AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange: मनोज जरांगे पाटलांचे धनगर आरक्षणावरही भाष्य, पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले?

आज जरांगे पाटलांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. तसेच त्यांनी धनगर आरक्षणावरही भाष्य केलं आहे.

Manoj Jarange: मनोज जरांगे पाटलांचे धनगर आरक्षणावरही भाष्य, पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले?
Jarange on dhangar reservation
| Updated on: Aug 29, 2025 | 8:14 PM
Share

मनोज जरांगे पाटील हजारो मराठा आंदोलकांसह मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांनी आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरु केले आहे. आज जरांगे पाटलांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. तसेच त्यांनी धनगर आरक्षणावरही भाष्य केलं आहे. जरांगे पाटलांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

मनोज जरांगे पाटलांनी आंदोलकांनी त्रास दिल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, ‘मराठ्यांना त्रास देण्याचे काम सुरु आहे. आता सरकारने शौचालये, खाण्यापिण्याची दुकाने बंद केली आहेत. आंदोलकांना पाणी जेवण मिळू नये यासाठी सरकारचा प्रयत्न आहेत. इंग्रजांपेक्षा तुम्ही बेक्कार आहेत. गरिबांच्या लेकरांना त्रास देऊ नका. सरकार आडमुठात घुसले की मराठेही आडमुठात घुसतील असंही जरांगे पाटलांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना जरांगे पाटलांनी धनगर आरक्षणावर बोलताना म्हटले की, ‘देवेंद्र फडणवीस आम्हाला महाराष्ट्राचे संस्कार शिकवत आहेत, त्यांनी त्यांचे कर्तृत्व काय आहे ते सांगावं. फडणवीसांनी धनगरांना फसवलं आणि अजून आरक्षण दिलं नाही. कैकाडी समाज पश्चिम महाराष्ट्रात अनुसूचित जातीत आहे, तर मराठवाड्यात ओबीसीमध्ये आहे. काही ठिकाणी वेगळ्याच प्रवर्गात आहे. कैकाडी समाज तीन प्रवर्गात आहे हे फडणवीसांचे कर्तृत्व. मराठ्याची एक मुलगी ओबीसी आणि दुसरी जनरल प्रवर्गात, हे तुमचं कर्तृत्व. शेतकरी आत्महत्या करतात हे फडणवीसांचा कर्तृत्व’ असं जरांगेंनी म्हटलं आहे.

सरकारने मराठ्यांना आरक्षण द्यावे – जरांगे पाटील

आंदोलनाच्या परवानगीवर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, मला सरकारने काय केलं हे माहिती नाही. त्यांनी काल मला आंदोनलाची परवानगी दिली होती. आज पुन्हा एकदा परवानगी दिली आहे. माझं एक मत आहे की असले भंगार खेळ खेळण्यापेक्षा खरा डाव खेळावा. त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देऊन टाकावे. त्यांनी मराठा समाजाचे मन जिंकणे गरजेचे आहे. मराठा समाजाचे मन जिंकण्याची हीच योग्य वेळ आहे. गोरगरिबांच्या लेकरांना आरक्षण दिले तर मरेपर्यंत मराठा समाज या सरकारला विसरणार नाही. एक-एक दिवस मदुतवाढ देण्यापेक्षा थेट आरक्षण देऊन टाकावे, असं जरांगे पाटलांनी म्हटलं आहे.

आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?.
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका.
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?.