AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कॉक्रोच जनता पार्टीचा नेमका फायदा कुणाला? भाजपला की काँग्रेसला? त्या अहवालाने अनेकांना धक्का

CJP-Congress-BJP: देशात एका सर्व्हेची जोरदार चर्चा सुरू आहे. कॉक्रोच जनता पार्टी या सर्व्हेंच्या केंद्रस्थानी आहे. भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. त्यातील जवळपास अर्ध्या तरुणाईने सीजेपीची बाजू उचलून धरली आहे. पण सीजेपीचा फायदा काँग्रेस अथवा भाजपपैकी कुणाला अधिक फायदा होणार आहे?

कॉक्रोच जनता पार्टीचा नेमका फायदा कुणाला? भाजपला की काँग्रेसला? त्या अहवालाने अनेकांना धक्का
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, अभिजीत दिपकेImage Credit source: एजन्सी
| Updated on: Aug 28, 2026 | 9:52 AM
Share

जर कदाचित लोकसभा निवडणूक झाली तर भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील NDA, राष्ट्रीय लोकशाही आघाडी पुन्हा एकदा सत्तारूढ होऊ शकते. वास्तविक यापूर्वीच्या काही सर्वेमध्ये मात्र याच्या उलट एनडीएचा ग्राफ खाली आला होता. मतदानाच्या टक्केवारीतही घसरण दिसत होती. एका ताज्या सर्व्हक्षणानुसार, देशात काँग्रेसची स्थिती मजबूत झाली आहे. काँग्रेसवर लोकांचा विश्वास वाढला आहे. दिल्लीतील जंतरमंतरवर कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर हा सर्वे करण्यात आला. त्यातून अनेक धक्कादायक दावे करण्यात आले आहे.

NDA ला बहुमत पण अनेक जागांवर पडझड

इंडिया टुडे सी वोटरच्या ताज्या मूड ऑफ नेशनच्या सर्वेनुसार, आज जर निवडणूक झाली तर NDA ला देशभरात 326 जागा मिळतील. जानेवारी 2026 मध्ये NDA साठी 352 जगांचा अंदाज बांधल्या जात होता. पण गेल्या सहा महिन्यात एनडीएची बाजू लंगडी झाली आहे. त्यांना यापूर्वी वर्तवलेल्या जागांपैकी 26 जागांचा स्पष्टपणे फटका दिसत आहे. असे असले तरी सत्ता स्थापनेसाठी NDA कडे बहुमताची बेगमी असेल. केंद्रात सत्ता स्थापनेसाठी एनडीएकडे बहुमत असेल.

अर्थात हा आकाड 2024 मध्ये दिलेल्या ‘अब की बार 400 पार’ या घोषणेपासून कोसो दूर असल्याचे समोर येत आहे. सर्वेनुसार लोकांना एनडीएवर विश्वास आहे. त्यांचा पाठिंबा सुद्धा आहे. पण महागाई, परस्परविरोधी निर्णय, अनेक मुद्यांवर धरसोड वृत्ती आणि सामाजिक विषयाबाबतचे धोरण यावरून नाराजी वाढलेली आहे. त्यामुळे आता लोकसभा निवडणूक झाली तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 26 जागांचा मोठा फटका बसू शकतो.

भाजपच्या जागा घसरणार, काँग्रेसला 26 जागांचा फायदा

या सर्वेनुसार, भाजपाला नुकसान होताना दिसते. ताजा सर्वेनुसार, भाजपला निवडणूक झाल्यास 261 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. जानेवारी 2026 मध्ये असाच सर्वे केला तेव्हा पक्षाला 287 जागांवर आघाडी मिळत असल्याचे दिसून आले होते. गेल्या सहा महिन्यात भाजपला 26 जागा कमी मिळण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. भाजपने 2024 मधील लोकसभा निवडणुकीत 240 जागांवर विजय मिळवला होता. सर्वेनुसार पक्षाला गेल्या निवडणुकीपेक्षा अधिक जागा मिळू शकतात.

तर उलट काँग्रेसला या सर्वेत झुकते माप देण्यात आले आहे. काँग्रेसला 106 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. जानेवारीत करण्यात आलेल्या सर्वेत काँग्रेसला 80 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला होता. यावेळी त्यात मोठी सुधारणा झाल्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. 26 जागा काँग्रेसच्या खात्यात जमा होण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. ऑगस्ट 2025 मधील सर्व्हेत काँग्रेसला 97 जागा मिळतील असा दावा करण्यात आला होता. त्या तुलनेत आता पक्षाची स्थिती सुधारल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

Follow Us
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदत
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
मुंबई महापालिकेकडून शालेय साहित्य वाटपास विलंब: इराण युद्ध कारणीभूत
मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
शिल्पा गवारे कुटुंबीयांकडून छळाचा आरोप, न्यायची मागणी
पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी पार
Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी, काय सुनावणी घडलं?
नेपाळ पुराचा बिहारला फटका: पाटणा, चंपारण, गोपाळगंज, सारणमध्ये सतर्कता
नेपाळमधील महापुराचा बिहारला फटका: गंगा नदीकाठच्या झोपड्या पाण्याखाली
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार मागणाऱ्या लेकाला पालकांनीच संपवलं
यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात
यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात; सांस्कृतिक सोहळ्यांमध्ये सहभाग
MPSC पेपरफुटी प्रकरणावर फडणवीसांचा मोठा निर्णय, दोषींवर कठोर...
MPSC पेपरफुटी प्रकरणावर फडणवीसांचा मोठा निर्णय, दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश