AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘हलक्यात घेतलं तर सरकारलाही कळेल’; मनोज जरांगे पाटील यांचा पुन्हा इशारा

"एक वर्ष झाला. आता काय मिळवलं, काय गमावलं हे सांगेन. 13 जुलै नंतर हे सांगता येईल. नंतर कोण काय गमावेल हे पण समजेल", असं सूचक वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं. जरांगे यांनी या माध्यमातून सरकारला मोठा इशारा देखील दिला.

'हलक्यात घेतलं तर सरकारलाही कळेल'; मनोज जरांगे पाटील यांचा पुन्हा इशारा
मनोज जरांगे पाटील
| Updated on: Jun 17, 2024 | 7:00 PM
Share

मराठा नेते मनोज जरांगे यांनी आज पुन्हा राज्य सरकारला इशारा दिला आहे. मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला सगेसोयरेच्या मागणीसाठी 13 जुलैपर्यंतची मुदत दिली आहे. मुदत दिलेल्या वेळेत राज्य सरकारने मागणी मान्य केली नाही तर जरांगे यांनी राज्य सरकारला मोठा इशारा दिला आहे. आम्हाला हलक्यात घेतलं तर सरकारलाही कळेल, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. मनोज जरांगे यांनी यावेळी आपण राज्य सरकारच्या शिष्टमंडळावर पूर्णपणे विश्वास ठेवल्याचंदेखील म्हटलं आहे. ते राज्य सरकारच्या भूमिकेकडे सकारात्मकतेने पाहत आहेत. “मंत्री शंभूराजे देसाई आले. त्यांनी शब्द दिला. मी राजकारण नाही तर समाजाचं हित समोर ठेऊन त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

मनोज जरांगे यांनी यावेळी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या उपोषणावरही प्रतिक्रिया दिली. “लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे. आमचा विरोध नाही. त्यांच्यावर उत्तर द्यायचं? मी एकही ओबीसी नेत्याला बोललो नाही. तायवाडे आणि इतर लोकांना काही बोललो नाही. ते विरोधक नाहीत. ज्यांना मानलं त्यांना मानलं आहे. काय म्हणायचं तो त्यांचा प्रश्न आहे. दुसऱ्यांचे मुल डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. मराठ्यांचे मुल मोठं झालं पाहजे, असा छातीवर हात ठेऊन विचार केला पाहिजे”, असं मनोज जरांगे म्हणाले.

‘एक वर्ष झाला, आता काय मिळवलं, काय गमावलं हे सांगेन’

“मुख्यमंत्री एका जातीचे नाहीत. मुख्यमंत्र्याला जातीत तोलयाचं नसतं. मुख्यमंत्र्याला कुणी काय म्हणावं तो त्यांचा प्रश्न आहे. मी त्यांचा प्रवक्ता नाही”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “एक वर्ष झाला. आता काय मिळवलं, काय गमावलं हे सांगेन. 13 जुलै नंतर हे सांगता येईल. नंतर कोण काय गमावेल हे पण समजेल”, असं सूचक वक्तव्य मनोज जरांगे यांनी केलं.

‘हलक्यात घेतलं तर सरकारलाही कळेल’

उपोषणाला बसेलेले ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ गेलं. याबाबत मनोज जरांगे यांना प्रश्न विचारला असता, “मला त्यावर बोलायचं नाही. मी असले उत्तर द्यायला बसलो नाही. कायदा घटनेपेक्षा मोठे झाले आहेत का? यांना उत्तर देत नाही. लॉजिक सांगायला घटना चालक आहे का? इथे सरकार न्यायमंदीर आहे. तुम्हाला प्रश्न असेल तर तिकडे जाऊन विचार. ज्याच्वरया अपल्याला रस नाही त्यावर बोलत नाही. माझा ध्येय आरक्षण मिळवणं आहे. माझ्या जातीने थोडा काचका दाखवलं आहे. नंतर बसने फिरणं कठीण होईल. आपल्याला हलक्यात घेतलं तर सरकारलाही कळेल. शिंदे, फडणवीस यांच्यावर आम्ही विश्वास ठेवला आहे. फडणवीस बल देत असतील आम्हाला आरक्षण मिळत असेल तर चांगलं आहे. फडणवीस दुश्मन नाहीत. सरकारला वेळ दिला. आता आरक्षण दिलं तर ठीक. नाही दिलं तर समाज लढायला तयार आहे”, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.

यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावरही उत्तर दिलं. “लोकशाहीत कोण कुणाला लढू नका असं म्हणतं? आम्ही एकडून तुम्ही तिकडून. मात्र एवढ्या मोठ्या माणसाने बोलू नये. धनगर समाजाला ST मधून आरक्षण मिळवण्यासाठी एवढे प्रयत्न केले असते तर बरं झालं असतं. आम्हाला विरोध करायचं काम करण्यापेक्षा धनगर समाजासाठी केलं असतं तर त्या समाजाचं कल्याण झालं असतं. आपण आपला राजकीय विचार समोर ठेवण्यापेक्षा धनगर समाजासाठी विचार करा. निवडणुकीतून आम्हाला उभं राहता येणार नाही ही कोणती मागणी आहे? मराठ्याला आरक्षण मिळालं तर आम्हाला राजकीय आरक्षण मिळणार नाही. ७-८ लोकांचं नुकसान होईल. इतर लोकांचं कल्याण होईल”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.