AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजप म्हणते अमरावतीच्या हिंसाचाराला रझा अकादमी जबाबदार, आता असदुद्दीन ओवैसींची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…

मागील काही दिवसांपासून अमरावती शहर हिंचाराच्या घटनांनी धुमसत आहे. शहरातील अशांतता तसेच हिंचाराला रझा अकादमी जबाबदार असल्याचा आरोप केला जातोय. याच आरोपाबद्दल एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांना विचारण्यात आलं. मात्र त्यांनी अमरावतीतील हिंचाराला जबाबदार कोण या प्रश्नाचा थेट उत्तर देण्याचे टाळले.

भाजप म्हणते अमरावतीच्या हिंसाचाराला रझा अकादमी जबाबदार, आता असदुद्दीन ओवैसींची पहिली प्रतिक्रिया म्हणाले...
ASADUDDIN OWAISI
| Edited By: | Updated on: Nov 18, 2021 | 3:53 PM
Share

औरंगाबाद : मागील काही दिवसांपासून अमरावती शहर हिंचाराच्या घटनांनी धुमसत आहे. शहरातील अशांतता तसेच हिंचाराला रझा अकादमी जबाबदार असल्याचा आरोप केला जातोय. याच आरोपाबद्दल एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांना विचारण्यात आलं. मात्र त्यांनी अमरावतीतील हिंचाराला जबाबदार कोण या प्रश्नाचा थेट उत्तर देण्याचे टाळले. त्यांनी बोलणे टाळून दंगलीचा निषेध केला. ते औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

असदुद्दीन ओवैसी यांनी उत्तर देणे टाळले ?

त्रिपुरा येथील कथित घटनेचे पडसाद राज्यातील काही शहरांत उमटले. यामध्ये अमरावती शहरामध्ये मुस्लीम समाज मोठ्या संख्येने रस्त्यावर होता. त्यानंतर भाजपने दुसऱ्या दिवशी आयोजित केलेल्या बंदला हिंसक वळण लागले. अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. अमरावतीत संचारबंदीचा निर्णय घ्यावा लागला. त्यानंतर या हिंसाचाराला नेमंक जबाबदार कोण असा प्रश्न विचारला जात आहे. तर रझा अकादमीच या हिंसाचाराला जबाबदार असल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून केला जातोय. या पार्श्वभूमीवर असदुद्दीन ओवैसी यांना विचारण्यात आले. मात्र त्यांनी या प्रश्नाचे उत्तर देणा टाळले. “या दंगलीचा मी निषेध करतो. मात्र आरक्षणाच्या मुद्द्यावरून लक्ष विचलित करू नका. मला त्यावर बोलायचं नाही.”अशी प्रतिक्रिया ओवैसी यांनी दिली.

दंगलीला रझा अकादमी जबाबदार, भाजपचा दावा

अमरावती शहरात उसळलेल्या हिंसाचाला रझा अकादमी जबाबदार असल्याचा आरोप भाजप नेते तथा आमदार प्रविण पोटे यांनी केला होता. “आम्ही शांततेत बंद पुकारला होता. मात्र, त्यात रझा अकादमीचे लोक शिरले आणि सगळा हिंसाचार घडला. हिंदूंवर हल्ला करण्याचा प्रय़त्न केला गेला. त्याला उत्तर देण्यासाठी बंद पुकारला होता, मात्र हिंसाचार घडला. अमरावती शहरात संचारबंदी लावण्यात महाविकास आघाडी सरकारचा हात आहे. हिंदू-मुस्लीम या ठिकाणी काम करतात. संचारबंदीमुळे त्यांचं नुकसान होत आहे. संचारबंदी हटवावी यासाठी जामीन मिळाल्यानंतर पोलीस आयुक्तांशी बोलणार आहे.संचारबंदीमुळे विद्यार्थ्यांचंही मोठं नुकसान होतं,” असं पोटे 17 नोव्हेंबर रोजी म्हणाले होते.

अमरावतीमध्ये नेमकं काय घडलं होतं ?

त्रिपुरा येथील कथित हिंसाचार प्रकरणी अमरावतीत 12 नोव्हेंबर रोजी मुस्लिम समाजानं बंदचं आवाहन केलं होतं. मात्र यावेळी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेल्या जमावानं दुकानांची तोडफोड आणि जाळपोळ केली होती. या घटनेचा निषेध म्हणून 13 नोव्हेंबर रोजी भाजपने बंदचं आवाहन केलं होतं. या दिवशीही मोठ्या संख्येने जमाव रस्त्यावर उतरून त्यांनीदेखील हिंसक कारवाया केल्या. तेव्हापासून अमरावती शहरात तणावपूर्ण शांतता असून चार ते पाच हजार पोलीस सुव्यवस्था राखण्यासाठी तैनात आहेत. अमरावतीत दंगा नियंत्रक पथकही तैनात ठेवण्यात आले आहे.

इतर बातम्या :

VIDEO: समीर वानखेडेंवर नवाब मलिकांचे तीन गंभीर आरोप; नव्या आरोपांनी खळबळ

25 कोटीच्या डीलवर वानखेडेंची 4 तास चौकशी, पण आरोप करणारेच ‘बेपत्ता’, एनसीबीचं मीडियाद्वारे समन्स

बनावट प्रमाणपत्रे दावून वानखेडेंनी नोकरी बळकावली, भीम आर्मीची जात पडताळणी समितीकडे तक्रार

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.