AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Milk Price Hike: सणासुदीत मुंबईकरांच्या खिशाला बसणार कात्री, साखरेनंतर दुध महाग, किती रुपयांनी वाढले दर?

Milk Rate Hike: मागील एक दोन दिवस साखरेने भाव खाल्ल्यानंतर आता दुधाच्या किमतीतही भाववाढ होणार असल्याची माहिती समोर आली. आता दुधाच्या किमतीत किती रुपयांनी भाववाढ होणार आहे ते पाहा..

Milk Price Hike: सणासुदीत मुंबईकरांच्या खिशाला बसणार कात्री, साखरेनंतर दुध महाग, किती रुपयांनी वाढले दर?
| Updated on: Aug 28, 2026 | 9:53 AM
Share

हिरा ढाकणे: काही दिवसांत महागाई सातत्याने वाढ होताना दिसत आहे.  पण आता यावेळी या महागाईचा फटका हा मुंबईकरांच्या खिशालाच बसणार आहे. मुंबईकरांच्या खिशाला कात्री बसवणारी बातमी आता समोर आली आहे. दुधाळ जनावरांच्या वाढत्या किमती तसेच पशुखाद्याच्या दरात वाढ झाल्याने आता ही भाववाढ होणार असल्याचे समोर आले आहे. आता मुंबई दुग्ध उत्पादक संघाने दुधाच्या घाऊक दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ही वाढ 9 रुपयांनी होणार आहे.

मुंबईत सध्याचा दुधाचा घाऊक दर प्रतिलिटर 93 रुपये आहे. भाव वाढीमुळे तो 102 रुपये होण्याची शक्यता आहे, मुंबईत हे नवे दर 1 सप्टेंबर 2026 ते 28 फेब्रुवारी 2027 या कालावधीसाठी वाढवले जाणारआहे. अगदी सणासुदीच्या तोंडावर दुधाचे दर वाढवल्याने लोकांच्या बजेटवर परिणाम होणार आहे. नवीन महिन्याची सुरुवातच दरवाढीने होणार असल्याने आता ग्राहकांची चिंता वाढली आहे. बैठकीत दुधाळ जनावरांच्या वाढत्या किमतींबरोबरच दाणा, तूरचुणी, चणाचुणी आदी पशुखाद्यांच्या दरात 25 टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे निदर्शनास आणून देण्यात तसेच चारा, पेंड आदींच्या किमतीतही वाढ झाल्याने दूध उत्पादकांवर आर्थिक भार पडत असल्याचे सांगण्यात येत आहे. जोगेश्वरी येथील दिवाण सेंटर सभागृहात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

मागील एक ते दोन दिवस साखरेच्या किमतीत भाववाढ झाल्याची माहिती समोर आली होती. सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किमतीतील भावावढ ही लोकांसाठी टेन्शन वाढवणारी ठरणार आहे. कारण दूधाच्या किमती वाढणार, साखरेच्या किमतीत भाववाढ यामुळे आता लोकांचे बजेट बिघडणार आहे. भविष्यातही ही साखरेची भाववाढ कायम राहिल्यास खिशाला मोठी झळ बसणार. यामुळेच प्रशासनाने मोठा निर्णय घेतला. अन्न व नागरी पुरवठा विभागाने एक परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकाच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना साखर साठा करता येणार नाही असे म्हटले आहे. 30 दिवसांपेक्षा जास्त साठा विक्रेत्यांना करता येणार नाही. परिपत्रकानुसार कोणत्याही ठिकाणी ४,००० क्विंटलपेक्षा अधिक साखरेचा साठा ठेवता येणार नाही.

Follow Us
नेपाळमध्ये अडकलेल्या साताऱ्यातील महिला पर्यटकांशी शिंदेंचा संवाद
नेपाळमध्ये अडकलेल्या साताऱ्यातील महिला पर्यटकांशी उपमुख्यमंत्री शिंदेंचा व्हिडीओ कॉल
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदत
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
मुंबई महापालिकेकडून शालेय साहित्य वाटपास विलंब: इराण युद्ध कारणीभूत
मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
शिल्पा गवारे कुटुंबीयांकडून छळाचा आरोप, न्यायची मागणी
पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी पार
Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी, काय सुनावणी घडलं?
नेपाळ पुराचा बिहारला फटका: पाटणा, चंपारण, गोपाळगंज, सारणमध्ये सतर्कता
नेपाळमधील महापुराचा बिहारला फटका: गंगा नदीकाठच्या झोपड्या पाण्याखाली
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार मागणाऱ्या लेकाला पालकांनीच संपवलं
यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात
यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात; सांस्कृतिक सोहळ्यांमध्ये सहभाग