AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर जरांगे पाटलांकडून शेवटचा पत्ता ओपन, काय ठरलं? अंतरवालीमध्ये घडामोडींना वेग

विधानसभा निवडणुकीबाबत 31 तारखेला फायनल बैठक होणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

अखेर जरांगे पाटलांकडून शेवटचा पत्ता ओपन, काय ठरलं? अंतरवालीमध्ये घडामोडींना वेग
मनोज जरांगे पाटील
| Updated on: Oct 29, 2024 | 3:28 PM
Share

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे, आज निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहाता यावेळी महाविकास आघाडीविरोधात महायुती असाच सामना रंगण्याची शक्यता आहे. मात्र आता या निवडणुकीमध्ये मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देखील उडी घेतली आहे. मनोज जरांगे हे देखील काही विधानसभा मतदारसंघात उमेदवार देणार असल्यानं महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. येत्या 31 तारखेला मराठा, मुस्लिम व दलित समीकरण जुळवण्यासाठी महत्त्वपूर्ण फायनल बैठक होणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील?  

मराठा, दलित व मुस्लिम समीकरण जुळवण्यासाठी काही धर्मगुरू लांबून येणार आहेत. त्यांना हेलिकॉप्टरची उद्याची परवानगी मिळाली नाही. काल रात्री सगळ्यांचे प्रतिनिधी आले होते, मराठा मुस्लिम आणि दलितांचे प्रतिनिधी दोन दिवसांपासून हेलिकॉप्टरची परवानगी घेत आहेत. त्यांना उद्याची परवानगी मिळाली नाही, त्यामुळे आता फायनल बैठक 31 तारखेला होणार असून,  समाज बांधवांना माझी पुन्हा पुन्हा विनंती आहे की, 31 तारखेला इकडे कोणीही येऊ नका, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

फडणवीसांवर पुन्हा हल्लाबोल

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. चूक केलेली मान्यच करायची नाही ही त्यांची वृत्ती आहे,  त्यांना मला बोलायची गरज काय आहे? आम्ही त्यांना कधी विरोधक शत्रू मानलं? खोट्या केसेस करणं, एसआयटी नेमनं, सग्या सोयऱ्याची अमलबजावणी न करू देणं, आम्ही चूक नाही करत तुम्ही चूक केली. आंदोलन बेदखल करायचं, गुरमीत भाषा करायची, आम्हाला खुन्नस द्यायची त्याचा हिशोब तर लोक करणारच आहेत असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं. भाजप आणि काँग्रेसच्या ज्या लोकांना तिकीट मिळालं नाही त्यांच्यामध्ये खदखद असल्याचं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.