AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माळशिरसमधील 8 मृत्यूनंतर प्रशासनाला जाग, जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय…

Malshiras Accident : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसमध्ये झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

माळशिरसमधील  8 मृत्यूनंतर प्रशासनाला जाग, जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय...
Solapur Collector on Malshiras AccidentImage Credit source: Google
| Updated on: Jun 14, 2026 | 9:39 PM
Share

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसमध्ये एक भीषण अपघात झाला. म्हसवड-पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी गावाजवळ भाविकांना घेऊन जाणारे पिकअप वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत कोसळल्याने 8 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. तसेच स्थानिकांनी अनेकांचा जीव वाचवला आहे. या घटनेनंतर आता प्रसासनाला जाग आली आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी मोठा निर्णय घेतला आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरींचा सर्वे होणार – जिल्हाधिकारी

माळशिरसमधील अपघातावर बोलताना सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी म्हटले की, ‘ग्रामस्थांनी विहिरीत उतरुन लोकांचा जीव वाचवला. वाहनात एकूण 15 लोक होते, त्यापैकी 8 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण घटनेची चौकशी केली जाणार आहे. या विहिरीच्या बाजूला संरंक्षण भिंत बांधणं अपेक्षित होतं. आता संपूर्ण जिल्ह्यात रोडच्या बाजूला असलेल्या विहिरींचा सर्वे केला जाणार आहे.’ पुढे बोलताना कार्तिकेयन यांनी म्हटले की, खासगी वाहनांमध्ये प्रवासी वाहतूक करणं चुकीचं आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहनात भरणंही चुकीचं आहे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन कारवाई करणार आहोत.

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – जानकर

माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी या घटनेबाबत बोलताना म्हटले की, ‘शेतकऱ्यांच्या विहिरी अधीपासूनच्या आहेत, रस्ता नंतर बनला. रस्ता बांधतांना सर्वे झाला नाही का? रस्त्याचा पुन्हा सर्वे केला पाहिजे. MSRDC आणि ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असून विधानसभेतही मुद्दा मांडणार आहे. संपूर्ण रस्ताच धोकादायक आहे.

कुटुंबीयांचा आक्रोश

माळशिरस तालुक्यातील म्हसवड पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी गावाजवळ पिकप गाडी विहिरीत पडून मोठा अपघात झाला. या अपघातात मृत्यूमुखी झालेल्यांचे मृतदेह पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, तसेच जखमींना पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांनी आक्रोश केला आहे.

Follow Us
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते...
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते नागपूरमध्ये AI लॅबचे भव्य उद्घाटन
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं...
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं आव्हान, थेट कोर्टात...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट म्हणाले, शिंदेंनी त्यांच्या नेत्यांना...
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या पुढाऱ्याने अखेर सांगितलंच
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता म्हणाला..
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील...
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील पवारांच्या नेत्याचा भाजपला पाठिंबा?
संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
Pune | संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा देशभराचं लक्ष वेधणार?
थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत...
Eknath Shinde | थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत खडाजंगी
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा...
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा भलामोठा फोटो पाहून राऊत संतापले