AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खासदार ओमराजे निंबाळकर ठाकरे की शिंदे नक्की कोणासोबत? मोठी माहिती पुढे, थेट..

शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार शिवसेना शिंदे गटाने फोडल्याच दावा केला जात आहे. तसे पत्रही लोकसभा अध्यक्षांना दिले. मात्र, 2 खासदार परतणार असल्याची आशा शिवसेना ठाकरे गटाला आहे. ओमराजे निंबाळकर नक्की कोणत्या गटात आहेत, यावरूनही चर्चा रंगत आहे.

खासदार ओमराजे निंबाळकर ठाकरे की शिंदे नक्की कोणासोबत? मोठी माहिती पुढे, थेट..
MP Omraje Nimbalkar
| Updated on: Jun 18, 2026 | 8:47 AM
Share

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप आला. उद्धव ठाकरे गटाचे तब्बल 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या गळ्याला लागले. हेच नाही तर स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी त्यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्रही दिले. याबाबत माहिती कळताच संजय राऊत, अरविंद सावंत आणि अनिल देसाई देखील दिल्लीत सक्रिय झाले. एकनाथ शिंदे राजस्थान आणि नंतर दिल्लीत होते. राजस्थानमध्ये त्यांनी लोकसभा अध्यक्षांनी भेट घेतली. शिवसेनेचे तब्बल 6 खासदार सोडून जाणार असल्याचे कळताच मोठी खळबळ उडाली. हा शिवसेना उद्धव ठाकरे गटाला दुसरा मोठा धक्का आहे. एकाच वेळी 6 खासदार जाण्याने पक्षाला मोठी खिंडार पडू शकते. यानंतर शिवसेनेने आपल्या खासदारांना व्हिप जारी केले. जर या व्हिपनंतर खासदार बैठकीला उपस्थित राहिले नाही तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. नक्की कोण कोण खासदारसोबत आहेत, हे तपासण्यासाठी शिवसेनेने व्हिप जारी केले. खासदारांना या बैठकीत सहभागी व्हावेच लागेल.

काल दावा केला जात होता की, हे 6 खासदार दिल्लीतच आहेत. संजय राऊत यांनी दिल्लीत पक्षातील नेत्यांसोबत पत्रकार परिषद घेत मोठे दावे केले. हे खासदार शिवसेना ठाकरे गट सोडून नक्की का जात आहेत आणि त्यांच्यावर कशाप्रकारचा दबाव टाकला जात आहे, हे सांगितले. ओमराजे निंबाळकर यांच्याबाबत मोठा धक्कादायक खुलासा संजय राऊत यांनी केला.

कोर्टात सुरू असलेल्या केसचा निकाल तुमच्याबाजूने लावला जाईल, फक्त तुम्ही सही करा म्हणून खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर दबाव टाकला जात असल्याचे राऊतांनी म्हटले. ओमराजे निंबाळकर यांनी काल या चर्चांवर स्पष्ट केले की, मी पुण्यात आहे. मी दिल्लीत नाही. मात्र, यादरम्यान त्यांनी शिवसेना ठाकरे गटातच आहे का यावर भाष्य करणे टाळले. 20 जूनला सर्वकाही स्पष्ट करेल, असे त्यांनी म्हटले.

यासोबतच लोकसभा अध्यक्षांना दिलेल्या पत्रात ओमराजे निंबाळकर यांची सही देखील नसल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला. त्यामुळे आता ओमराजे निंबाळकर नक्की ठाकरेंच्या शिवसेनेत आहेत की, शिंदेंच्या शिवसेनेत याबाबत संभ्रम निर्माण झाला. सूत्रांच्या माहितीनुसार, ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला असून एकनाथ शिंदेंचा हात पकडला आहे.

Follow Us
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच...
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच मोठी खळबळ; महापालिकेत काय घडलं?
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड संताप; नाव न घेता राऊतांना थेट इशारा?
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा इशारा, काय म्हणाले?
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ, खासदर फुट
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने  खळबळ, खासदर फुटीनंतर आणखी मोठा धक्का!
अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ
मोठी बातमी! अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ; सोलापुरात नेमकं काय घडतंय?
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं;
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं; थेट इशाराच दिला!
मुंबईत पोलीस तैनात! दिना पाटील यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त!
Operation Tiger | दिल्लीत बंड, मुंबईत पोलीस तैनात! संजय दिना पाटील यांच्या घराबाहेर अचानक वाढवला पोलिस बंदोबस्त!
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या...
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या... नेमकं कारण काय?
ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
Sushma Andhare | ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
6 खासदार कुठे गेले?; सामंतांच्या एका वक्तव्याने राजकारणत खळबळ!
Uday Samant | 6 खासदार कुठे गेले?; उदय सामंतांच्या एका वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ!