AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माळशिरसमधील 8 मृत्यूनंतर प्रशासनाला जाग, जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय…

Malshiras Accident : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसमध्ये झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

माळशिरसमधील  8 मृत्यूनंतर प्रशासनाला जाग, जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय...
Solapur Collector on Malshiras AccidentImage Credit source: Google
| Updated on: Jun 14, 2026 | 9:39 PM
Share

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसमध्ये एक भीषण अपघात झाला. म्हसवड-पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी गावाजवळ भाविकांना घेऊन जाणारे पिकअप वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत कोसळल्याने 8 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. तसेच स्थानिकांनी अनेकांचा जीव वाचवला आहे. या घटनेनंतर आता प्रसासनाला जाग आली आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी मोठा निर्णय घेतला आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरींचा सर्वे होणार – जिल्हाधिकारी

माळशिरसमधील अपघातावर बोलताना सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी म्हटले की, ‘ग्रामस्थांनी विहिरीत उतरुन लोकांचा जीव वाचवला. वाहनात एकूण 15 लोक होते, त्यापैकी 8 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण घटनेची चौकशी केली जाणार आहे. या विहिरीच्या बाजूला संरंक्षण भिंत बांधणं अपेक्षित होतं. आता संपूर्ण जिल्ह्यात रोडच्या बाजूला असलेल्या विहिरींचा सर्वे केला जाणार आहे.’ पुढे बोलताना कार्तिकेयन यांनी म्हटले की, खासगी वाहनांमध्ये प्रवासी वाहतूक करणं चुकीचं आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहनात भरणंही चुकीचं आहे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन कारवाई करणार आहोत.

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – जानकर

माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी या घटनेबाबत बोलताना म्हटले की, ‘शेतकऱ्यांच्या विहिरी अधीपासूनच्या आहेत, रस्ता नंतर बनला. रस्ता बांधतांना सर्वे झाला नाही का? रस्त्याचा पुन्हा सर्वे केला पाहिजे. MSRDC आणि ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असून विधानसभेतही मुद्दा मांडणार आहे. संपूर्ण रस्ताच धोकादायक आहे.

कुटुंबीयांचा आक्रोश

माळशिरस तालुक्यातील म्हसवड पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी गावाजवळ पिकप गाडी विहिरीत पडून मोठा अपघात झाला. या अपघातात मृत्यूमुखी झालेल्यांचे मृतदेह पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, तसेच जखमींना पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांनी आक्रोश केला आहे.

Follow Us
रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण...
रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण... जरांगे पाटलांनी नेमकं काय म्हटलं?
जरांगे पाटलांची रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भेट, दोघांमध्ये...
जरांगे पाटलांची रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भेट, दोघांमध्ये महत्त्वाची चर्चा; काय घडलं?
'या' लास्ट सर्टिफिकेटची मला गरज होती, अखेर त्या प्रकरणावर CM
Video | 'या' लास्ट सर्टिफिकेटची मला गरज होती, अखेर त्या प्रकरणावर फडणवीसांचा राऊतांना मिश्कील टोला
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू अनावर, व्हिडीओ आला समोर
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद अन् तो व्हिडीओ.. पहा नेमकं काय घडलं?
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळं
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ व्हायरल
Pune News | पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ तुफान व्हायरल
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की...विवाहितेसोबत
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की... विवाहितेसोबत भयंकर घडलं; अनैतिक संबंधामुळे...
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा'त मोठा भुकंप?