाळी 9 वाजून 15 मिनिटांच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचतील. त्यानंतर भिवंडी सत्र न्यायालयामध्ये 11.30 वाजता हजर होणार आहे. राहुल गांधींच्या स्वागतासाठी काँग्रेस कार्यकर्ते मुंबई विमानतळावर पोहोचले आहेत.
लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आज मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत. सकाळी 11.30 वाजत भिवंडी सत्र न्यायालयात ते हजर होणार आहेत. महात्मा गांधी यांच्या हत्येमागे आरएसएसचा हातच असल्याचं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं होतं. या संदर्भात कोर्टात नवीन जामीनदार सादर करण्यात येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी आज मुंबईत येणार आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे शहरातील क्रांती चौक परिसरात शिवजयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मिरवणुकीत चोरट्यांनी हात साफ केला. १२ महिलांची मंगळसूत्रे आणि तीन तरुणांच्या साखळ्या लंपास करण्यात आल्या. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत मालेगाव न्यायालयात हजर राहणार आहेत. मंत्री दादा भुसे यांनी गिरणा सहकारी साखर कारखान्यात 178 कोटी रुपयांचा शेअर्स घोटाळा केल्याचा बदनामीकारक मजकूर सामनामध्ये प्रसिद्ध केल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांच्यावर केला आहे. यासह देश-विदेश, महाराष्ट्र, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील बातम्या वाचण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.